शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:21 IST

कोपरगाव : महावितरणने तालुक्यासह मतदार संघातील वीजबिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोेहीम सुरु केली आहे. त्यामुळे ...

कोपरगाव : महावितरणने तालुक्यासह मतदार संघातील वीजबिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोेहीम सुरु केली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अगोदरच विविध संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी याविरोधात कठोर पाऊल उचलले तर त्याला राज्य सरकार जबाबदार राहील. त्यामुळे महावितरणने ही मोहीम त्वरित थांबवून कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा याविरोधात तीव्र जनआंदोलन उभारू, असा इशारा जिल्हा सहकारी बॅंकेचे नवनिर्वाचित संचालक विवेक कोल्हे यांनी दिला आहे.

कोल्हे म्हणाले, देशासह राज्यभरात कोरोनामुळे लाॅकडाऊन करण्यात आले होते. या कालावधीत अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसह शेतकऱ्यांनाही याचा फटका बसला. लाॅकडाऊन, अतिवृष्टी या समस्यांनी जर्जर झालेल्या बळीराजाची रब्बी पिकांमुळे आर्थिक विवंचना कमी होईल, असे वाटत असतानाच महावितरणने कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु केली आहे. यामुळे रब्बीतील पिकेही हातची जावून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.

..

निर्णय अन्यायकारक

वास्तविक राज्य सरकारने सत्तेवर येताच वीजबिलांसह कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचप्रमाणे १०० युनिट वीज मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, याकडे दुर्लक्ष करून वीजप्रवाह तोडण्याचा घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. खरिपातील पिके वाया गेल्याने ती उभे करण्यासाठी घेतलेले कर्जही फिटलेले नाही. रब्बीच्या मोसमात विहिरीमध्ये पाणीसाठा असताना वीजप्रवाह खंडित केल जात असल्याने संकटात अधिकच भर पडल्याचे कोल्हे यांनी सांगितले.