शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

स्वाईन फ्ल्यूचा जिल्ह्याला विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 15:53 IST

अहमदनगर : स्वाईन फ्ल्यूने जिल्ह्याला विळखा घातला आहे. स्वाईन फ्ल्यूमुळे रोज एकाचा मृत्यू होत आहे. संसर्गजन्य आजारापासून वाचवण्यासाठी नवरात्रौत्सवाच्या ...

अहमदनगर : स्वाईन फ्ल्यूने जिल्ह्याला विळखा घातला आहे. स्वाईन फ्ल्यूमुळे रोज एकाचा मृत्यू होत आहे. संसर्गजन्य आजारापासून वाचवण्यासाठी नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकमतने हा खास जागर केला आहे. शहरातील तज्ज्ञांनीही स्वाईन फ्ल्यूपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.स्वाईन फ्ल्यूबाबत शहरातील तज्ज्ञ डॉ. गोपाळ बहुरुपी म्हणाले, एच १, एन १ फ्लूला ‘स्वाइन फ्लू’ म्हटले जाते. सुरवातीच्या काळात हा रोग फक्त डुकरांच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांना होत असे. म्हणुन यास स्वाईन फ्ल्यू असे म्हटले गेले आहे. मात्र उत्क्रांतीमध्ये या रोगाच्या विषाणूने स्वत:मध्ये असे काही बदल घडवून घेतले की, आता या विषाणुचा संसर्ग हा माणसापासुन माणसाला होऊ लागला आहे. २००९ मध्ये एच-१, एन-१ ची लागण जगभरात वेगाने पसरली होती. जागतिक आरोग्य संघटनेने यास ‘महामारी’असे नाव दिले.स्वाईन फ्ल्यूचा संसर्ग कसा होतो?मौसमी फ्लू प्रमाणेच, ज्या लोकांना खोकला आहे किंवा शिंकला आहे, ते खोकताना वायुमध्ये विषाणूचे छोटे थेंब फवारतात. आपण या थेंबांच्या संपर्कात आल्यास, किंवा एखाद्या संक्रमित व्यक्तीने स्पर्श केला असल्यास आपल्याला संसर्ग होऊ शकतो. साधारणपणे ७ ते १० दिवस संसर्गबाधित रुग्ण या विषाणुचा संसर्ग इतरांना पसरवु शकतो.स्वाइन फ्ल्यू लक्षणेखोकला, ताप,घसा दुखणे,सतत वाहणारे नाक, अंगदुखी,डोकेदुखी,थंडी वाजणे, थकवा,नियमित फ्लूप्रमाणेच, स्वाइन फ्लूमुळे न्युमोनिया, फुफ्फुसाचा संसर्ग आणि इतर श्वासोच्छवासाच्या समस्यांसह गंभीर समस्या येऊ शकतात. आणि यामुळे मधुमेह किंवा दम्यासारख्या आजार असल्यास अति काळजी घेणे गरजेचे आहे. जर आपल्याला श्वासोच्छवासाची तीव्रता, तीव्र उलट्या, आपल्या पोटात वेदना, थकवा किंवा मानसिक थकवा यासारख्या लक्षणे असतील तर आपल्या डॉक्टरांना लगेच संपर्क करा.स्वाइन फ्ल्यू साठी टेस्ट आहेत का?एच-१,एन-१ या रोगाचा संसर्ग झाला आहे अथवा नाही हे तपासण्यासठी थ्रोट स्वॅब घेऊन पॅथोलॉजी लॅब मध्ये तपासणी करता येते.यामध्ये उपचार कसा केला जातो?स्वाईन फ्लूचा उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाºया अँटीव्हायरल औषधामध्ये ओसेल्टामिविर (टॅमिफ्लू), पेरामिविर (रॅपिवाब) आणि झॅनॅमिव्हर (रेलेन्झा) उत्तम कार्य करतात असे दिसते. अँटीबायोटिक्स आपल्यासाठी काहीही करणार नाहीत. कारण फ्लू व्हायरसमुळे होतो, जीवाणू नव्हे. वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक दिली जातात.स्वाईन फ्ल्यू टाळण्यासाठीसाबण आणि पाण्याने नियमित आपले हात धुवा.आपले डोळे, नाक किंवा तोंड यांना सारखा स्पर्श करू नका.स्वाईन फ्ल्यूने आजारी असलेल्या लोकांना टाळा.खालील रुग्णांमध्ये स्वाईन फ्ल्युची जास्त काळजी घेणे गरजेचे असतेपाच वषार्खालील मुले,६५ किंवा त्यापेक्षा वयस्कर लोक, लहान मुले आणि किशोर (१८ वषार्खालील) ज्यांना दीर्घकालीन एस्पिरिन थेरपी मिळत आहे आणि त्यांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाल्यानंतर रईस सिंड्रोमचा धोका असू शकतो. रेयस सिंड्रोम ही जीवनास घातक आजार आहे ज्यायोगे मुलांमध्ये एस्पिरिनचा वापर केला जातो. गर्भवती महिला, प्रौढ आणि वृद्ध ज्यांना फुफ्फुस, हृदय, यकृत, रक्त, न्यूरोमस्क्यूलर किंवा चयापचय समस्या असलेले मुले, प्रौढ आणि मुले ज्याने प्रतिकार शक्ती कमी झालेली आहे (जे त्यांच्या रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी औषधे घेतात किंवा ज्यांना एचआयव्ही आहे)

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर