शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

दरेवाडीत दारूबंदीसाठी विद्यार्थी मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 13:04 IST

ज्या वयात मुलांवर योग्य संस्कार करायचे, त्या वयात मुलांच्या कानावर घरातील भांडणे, तंटे पाहण्याची वेळ येते.

अहमदनगर : ज्या वयात मुलांवर योग्य संस्कार करायचे, त्या वयात मुलांच्या कानावर घरातील भांडणे, तंटे पाहण्याची वेळ येते. रस्त्यावर दारूडे धिंगाणा घालतात, तर बाहेर टुकार टोळके शाळेभोवती घिरट्या घालून मुलींना त्रास देतात. वारंवार होणाऱ्या या घटनांना कंटाळून दरेवाडी येथील शालेय मुलांनीच दारूडे पकडून देण्याची मोहीम राबवली. त्यासाठी मोठ्या धैर्याने पोलिसांना पाचारण केले व त्यांना दारूअड्डे दाखवले. विद्यार्थ्यांच्या या धाडसाचे गावातून कौतुक होत आहे.नगर तालुक्यातील दरेवाडी येथे ग्रामपंचायतीकडून दारूबंदीचा ठराव मंजूर झालेला आहे. परंतु तरीही काहीजण विनापरवाना दारूविक्री करतात. त्यामुळे गावातील वातावरण बिघडले आहे. अनेक कुटुंबांत कलहाचे वातावरण तयार झाले आहे. त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ लागल्याने त्यांनी थेट ग्रामपंचायत व भिंगार पोलीस ठाण्याला पत्र लिहून तक्रार केली. त्याची दखल घेत भिंगार पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप पाटील फौजफाट्यासह गावात दाखल झाले. पाचवी ते आठवीतील सुमारे १५-२० विद्यार्थ्यांनी पोलिसांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. गावातील दारूअड्डे, जुगारअड्डे उद्धवस्त करा. त्याचा आम्हाला खूप त्रास होतो. गावातील तरूण पिढीही व्यसनाधिन होत आहे. रात्री उशिरा हे तरूण रस्त्यावर धिंगाणा घालतात. मळगंगा हायस्कूलमध्येही शाळा सुटल्यावर टुकार टोळके जमा होते. गुटखा खाऊन थुंकणे, मोठ्याने शिव्या देणे, मुलींबाबत शेरेबाजी करणे असे प्रकार सुरू असतात, अशी तक्रार मुलींनी केली. मुलांनी काही दारूविक्रेत्यांची नावे व दारूविक्रीची ठिकाणे पोलिसांना सांगितली. पोलीस पथकाने त्वरित संबंधित ठिकाणी जाऊन दोघांना ताब्यात घेतले, तर इतर काहीजण पोलीस आल्याचे पाहून पसार झाले. पोलीस निरीक्षक पाटील व सरपंच अनिल करांडे यांनी या मुलांच्या धाडसाचे व त्यांच्या कल्पनेचे कौतुक केले व यापुढे कोणी गावात दारू विकताना किंवा मद्यपान केलेला आढळला तर त्याला जागेवरच चोप देण्याची मोहीम सुरू करण्याची ग्वाही दिली.आमच्याकडे दारूसंदर्भात अनेक तक्रारी येतात. परंतु विद्यार्थ्यांनी दारूबंदीसाठी केलेली तक्रार पहिलीच असावी. खरं तर प्रत्येक पालकाने, ग्रामस्थाने याचा गंभीर विचार करण्याची गरज आहे. या चिमुकल्यांनी उठवलेला आवाज खरंच कौतुकास्पद आहे. पोलीस लागेल ती मदत त्यांना करतील. -संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, भिंगार ठाणेविद्यार्थ्यांना घेऊन उद्यापासून गावात दारूबंदीसाठी जनजागृती फेरी काढणार आहोत. दारूबंदीचा ठराव ग्रामपंचायतीने मागेच केला आहे. परंतु चोरून दारूविक्री होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. तक्रार करणा-या विद्यार्थ्यांना कोणी धमकावले तर त्यांचा समाचार गावपातळीवर घेतला जाईल. पोलिसही मदतीला आहेतच. -अनिल करांडे, सरपंच, दरेवाडी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर