शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:21 IST

कोपरगाव : महावितरणने तालुक्यासह मतदार संघातील वीजबिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोेहीम सुरु केली आहे. त्यामुळे ...

कोपरगाव : महावितरणने तालुक्यासह मतदार संघातील वीजबिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोेहीम सुरु केली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अगोदरच विविध संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी याविरोधात कठोर पाऊल उचलले तर त्याला राज्य सरकार जबाबदार राहील. त्यामुळे महावितरणने ही मोहीम त्वरित थांबवून कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा याविरोधात तीव्र जनआंदोलन उभारू, असा इशारा जिल्हा सहकारी बॅंकेचे नवनिर्वाचित संचालक विवेक कोल्हे यांनी दिला आहे.

कोल्हे म्हणाले, देशासह राज्यभरात कोरोनामुळे लाॅकडाऊन करण्यात आले होते. या कालावधीत अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसह शेतकऱ्यांनाही याचा फटका बसला. लाॅकडाऊन, अतिवृष्टी या समस्यांनी जर्जर झालेल्या बळीराजाची रब्बी पिकांमुळे आर्थिक विवंचना कमी होईल, असे वाटत असतानाच महावितरणने कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु केली आहे. यामुळे रब्बीतील पिकेही हातची जावून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.

..

निर्णय अन्यायकारक

वास्तविक राज्य सरकारने सत्तेवर येताच वीजबिलांसह कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचप्रमाणे १०० युनिट वीज मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, याकडे दुर्लक्ष करून वीजप्रवाह तोडण्याचा घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. खरिपातील पिके वाया गेल्याने ती उभे करण्यासाठी घेतलेले कर्जही फिटलेले नाही. रब्बीच्या मोसमात विहिरीमध्ये पाणीसाठा असताना वीजप्रवाह खंडित केल जात असल्याने संकटात अधिकच भर पडल्याचे कोल्हे यांनी सांगितले.