शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

नोकरभरती बंदीविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार

By admin | Updated: October 20, 2016 01:38 IST

अहमदनगर : शासकीय पदभरती व इतर भरतींच्या अघोषित बंदीविरोधात जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी बुधवारी एल्गार पुकारला़ सरकार विद्यार्थ्यांची फसवणूक करत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला़

अहमदनगर : शासकीय पदभरती व इतर भरतींच्या अघोषित बंदीविरोधात जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी बुधवारी एल्गार पुकारला़ सरकार विद्यार्थ्यांची फसवणूक करत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला़ जिल्हाभरातील स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षांची तयारी करणारे हजारो युवक दुपारी वाडीया पार्क येथे जमले़ तेथून हजारोंच्या संख्येने निघालेला स्पर्धा परीक्षार्थींचा महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला़ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले़ विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सरकारावर संताप व्यक्त केला़ अधिकारी व कर्मचाऱ्यांअभावी शासकीय योजनांचा लाभ सर्वसमान्यांना मिळत नाहीत, तर दुसरीकडे सरकारने अघोषित बंदी आणली आहे़ त्यामुळे दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांवर घरी बसण्याची वेळ आली आहे़ स्पर्धा परीक्षा वेळापत्रकानुसार घेऊन आमचा हक्क आम्हाला देण्याची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली़ विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांना निवेदन देऊन मोर्चाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला़ अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा काढण्यात आला़ सरकारने मागण्यांची दखल न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन राज्यभर हाती घेण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला़ राज्यभरातून लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात़ पदवीचे शिक्षण घेऊन लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा मार्ग स्वीकारतात़ अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न असते़ परंतु, स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रकच जाहीर होत नाही़ वेळापत्रक जाहीर झालेच, तर पदसंख्येत मोठी कपात करण्यात येते़ हा एक प्रकारे विद्यार्थ्यांवर अन्याय असून, विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी महामोर्चा काढला असल्याचे यावेळी मोर्चेकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ स्पर्धा परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घ्याव्यात, नोकरभरतीतील पदसंख्येची कपात थांबवा, निवृत्त कर्मचाऱ्यांची कंत्राटी नेमणूक करणे बंद करा, सामान्य अध्ययन विषयाचा निकष राज्यसेवा मुख्य परीक्षेप्रमाणे करा, नोकरीभरतीत पारदर्शकता आणावी, पदभरतीसाठी प्रतीक्ष ायादी तयार करा.४वाडिया पार्क येथून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांचा महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला़ विशेष म्हणजे मोर्चाचे नेतृत्व कोणत्या एकाने केले नाही़ हरीश वाघमळे, राहुल माने, हर्षल यादव, राहुल सुरसे आणि अलंकार वाघमोडे या पाच विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी पालवे यांची भेट घेऊन निवेदन दिले़