शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
5
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
6
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
7
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
8
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
9
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
10
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
11
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
12
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
13
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
14
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
15
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
16
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
17
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
18
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
19
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
20
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

लोकसहभागातून प्रभागाची स्वच्छता टकाटक

By admin | Updated: February 18, 2016 23:25 IST

अहमदनगर : नागरिक, नगरसेवक व महापालिका प्रशासन यांच्या समन्वयातून स्वच्छ शहर कसे साकारता येईल याचा वस्तुपाठ प्रभाग क्रमांक २१ ने घातला आहे.

अहमदनगर : नागरिक, नगरसेवक व महापालिका प्रशासन यांच्या समन्वयातून स्वच्छ शहर कसे साकारता येईल याचा वस्तुपाठ प्रभाग क्रमांक २१ ने घातला आहे. नागरिकांचे प्रबोधन झाल्यामुळे या प्रभागातील नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकणेच बंद केले आहे. घंटागाडी नियमित असल्याने तिच्यातच कचरा टाकणे आता अंगवळणी पडले आहे. या प्रभागाचे नगरसेवक किशोर डागवाले यांनी ‘स्वच्छ प्रभाग’ हा आपला अजेंडाच ठरविला आहे. नगर शहरात कचऱ्याची मोठी समस्या आहे. महापालिका प्रशासनाकडून नियमित कचरा उचलला जात नाही. त्यामुळे स्वच्छ शहर या संकल्पनेत नगर मागे पडले आहे. यावर लोकसहभागाने मात करण्याचा प्रयत्न काही प्रभागांनी सुरू केला आहे. प्रभाग २१ मध्ये नगरसेवक किशोर डागवाले यांनी घरोघर जाऊन नागरिकांना कचरा ‘डस्टबिन’मध्येच टाकण्याचे आवाहन केले. घरोघर हे डस्टबिनही वाटण्यात आले. प्रभागात होणारे हळदी-कुंकू, शिक्षक दिन, पाडवा मैफल, गणेशोत्सव, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव अशा विविध समारंभात व उत्सवात प्रभागाची स्वच्छता हा विषय अजेंड्यावर असतो. त्याचे फळ आता दृष्टिपथास येऊ लागले आहे. प्रभागातील धनगरगल्लीत स्वातंत्र्य सैनिक स्व. एकनाथ शिंदे बालोद्यान उभारण्यात आले आहे. या उद्यानाची देखभाल करण्यासाठी महापालिकेचा कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने हे बालोद्यान देखील कचरामुक्त बनले आहे. घुमरे गल्ली, चित्रा गल्ली, कोर्ट गल्लीतील रस्ते करताना त्याकडेला वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षांचे पालकत्व नागरिकांना देण्यात आले आहे. त्यामुळे प्रभागात वृक्षांची वाढ होऊ लागली आहे. हे वृक्ष भविष्यात प्रभागाच्या वैभवात भर टाकणार आहेत. वृक्षारोपण करताना लावलेले ट्री गार्ड चोरीस गेले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम नागरिकांनी सुरूच ठेवली. आता प्रभाग स्वच्छ दिसू लागल्याने आपण ‘स्वच्छ प्रभाग’ साकारु शकतो हा आत्मविश्वास येथील नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. नागरिकांना स्वच्छतेची स्वयंशिस्तच लागली आहे. नागरिक आता घरातील कचरा रस्त्यावर अथवा घराबाहेर टाकत नाहीत. दुसऱ्यांनाही टाकू देत नाहीत. स्वच्छता कर्मचारी न आल्यास नागरिक थेट त्याला दूरध्वनी करून बोलावून घेतात. नगरसेवकांनाही फोन करून सांगतात. त्यामुळे स्वच्छता कर्मचारी दांडी मारण्याचे धाडस करत नाही. प्रभाग क्रमांक २१ हा शहराच्या मुख्य बाजारपेठेलगत पसरलेला आहे. बाजारपेठेत दिवसभर गजबज असली तरी रस्त्यावर मात्र कोठेच कचरा दिसत नाही. नागरिकांना स्वयंशिस्त लावण्यात यश मिळाले आहे. पूर्वी नागरिक रस्त्यावर कचरा टाकायचे. मात्र डस्टबिन दिल्यापासून रस्त्यावरील कचरा डस्टबिनमध्ये पडू लागला. डस्टबिन दिल्यामुळे प्रभाग स्वच्छतेला हातभार लागला आहे. शिवाय साफसफाई कर्मचाऱ्यांकडून झाडलोट झाल्याची माहिती घेतो. कोणाची तक्रार आली तर पुन्हा झाडलोट करण्यास पाठवितो. नागरिक व झाडलोट करणाऱ्या दोघांनाही आता स्वच्छतेची आवड निर्माण झाली आहे.- किशोर डागवाले, नगरसेवक.