शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:21 IST

कोपरगाव : महावितरणने तालुक्यासह मतदार संघातील वीजबिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोेहीम सुरु केली आहे. त्यामुळे ...

कोपरगाव : महावितरणने तालुक्यासह मतदार संघातील वीजबिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोेहीम सुरु केली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अगोदरच विविध संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी याविरोधात कठोर पाऊल उचलले तर त्याला राज्य सरकार जबाबदार राहील. त्यामुळे महावितरणने ही मोहीम त्वरित थांबवून कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा याविरोधात तीव्र जनआंदोलन उभारू, असा इशारा जिल्हा सहकारी बॅंकेचे नवनिर्वाचित संचालक विवेक कोल्हे यांनी दिला आहे.

कोल्हे म्हणाले, देशासह राज्यभरात कोरोनामुळे लाॅकडाऊन करण्यात आले होते. या कालावधीत अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसह शेतकऱ्यांनाही याचा फटका बसला. लाॅकडाऊन, अतिवृष्टी या समस्यांनी जर्जर झालेल्या बळीराजाची रब्बी पिकांमुळे आर्थिक विवंचना कमी होईल, असे वाटत असतानाच महावितरणने कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु केली आहे. यामुळे रब्बीतील पिकेही हातची जावून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.

..

निर्णय अन्यायकारक

वास्तविक राज्य सरकारने सत्तेवर येताच वीजबिलांसह कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचप्रमाणे १०० युनिट वीज मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, याकडे दुर्लक्ष करून वीजप्रवाह तोडण्याचा घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. खरिपातील पिके वाया गेल्याने ती उभे करण्यासाठी घेतलेले कर्जही फिटलेले नाही. रब्बीच्या मोसमात विहिरीमध्ये पाणीसाठा असताना वीजप्रवाह खंडित केल जात असल्याने संकटात अधिकच भर पडल्याचे कोल्हे यांनी सांगितले.