शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

समन्वयातून यशस्वी तोडगा

By admin | Updated: June 16, 2014 00:09 IST

अहमदनगर: नगर एमआयडीसी मधील इंडियन सिमलेस कंपनीतील कामगार संघटना व कंपनी व्यवस्थापनाच्या योग्य समन्वयातून यशस्वी तोडगा निघाला.

अहमदनगर: नगर एमआयडीसी मधील इंडियन सिमलेस कंपनीतील कामगार संघटना व कंपनी व्यवस्थापनाच्या योग्य समन्वयातून यशस्वी तोडगा निघाला. चर्चेतून प्रश्न सुटतो. परंतु कंपनी बंद पाडून कामगारांनी टोकाची भूमिका कधीही घेऊ नये, अशी भूमिका उद्योजक व कंपनी व्यवस्थापनाची असते. याचे उदाहरण म्हणजे इंडियन सिमलेसचा देता येईल. कंपन्यांमधील बंद आणि तडजोडी, आता नित्याचेच होऊ लागले आहे़ नागापूर औद्योगिक वसाहतीतील बहुतांश मोठे उद्योग बंद आहेत. कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापनातील वादातून कंपन्या बंद पडल्या आहेत़ कारखाने बंद करून उद्योजकांनी इतर शहरात धाव घेतली़ पोषक वातावरण असूनही कामगाराच्या प्रॉब्लेममुळे अनेकांनी येथून गाशा गुंडाळला़ त्यामुळे उभारीच्या काळातच येथील कारखान्यांचे बॉयलर थंडावले आणि एमआयडीसी ओस पडली़ त्याचा उद्योजकांपेक्षा कामगारांना मोठा फटका बसला़ कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली़ हाताला काम राहिले नाही़ त्यामुळे अनेक कुटुंब अक्षरश: रस्त्यावर आले़नवीन उद्योग येणे तर दूरच पण, उद्योग बंद पडण्याची परंपरा कायम आहे़ ही परंपरा खंडित करण्यासाठी शहरातून कुणीही प्रयत्न केला नाही़ बहुतांश कारखान्यात कामगारांचे प्रॉब्लेम सुरू झाले आहेत़ कामगार संघटनांनी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी जरुर प्रयत्न करावेत़ मात्र टोकाची भूमिका घेऊ नये, असे उद्योजकांचे मत आहे़ चर्चेतूनच मार्ग निघू शकते. मात्र थेट कंपनी बंद करून कामगारांनी रस्त्यावर उतरणे, ही भूमिका योग्य नाही़ त्यामुळे कामगार व उद्योजकांतील संबंधच बिघडत असून, अतिरिक्त आर्थिक बोजा कंपनीवर पडत असतो. कंपनीचे हितही कामगारांनी लक्षात घ्यायला हवे. इंडियन सिमलेस कंपनीने यशस्वी तडजोड करीत उत्पादन पुन्हा सुरू केले़ त्यामुळे बेकारीचे संकट टळले़ पण प्रत्येकवेळी बंद आणि पुन्हा तडजोडी करण्याची वेळ येत असेल तर नोकरी करायची कशासाठी? असा प्रश्न कामगारांनाही भेडसावत आहे. व्यवस्थापनाने कामगारांच्या हिताचे निर्णय घेणे गरजेचे बनले आहे. नगरच्या औद्योगिक वसाहतीत कामगारांसह इतर अनेक प्रश्न आहेत़ यामुळे व्यवस्थापन-कामगार संघटना यांनी कंपनी बंदची भाषा बंद करण्यापेक्षा त्यातून चर्चेव्दारा मार्ग कसा निघेल, हे पाहणे सर्वांच्या हिताचे आहे.इंडियन सिमलेस कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना यांनी जो सामंजस्यातून तोडगा काढल्याने नगरच्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला चालना देणारा आहे. अशा प्रकारची भूमिका सर्वच कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटनांनी भविष्यात घेणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)