शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

लोकसहभागातून प्रभागाची स्वच्छता टकाटक

By admin | Updated: February 18, 2016 23:25 IST

अहमदनगर : नागरिक, नगरसेवक व महापालिका प्रशासन यांच्या समन्वयातून स्वच्छ शहर कसे साकारता येईल याचा वस्तुपाठ प्रभाग क्रमांक २१ ने घातला आहे.

अहमदनगर : नागरिक, नगरसेवक व महापालिका प्रशासन यांच्या समन्वयातून स्वच्छ शहर कसे साकारता येईल याचा वस्तुपाठ प्रभाग क्रमांक २१ ने घातला आहे. नागरिकांचे प्रबोधन झाल्यामुळे या प्रभागातील नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकणेच बंद केले आहे. घंटागाडी नियमित असल्याने तिच्यातच कचरा टाकणे आता अंगवळणी पडले आहे. या प्रभागाचे नगरसेवक किशोर डागवाले यांनी ‘स्वच्छ प्रभाग’ हा आपला अजेंडाच ठरविला आहे. नगर शहरात कचऱ्याची मोठी समस्या आहे. महापालिका प्रशासनाकडून नियमित कचरा उचलला जात नाही. त्यामुळे स्वच्छ शहर या संकल्पनेत नगर मागे पडले आहे. यावर लोकसहभागाने मात करण्याचा प्रयत्न काही प्रभागांनी सुरू केला आहे. प्रभाग २१ मध्ये नगरसेवक किशोर डागवाले यांनी घरोघर जाऊन नागरिकांना कचरा ‘डस्टबिन’मध्येच टाकण्याचे आवाहन केले. घरोघर हे डस्टबिनही वाटण्यात आले. प्रभागात होणारे हळदी-कुंकू, शिक्षक दिन, पाडवा मैफल, गणेशोत्सव, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव अशा विविध समारंभात व उत्सवात प्रभागाची स्वच्छता हा विषय अजेंड्यावर असतो. त्याचे फळ आता दृष्टिपथास येऊ लागले आहे. प्रभागातील धनगरगल्लीत स्वातंत्र्य सैनिक स्व. एकनाथ शिंदे बालोद्यान उभारण्यात आले आहे. या उद्यानाची देखभाल करण्यासाठी महापालिकेचा कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने हे बालोद्यान देखील कचरामुक्त बनले आहे. घुमरे गल्ली, चित्रा गल्ली, कोर्ट गल्लीतील रस्ते करताना त्याकडेला वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षांचे पालकत्व नागरिकांना देण्यात आले आहे. त्यामुळे प्रभागात वृक्षांची वाढ होऊ लागली आहे. हे वृक्ष भविष्यात प्रभागाच्या वैभवात भर टाकणार आहेत. वृक्षारोपण करताना लावलेले ट्री गार्ड चोरीस गेले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम नागरिकांनी सुरूच ठेवली. आता प्रभाग स्वच्छ दिसू लागल्याने आपण ‘स्वच्छ प्रभाग’ साकारु शकतो हा आत्मविश्वास येथील नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. नागरिकांना स्वच्छतेची स्वयंशिस्तच लागली आहे. नागरिक आता घरातील कचरा रस्त्यावर अथवा घराबाहेर टाकत नाहीत. दुसऱ्यांनाही टाकू देत नाहीत. स्वच्छता कर्मचारी न आल्यास नागरिक थेट त्याला दूरध्वनी करून बोलावून घेतात. नगरसेवकांनाही फोन करून सांगतात. त्यामुळे स्वच्छता कर्मचारी दांडी मारण्याचे धाडस करत नाही. प्रभाग क्रमांक २१ हा शहराच्या मुख्य बाजारपेठेलगत पसरलेला आहे. बाजारपेठेत दिवसभर गजबज असली तरी रस्त्यावर मात्र कोठेच कचरा दिसत नाही. नागरिकांना स्वयंशिस्त लावण्यात यश मिळाले आहे. पूर्वी नागरिक रस्त्यावर कचरा टाकायचे. मात्र डस्टबिन दिल्यापासून रस्त्यावरील कचरा डस्टबिनमध्ये पडू लागला. डस्टबिन दिल्यामुळे प्रभाग स्वच्छतेला हातभार लागला आहे. शिवाय साफसफाई कर्मचाऱ्यांकडून झाडलोट झाल्याची माहिती घेतो. कोणाची तक्रार आली तर पुन्हा झाडलोट करण्यास पाठवितो. नागरिक व झाडलोट करणाऱ्या दोघांनाही आता स्वच्छतेची आवड निर्माण झाली आहे.- किशोर डागवाले, नगरसेवक.