शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

संडे motivation : विहिरी आटल्याने शेततळ्यातून चारा वाचविण्याची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 15:25 IST

तालुक्यातील अवर्षण प्रवण भागातील आठमाही बागायतीसाठी निर्माण झालेल्या आढळा धरणाच्या लाभक्षेत्रातील विहिरींची पाणी पातळी कमालीची खोल गेली आहे

हेमंत आवारीअकोले : तालुक्यातील अवर्षण प्रवण भागातील आठमाही बागायतीसाठी निर्माण झालेल्या आढळा धरणाच्या लाभक्षेत्रातील विहिरींची पाणी पातळी कमालीची खोल गेली आहे. दुष्काळाची झळ सुरु झाल्याने शेतकरी चिंतेत दिसू लागला आहे. आढळेच्या लाभक्षेत्रातील पिंपळगाव निपाणी, वीरगाव, हिवरगाव, गणोरे, वडगाव लांडगा या भागात मोठ्या प्रमाणावर शेततळी आहेत. शेततळ्यात साठलेल्या पाण्यातून चारा वाचविण्याचा प्रयत्न सुरु आहे.शिमगा संपताच पिण्याच्या पाण्याची बोंब आदिवासी डोंगरदरीच्या क्षेत्रात सुरु झाली आहे. दोन ठिकाणी टँकर सुरु झाले आहेत. अकोले शहरापासून अवघ्या ५ मैल अंतरावर असलेल्या धामणगाव आवारी या गावासह आढळा धरणाच्या उशाला असलेल्या देवठाणच्या सात वाड्या व कळस येथील मांडवदरा ही आदिवासी वाडी तहानलेली आहे. ३-४ गावांचे टँकर मागणी प्रस्ताव महसूल दरबारी दाखल झाले आहेत.आढळा धरणातून चालू रब्बी हंगामात केवळ एकमेव आवर्तन मिळाले. या आवर्तनाने रब्बीच्या पिकांऐवजी चारा जगविण्यासाठी लाभधारकांनी खरी पराकाष्टा केली. पाण्याअभावी रब्बीची पिके करपून गेलीच व आवर्तनाच्या पाण्यातून हिरवागारझालेला चाराही अनेकठिकाणी पिवळा पडला आहे.विहिरींचे तळ उघडे पडल्याने ऊस, घास, मका ही चाऱ्याची पिके जगविण्यासाठी शेततळ्यातील पाण्याचा वापर सुरु आहे. एकूण शेततळ्यांपैकी १० टक्के शेततळ्यात पाणीसाठा असला तरी देखील तो येत्या आठ पंधरा दिवसातच संपेल. एप्रिलच्या पूर्वार्धापासूनच चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल. महसूल प्रशासनाने जनावरांसाठी चारा उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी अंकुश थोरात, कृष्णकांत थोरात, बाळासाहेब अस्वले, भगवान थोरात, प्रकाश वाकचौरे यांचेसह शेतकऱ्यांनी केली आहे.पाणी संपल्यावर पुढे काय?आढळा भागात उजाड होत चाललेल्या शेतीला आता शेततळ्यांचाच आधार उरला आहे. मात्र या शेततळ्यातील पाणी संपल्यावर पुढे काय. शेततळ्यात विकत पाणी टाकायचे, पण कुठून? हा प्रश्न शेतकºयांपुढे आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर