शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

संडे motivation : विहिरी आटल्याने शेततळ्यातून चारा वाचविण्याची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 15:25 IST

तालुक्यातील अवर्षण प्रवण भागातील आठमाही बागायतीसाठी निर्माण झालेल्या आढळा धरणाच्या लाभक्षेत्रातील विहिरींची पाणी पातळी कमालीची खोल गेली आहे

हेमंत आवारीअकोले : तालुक्यातील अवर्षण प्रवण भागातील आठमाही बागायतीसाठी निर्माण झालेल्या आढळा धरणाच्या लाभक्षेत्रातील विहिरींची पाणी पातळी कमालीची खोल गेली आहे. दुष्काळाची झळ सुरु झाल्याने शेतकरी चिंतेत दिसू लागला आहे. आढळेच्या लाभक्षेत्रातील पिंपळगाव निपाणी, वीरगाव, हिवरगाव, गणोरे, वडगाव लांडगा या भागात मोठ्या प्रमाणावर शेततळी आहेत. शेततळ्यात साठलेल्या पाण्यातून चारा वाचविण्याचा प्रयत्न सुरु आहे.शिमगा संपताच पिण्याच्या पाण्याची बोंब आदिवासी डोंगरदरीच्या क्षेत्रात सुरु झाली आहे. दोन ठिकाणी टँकर सुरु झाले आहेत. अकोले शहरापासून अवघ्या ५ मैल अंतरावर असलेल्या धामणगाव आवारी या गावासह आढळा धरणाच्या उशाला असलेल्या देवठाणच्या सात वाड्या व कळस येथील मांडवदरा ही आदिवासी वाडी तहानलेली आहे. ३-४ गावांचे टँकर मागणी प्रस्ताव महसूल दरबारी दाखल झाले आहेत.आढळा धरणातून चालू रब्बी हंगामात केवळ एकमेव आवर्तन मिळाले. या आवर्तनाने रब्बीच्या पिकांऐवजी चारा जगविण्यासाठी लाभधारकांनी खरी पराकाष्टा केली. पाण्याअभावी रब्बीची पिके करपून गेलीच व आवर्तनाच्या पाण्यातून हिरवागारझालेला चाराही अनेकठिकाणी पिवळा पडला आहे.विहिरींचे तळ उघडे पडल्याने ऊस, घास, मका ही चाऱ्याची पिके जगविण्यासाठी शेततळ्यातील पाण्याचा वापर सुरु आहे. एकूण शेततळ्यांपैकी १० टक्के शेततळ्यात पाणीसाठा असला तरी देखील तो येत्या आठ पंधरा दिवसातच संपेल. एप्रिलच्या पूर्वार्धापासूनच चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल. महसूल प्रशासनाने जनावरांसाठी चारा उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी अंकुश थोरात, कृष्णकांत थोरात, बाळासाहेब अस्वले, भगवान थोरात, प्रकाश वाकचौरे यांचेसह शेतकऱ्यांनी केली आहे.पाणी संपल्यावर पुढे काय?आढळा भागात उजाड होत चाललेल्या शेतीला आता शेततळ्यांचाच आधार उरला आहे. मात्र या शेततळ्यातील पाणी संपल्यावर पुढे काय. शेततळ्यात विकत पाणी टाकायचे, पण कुठून? हा प्रश्न शेतकºयांपुढे आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर