शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

बेलापूर, श्रीरामपुरात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:20 IST

श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या खून प्रकरणाचे बेलापूर तसेच श्रीरामपूर शहरात रविवारी तीव्र पडसाद उमटले. दोन्ही ...

श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या खून प्रकरणाचे बेलापूर तसेच श्रीरामपूर शहरात रविवारी तीव्र पडसाद उमटले. दोन्ही शहरांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. आरोपींना तत्काळ अटक झाली नाहीतर मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. रविवारी बेलापूर येथील आठवडे बाजार होता. मात्र घटनेमुळे तो भरला नाही. शनिवारी देखील येथे बंद पाळण्यात आला होता. शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

श्रीरामपूर शहरात व्यापारी असोसिएशनने दुपारी १२ वाजता शहरातून फेरी काढली. यात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. मुख्य रस्ता, शिवाजी रस्त्यावर फिरून व्यावसायिकांना बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानंतर हनुमान मंदिर येथे सभा घेण्यात आली. यात पोलिसांच्या तपासाविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली. काही संशयितांची नावे देऊनही त्यांचे मोबाईल कॉल्स तपासण्यात आले नाहीत. त्यामुळे वेळ वाया गेला असा आरोप काही नेत्यांनी केला.

घटनेमुळे संपूर्ण व्यापारी समाज भयभीत झालेला आहे. कायद्याचा धाक राहिलेला नाही. हिरण यांच्याबाबत घडलेली घटना इतरांबाबतही घडू शकते. त्यामुळे पोलिसांनी तातडीने गुन्ह्याचा छडा लावावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आरोपींना अटक झाली नाही तर तीव्र आंदोलन हाती घेण्याचा यावेळी इशारा देण्यात आला. त्यानंतर व्यापाऱ्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली. दरम्यान, आरोपींना तत्काळ अटक झाली नाही अथवा ठोस कारवाईचे आश्वासन मिळाले नाही तर मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका बेलापूर ग्रामस्थांनी घेतली आहे. घाटी येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलेला मृतदेह सोमवारी प्राप्त होण्याची शक्यता आहे.

-----------