शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

समन्वयातून यशस्वी तोडगा

By admin | Updated: June 16, 2014 00:09 IST

अहमदनगर: नगर एमआयडीसी मधील इंडियन सिमलेस कंपनीतील कामगार संघटना व कंपनी व्यवस्थापनाच्या योग्य समन्वयातून यशस्वी तोडगा निघाला.

अहमदनगर: नगर एमआयडीसी मधील इंडियन सिमलेस कंपनीतील कामगार संघटना व कंपनी व्यवस्थापनाच्या योग्य समन्वयातून यशस्वी तोडगा निघाला. चर्चेतून प्रश्न सुटतो. परंतु कंपनी बंद पाडून कामगारांनी टोकाची भूमिका कधीही घेऊ नये, अशी भूमिका उद्योजक व कंपनी व्यवस्थापनाची असते. याचे उदाहरण म्हणजे इंडियन सिमलेसचा देता येईल. कंपन्यांमधील बंद आणि तडजोडी, आता नित्याचेच होऊ लागले आहे़ नागापूर औद्योगिक वसाहतीतील बहुतांश मोठे उद्योग बंद आहेत. कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापनातील वादातून कंपन्या बंद पडल्या आहेत़ कारखाने बंद करून उद्योजकांनी इतर शहरात धाव घेतली़ पोषक वातावरण असूनही कामगाराच्या प्रॉब्लेममुळे अनेकांनी येथून गाशा गुंडाळला़ त्यामुळे उभारीच्या काळातच येथील कारखान्यांचे बॉयलर थंडावले आणि एमआयडीसी ओस पडली़ त्याचा उद्योजकांपेक्षा कामगारांना मोठा फटका बसला़ कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली़ हाताला काम राहिले नाही़ त्यामुळे अनेक कुटुंब अक्षरश: रस्त्यावर आले़नवीन उद्योग येणे तर दूरच पण, उद्योग बंद पडण्याची परंपरा कायम आहे़ ही परंपरा खंडित करण्यासाठी शहरातून कुणीही प्रयत्न केला नाही़ बहुतांश कारखान्यात कामगारांचे प्रॉब्लेम सुरू झाले आहेत़ कामगार संघटनांनी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी जरुर प्रयत्न करावेत़ मात्र टोकाची भूमिका घेऊ नये, असे उद्योजकांचे मत आहे़ चर्चेतूनच मार्ग निघू शकते. मात्र थेट कंपनी बंद करून कामगारांनी रस्त्यावर उतरणे, ही भूमिका योग्य नाही़ त्यामुळे कामगार व उद्योजकांतील संबंधच बिघडत असून, अतिरिक्त आर्थिक बोजा कंपनीवर पडत असतो. कंपनीचे हितही कामगारांनी लक्षात घ्यायला हवे. इंडियन सिमलेस कंपनीने यशस्वी तडजोड करीत उत्पादन पुन्हा सुरू केले़ त्यामुळे बेकारीचे संकट टळले़ पण प्रत्येकवेळी बंद आणि पुन्हा तडजोडी करण्याची वेळ येत असेल तर नोकरी करायची कशासाठी? असा प्रश्न कामगारांनाही भेडसावत आहे. व्यवस्थापनाने कामगारांच्या हिताचे निर्णय घेणे गरजेचे बनले आहे. नगरच्या औद्योगिक वसाहतीत कामगारांसह इतर अनेक प्रश्न आहेत़ यामुळे व्यवस्थापन-कामगार संघटना यांनी कंपनी बंदची भाषा बंद करण्यापेक्षा त्यातून चर्चेव्दारा मार्ग कसा निघेल, हे पाहणे सर्वांच्या हिताचे आहे.इंडियन सिमलेस कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना यांनी जो सामंजस्यातून तोडगा काढल्याने नगरच्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला चालना देणारा आहे. अशा प्रकारची भूमिका सर्वच कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटनांनी भविष्यात घेणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)