शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

ग्राहक संरक्षण कायद्याचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:17 IST

भेंडा : ग्राहक संरक्षण कायदा २०१९ मध्ये ग्राहक हिताचे आमूलाग्र बदल झालेले आहेत. फसवणूक झालेल्या ग्राहकांनी त्याचा लाभ ...

भेंडा : ग्राहक संरक्षण कायदा २०१९ मध्ये ग्राहक हिताचे आमूलाग्र बदल झालेले आहेत. फसवणूक झालेल्या ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य कारभारी गरड यांनी केले.

जिजामाता माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जागृती या विषयावर गरड बोलत होते. व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य सुरेश साबळे, उपप्राचार्य भाऊसाहेब विधाटे, भारत वाबळे, भाऊसाहेब सावंत, डाॅ. रजनीकांत पुंड आदी उपस्थित होते.

जिल्हा, राज्य व राष्ट्रीय ग्राहक मंचाऐवजी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय आयोग असा बदल झाला आहे. ग्राहकाने वस्तू, माल, साहित्य कोठेही खरेदी केले असले तरी ग्राहक राहात असलेल्या जिल्ह्यातील ग्राहक आयोगात तक्रार दाखल करता येणार आहे. एखादी वस्तू, साहित्य खराब निघाल्यास उत्पादक, वितरक व विक्रेत्यावर दंडात्मक व कारावाईची तरतूद आहे, असे गरड यांनी सांगितले.

डाॅ. रजनीकांत पुंड म्हणाले, रुग्ण ग्राहकांनी रुग्णालयात दाखल होताना तसेच घरी परतताना सर्व प्रकारच्या सुविधा व फी ची विचारणा करावी. सध्या कोरोनाची साथ असल्याने प्रत्येकाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी करण्याचा आग्रह धरावा.