शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

दरेवाडीत दारूबंदीसाठी विद्यार्थी मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 13:04 IST

ज्या वयात मुलांवर योग्य संस्कार करायचे, त्या वयात मुलांच्या कानावर घरातील भांडणे, तंटे पाहण्याची वेळ येते.

अहमदनगर : ज्या वयात मुलांवर योग्य संस्कार करायचे, त्या वयात मुलांच्या कानावर घरातील भांडणे, तंटे पाहण्याची वेळ येते. रस्त्यावर दारूडे धिंगाणा घालतात, तर बाहेर टुकार टोळके शाळेभोवती घिरट्या घालून मुलींना त्रास देतात. वारंवार होणाऱ्या या घटनांना कंटाळून दरेवाडी येथील शालेय मुलांनीच दारूडे पकडून देण्याची मोहीम राबवली. त्यासाठी मोठ्या धैर्याने पोलिसांना पाचारण केले व त्यांना दारूअड्डे दाखवले. विद्यार्थ्यांच्या या धाडसाचे गावातून कौतुक होत आहे.नगर तालुक्यातील दरेवाडी येथे ग्रामपंचायतीकडून दारूबंदीचा ठराव मंजूर झालेला आहे. परंतु तरीही काहीजण विनापरवाना दारूविक्री करतात. त्यामुळे गावातील वातावरण बिघडले आहे. अनेक कुटुंबांत कलहाचे वातावरण तयार झाले आहे. त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ लागल्याने त्यांनी थेट ग्रामपंचायत व भिंगार पोलीस ठाण्याला पत्र लिहून तक्रार केली. त्याची दखल घेत भिंगार पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप पाटील फौजफाट्यासह गावात दाखल झाले. पाचवी ते आठवीतील सुमारे १५-२० विद्यार्थ्यांनी पोलिसांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. गावातील दारूअड्डे, जुगारअड्डे उद्धवस्त करा. त्याचा आम्हाला खूप त्रास होतो. गावातील तरूण पिढीही व्यसनाधिन होत आहे. रात्री उशिरा हे तरूण रस्त्यावर धिंगाणा घालतात. मळगंगा हायस्कूलमध्येही शाळा सुटल्यावर टुकार टोळके जमा होते. गुटखा खाऊन थुंकणे, मोठ्याने शिव्या देणे, मुलींबाबत शेरेबाजी करणे असे प्रकार सुरू असतात, अशी तक्रार मुलींनी केली. मुलांनी काही दारूविक्रेत्यांची नावे व दारूविक्रीची ठिकाणे पोलिसांना सांगितली. पोलीस पथकाने त्वरित संबंधित ठिकाणी जाऊन दोघांना ताब्यात घेतले, तर इतर काहीजण पोलीस आल्याचे पाहून पसार झाले. पोलीस निरीक्षक पाटील व सरपंच अनिल करांडे यांनी या मुलांच्या धाडसाचे व त्यांच्या कल्पनेचे कौतुक केले व यापुढे कोणी गावात दारू विकताना किंवा मद्यपान केलेला आढळला तर त्याला जागेवरच चोप देण्याची मोहीम सुरू करण्याची ग्वाही दिली.आमच्याकडे दारूसंदर्भात अनेक तक्रारी येतात. परंतु विद्यार्थ्यांनी दारूबंदीसाठी केलेली तक्रार पहिलीच असावी. खरं तर प्रत्येक पालकाने, ग्रामस्थाने याचा गंभीर विचार करण्याची गरज आहे. या चिमुकल्यांनी उठवलेला आवाज खरंच कौतुकास्पद आहे. पोलीस लागेल ती मदत त्यांना करतील. -संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, भिंगार ठाणेविद्यार्थ्यांना घेऊन उद्यापासून गावात दारूबंदीसाठी जनजागृती फेरी काढणार आहोत. दारूबंदीचा ठराव ग्रामपंचायतीने मागेच केला आहे. परंतु चोरून दारूविक्री होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. तक्रार करणा-या विद्यार्थ्यांना कोणी धमकावले तर त्यांचा समाचार गावपातळीवर घेतला जाईल. पोलिसही मदतीला आहेतच. -अनिल करांडे, सरपंच, दरेवाडी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर