शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

साखर कामगार प्रश्नावर एकत्र लढा

By admin | Updated: April 29, 2016 23:27 IST

श्रीरामपूर :साखर कामगारांच्या प्रश्नांवर एकत्रितपणे लढा देण्याची गरज महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक यांनी व्यक्त केली.

श्रीरामपूर : साखर कामगारांच्या संघटना वेगवेगळ्या असल्या तरी साखर कामगारांच्या प्रश्नांवर एकत्रितपणे लढा देण्याची गरज महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक यांनी व्यक्त केली.श्रीरामपूरच्या काँग्रेस भवनात ज्ञानेश्वर व मुळा सहकारी साखर कारखान्यांमध्ये असलेल्या नेवासा तालुका राष्ट्रीय कामगार संघ व मान्यताप्राप्त साखर कामगार संघटनेच्या जनरल कौन्सिलची सभा शुक्रवारी झाली़ या सभेत आदिक यांनी मार्गदर्शन केले़ मावळते अध्यक्ष बबनराव धस अध्यक्षस्थानी होते. यावेळी संघाच्या अध्यक्षपदी मुळा कारखान्याचे अशोक पवार व सरचिटणीसपदी नितीन पवार यांची निवड करण्यात आली. दिवंगत गोविंदराव आदिक व बबनराव पवार हे साखर कारखानदारी व साखर कामगारांचे हित जोपासणारे नेतृत्व होते. त्यांचे कार्य व नाव जीवंत ठेवण्यासाठी साखर कामगार चळवळ अधिक बळकट झाली पाहिजे. घुले-गडाख यांनी त्यांना जे सहकार्य केले, तेच आताही आम्हाला मिळत आहे, असे सांगून सरचिटणीस पवार यांनी जूनअखेर वेतनवाढीचा निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. ज्ञानेश्वर कारखाना संघटना कार्याध्यक्षपदी सुखदेव फुलारी, उपाध्यक्ष भाऊसाहेब चौधरी, सचिव जनार्दन कदम, खजिनदार हरिभाऊ नजन, सहसचिव मच्छिंद्र वेताळ, सहखजिनदार संभाजी माळवंदे, कार्यकारी सदस्य अशोक भूमकार, काकासाहेब लबडे, संजय राऊत, अण्णासाहेब गर्जे, मुळा कामगार संघटना कार्याध्यक्षपदी एस. बी. शिंदे, उपाध्यक्ष डी. जी. म्हस्के, सचिव डी. एम. निमसे, खजिनदार एस. ए. दरंदले, कार्यकारी सदस्य इ. जी. कुसळकर, एम. बी. भुसारी, बी. बी. पटारे, जी. एम. पालवे, जी. के. बेल्हेकर यांची निवड करण्यात आली. डी. एम. निमसे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)महाराष्ट्रात ऊस शेती व साखर कारखान्यांमुळे दुष्काळ पडला, हे केंद्रीय कृषी मंत्री राधामोहनसिंग यांचे विधान शहाणपणाचे नाही. यापुढील वर्ष शेतकरी व कामगारांच्या दृष्टीने चिंताजनक आहे. -अविनाश आदिक, श्रीरामपूर.