शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

साखर कामगार प्रश्नावर एकत्र लढा

By admin | Updated: April 29, 2016 23:27 IST

श्रीरामपूर :साखर कामगारांच्या प्रश्नांवर एकत्रितपणे लढा देण्याची गरज महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक यांनी व्यक्त केली.

श्रीरामपूर : साखर कामगारांच्या संघटना वेगवेगळ्या असल्या तरी साखर कामगारांच्या प्रश्नांवर एकत्रितपणे लढा देण्याची गरज महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक यांनी व्यक्त केली.श्रीरामपूरच्या काँग्रेस भवनात ज्ञानेश्वर व मुळा सहकारी साखर कारखान्यांमध्ये असलेल्या नेवासा तालुका राष्ट्रीय कामगार संघ व मान्यताप्राप्त साखर कामगार संघटनेच्या जनरल कौन्सिलची सभा शुक्रवारी झाली़ या सभेत आदिक यांनी मार्गदर्शन केले़ मावळते अध्यक्ष बबनराव धस अध्यक्षस्थानी होते. यावेळी संघाच्या अध्यक्षपदी मुळा कारखान्याचे अशोक पवार व सरचिटणीसपदी नितीन पवार यांची निवड करण्यात आली. दिवंगत गोविंदराव आदिक व बबनराव पवार हे साखर कारखानदारी व साखर कामगारांचे हित जोपासणारे नेतृत्व होते. त्यांचे कार्य व नाव जीवंत ठेवण्यासाठी साखर कामगार चळवळ अधिक बळकट झाली पाहिजे. घुले-गडाख यांनी त्यांना जे सहकार्य केले, तेच आताही आम्हाला मिळत आहे, असे सांगून सरचिटणीस पवार यांनी जूनअखेर वेतनवाढीचा निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. ज्ञानेश्वर कारखाना संघटना कार्याध्यक्षपदी सुखदेव फुलारी, उपाध्यक्ष भाऊसाहेब चौधरी, सचिव जनार्दन कदम, खजिनदार हरिभाऊ नजन, सहसचिव मच्छिंद्र वेताळ, सहखजिनदार संभाजी माळवंदे, कार्यकारी सदस्य अशोक भूमकार, काकासाहेब लबडे, संजय राऊत, अण्णासाहेब गर्जे, मुळा कामगार संघटना कार्याध्यक्षपदी एस. बी. शिंदे, उपाध्यक्ष डी. जी. म्हस्के, सचिव डी. एम. निमसे, खजिनदार एस. ए. दरंदले, कार्यकारी सदस्य इ. जी. कुसळकर, एम. बी. भुसारी, बी. बी. पटारे, जी. एम. पालवे, जी. के. बेल्हेकर यांची निवड करण्यात आली. डी. एम. निमसे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)महाराष्ट्रात ऊस शेती व साखर कारखान्यांमुळे दुष्काळ पडला, हे केंद्रीय कृषी मंत्री राधामोहनसिंग यांचे विधान शहाणपणाचे नाही. यापुढील वर्ष शेतकरी व कामगारांच्या दृष्टीने चिंताजनक आहे. -अविनाश आदिक, श्रीरामपूर.