शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

नोकरभरती बंदीविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार

By admin | Updated: October 20, 2016 01:38 IST

अहमदनगर : शासकीय पदभरती व इतर भरतींच्या अघोषित बंदीविरोधात जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी बुधवारी एल्गार पुकारला़ सरकार विद्यार्थ्यांची फसवणूक करत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला़

अहमदनगर : शासकीय पदभरती व इतर भरतींच्या अघोषित बंदीविरोधात जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी बुधवारी एल्गार पुकारला़ सरकार विद्यार्थ्यांची फसवणूक करत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला़ जिल्हाभरातील स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षांची तयारी करणारे हजारो युवक दुपारी वाडीया पार्क येथे जमले़ तेथून हजारोंच्या संख्येने निघालेला स्पर्धा परीक्षार्थींचा महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला़ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले़ विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सरकारावर संताप व्यक्त केला़ अधिकारी व कर्मचाऱ्यांअभावी शासकीय योजनांचा लाभ सर्वसमान्यांना मिळत नाहीत, तर दुसरीकडे सरकारने अघोषित बंदी आणली आहे़ त्यामुळे दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांवर घरी बसण्याची वेळ आली आहे़ स्पर्धा परीक्षा वेळापत्रकानुसार घेऊन आमचा हक्क आम्हाला देण्याची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली़ विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांना निवेदन देऊन मोर्चाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला़ अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा काढण्यात आला़ सरकारने मागण्यांची दखल न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन राज्यभर हाती घेण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला़ राज्यभरातून लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात़ पदवीचे शिक्षण घेऊन लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा मार्ग स्वीकारतात़ अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न असते़ परंतु, स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रकच जाहीर होत नाही़ वेळापत्रक जाहीर झालेच, तर पदसंख्येत मोठी कपात करण्यात येते़ हा एक प्रकारे विद्यार्थ्यांवर अन्याय असून, विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी महामोर्चा काढला असल्याचे यावेळी मोर्चेकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ स्पर्धा परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घ्याव्यात, नोकरभरतीतील पदसंख्येची कपात थांबवा, निवृत्त कर्मचाऱ्यांची कंत्राटी नेमणूक करणे बंद करा, सामान्य अध्ययन विषयाचा निकष राज्यसेवा मुख्य परीक्षेप्रमाणे करा, नोकरीभरतीत पारदर्शकता आणावी, पदभरतीसाठी प्रतीक्ष ायादी तयार करा.४वाडिया पार्क येथून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांचा महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला़ विशेष म्हणजे मोर्चाचे नेतृत्व कोणत्या एकाने केले नाही़ हरीश वाघमळे, राहुल माने, हर्षल यादव, राहुल सुरसे आणि अलंकार वाघमोडे या पाच विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी पालवे यांची भेट घेऊन निवेदन दिले़