शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
3
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
5
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
6
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
7
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
9
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
10
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
11
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
12
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
13
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
14
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
15
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
16
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
17
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
18
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
19
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
20
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   

लोकसहभागातून प्रभागाची स्वच्छता टकाटक

By admin | Updated: February 18, 2016 23:25 IST

अहमदनगर : नागरिक, नगरसेवक व महापालिका प्रशासन यांच्या समन्वयातून स्वच्छ शहर कसे साकारता येईल याचा वस्तुपाठ प्रभाग क्रमांक २१ ने घातला आहे.

अहमदनगर : नागरिक, नगरसेवक व महापालिका प्रशासन यांच्या समन्वयातून स्वच्छ शहर कसे साकारता येईल याचा वस्तुपाठ प्रभाग क्रमांक २१ ने घातला आहे. नागरिकांचे प्रबोधन झाल्यामुळे या प्रभागातील नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकणेच बंद केले आहे. घंटागाडी नियमित असल्याने तिच्यातच कचरा टाकणे आता अंगवळणी पडले आहे. या प्रभागाचे नगरसेवक किशोर डागवाले यांनी ‘स्वच्छ प्रभाग’ हा आपला अजेंडाच ठरविला आहे. नगर शहरात कचऱ्याची मोठी समस्या आहे. महापालिका प्रशासनाकडून नियमित कचरा उचलला जात नाही. त्यामुळे स्वच्छ शहर या संकल्पनेत नगर मागे पडले आहे. यावर लोकसहभागाने मात करण्याचा प्रयत्न काही प्रभागांनी सुरू केला आहे. प्रभाग २१ मध्ये नगरसेवक किशोर डागवाले यांनी घरोघर जाऊन नागरिकांना कचरा ‘डस्टबिन’मध्येच टाकण्याचे आवाहन केले. घरोघर हे डस्टबिनही वाटण्यात आले. प्रभागात होणारे हळदी-कुंकू, शिक्षक दिन, पाडवा मैफल, गणेशोत्सव, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव अशा विविध समारंभात व उत्सवात प्रभागाची स्वच्छता हा विषय अजेंड्यावर असतो. त्याचे फळ आता दृष्टिपथास येऊ लागले आहे. प्रभागातील धनगरगल्लीत स्वातंत्र्य सैनिक स्व. एकनाथ शिंदे बालोद्यान उभारण्यात आले आहे. या उद्यानाची देखभाल करण्यासाठी महापालिकेचा कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने हे बालोद्यान देखील कचरामुक्त बनले आहे. घुमरे गल्ली, चित्रा गल्ली, कोर्ट गल्लीतील रस्ते करताना त्याकडेला वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षांचे पालकत्व नागरिकांना देण्यात आले आहे. त्यामुळे प्रभागात वृक्षांची वाढ होऊ लागली आहे. हे वृक्ष भविष्यात प्रभागाच्या वैभवात भर टाकणार आहेत. वृक्षारोपण करताना लावलेले ट्री गार्ड चोरीस गेले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम नागरिकांनी सुरूच ठेवली. आता प्रभाग स्वच्छ दिसू लागल्याने आपण ‘स्वच्छ प्रभाग’ साकारु शकतो हा आत्मविश्वास येथील नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. नागरिकांना स्वच्छतेची स्वयंशिस्तच लागली आहे. नागरिक आता घरातील कचरा रस्त्यावर अथवा घराबाहेर टाकत नाहीत. दुसऱ्यांनाही टाकू देत नाहीत. स्वच्छता कर्मचारी न आल्यास नागरिक थेट त्याला दूरध्वनी करून बोलावून घेतात. नगरसेवकांनाही फोन करून सांगतात. त्यामुळे स्वच्छता कर्मचारी दांडी मारण्याचे धाडस करत नाही. प्रभाग क्रमांक २१ हा शहराच्या मुख्य बाजारपेठेलगत पसरलेला आहे. बाजारपेठेत दिवसभर गजबज असली तरी रस्त्यावर मात्र कोठेच कचरा दिसत नाही. नागरिकांना स्वयंशिस्त लावण्यात यश मिळाले आहे. पूर्वी नागरिक रस्त्यावर कचरा टाकायचे. मात्र डस्टबिन दिल्यापासून रस्त्यावरील कचरा डस्टबिनमध्ये पडू लागला. डस्टबिन दिल्यामुळे प्रभाग स्वच्छतेला हातभार लागला आहे. शिवाय साफसफाई कर्मचाऱ्यांकडून झाडलोट झाल्याची माहिती घेतो. कोणाची तक्रार आली तर पुन्हा झाडलोट करण्यास पाठवितो. नागरिक व झाडलोट करणाऱ्या दोघांनाही आता स्वच्छतेची आवड निर्माण झाली आहे.- किशोर डागवाले, नगरसेवक.