शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

चाळीस कोटी रुपयांच्या कामांची स्थगिती उठविली

By admin | Updated: April 22, 2016 00:16 IST

अहमदनगर : फेज टू पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण असल्याचे कारण पुढे करत शासनाने मूलभूत निधीच्या चाळीस कोटी रुपयांच्या निधीच्या खर्चाला दिलेली स्थगिती उठविली आहे,

अहमदनगर : फेज टू पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण असल्याचे कारण पुढे करत शासनाने मूलभूत निधीच्या चाळीस कोटी रुपयांच्या निधीच्या खर्चाला दिलेली स्थगिती उठविली आहे, अशी माहिती महापौर अभिषेक कळमकर यांनी दिली. आॅगस्टपर्यंत फेज टू पाणी योजनेचे काम पूर्ण करा, अशी सूचना ही स्थगिती उठविताना दिली असल्याचे त्यांनी सांगितले. प्राथमिक मूलभूत सोईसुविधा योजनेंतर्गत नगर महापालिकेला शासनाने वीस कोटी रुपयांचा निधी दिला. तितकाच निधी महापालिकेला टाकून शहरात चाळीस कोटी रुपयांची कामे करावयाची आहेत. चाळीस कोटी रुपयांच्या निधीतील कामांच्या प्रस्तावास विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली. मात्र त्यानंतर युतीच्या नगरसेवकांनी फेज टू पाणी योजनेसाठी रस्ते खोदाई होणार असून ही खोदाई झाल्यानंतरच हा निधी खर्च करावा. तोपर्यंत निधीतील कामे करू नये अशी मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार शासनाने चाळीस कोटी रुपये निधी खर्चास स्थगिती दिली होती. आमदार संग्राम जगताप, माजी आमदार दादा कळमकर, महापौर अभिषेक कळमकर यांनी मुंबईत गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चाळीस कोटी रुपयांतील प्रस्तावित कामे होणे कसे गरजेचे आहे, हे सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चाळीस कोटी रुपयांच्या कामांना दिलेली स्थगिती उठविण्याचे आदेश दिले. फेज टू पाणी योजनेच्या कामांचा या निधीतून प्रस्तावित कामास अडथळा येत नाही, ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. आॅगस्टपर्यंत फेज टू पाणी योजनेचे काम पूर्ण करण्याची सूचना यावेळी देण्यात आली आहे, असेही कळमकर यांनी सांगितले.(प्रतिनिधी)चाळीस कोटी रुपयांच्या निधी खर्चास मंजुरी देण्यात अडचणी येत असतानाच निधी खर्चाची मुदत संपली होती. त्यामुळे शासनाकडे महापालिकेने मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविला होता. तो विषयही महापौर कळमकर यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना उपस्थित केला. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी हा निधी खर्च करण्यास आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसे आदेश नगरविकास विभागाने काढले असून ते ई-मेलद्वारे महापालिकेला पाठविले असल्याचे कळमकर म्हणाले.