शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

राज्यात आघाडीला ३० पेक्षा अधिक जागा मिळतील - जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 15:26 IST

पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपाला अकोले वगळता कुठेही यश मिळणार नाही. नितीन गडकरी सुद्धा पराभवाच्या छायेत आहेत.

राहुरी : पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपाला अकोले वगळता कुठेही यश मिळणार नाही. नितीन गडकरी सुद्धा पराभवाच्या छायेत आहेत. विदर्भात भाजपाची ही अवस्था असेल तर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या ३० पेक्षा जास्त जागा निवडून येतील, असे सूतोवाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.कणगर येथे बुधवारी राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचार सभेत जयंत पाटील बोलत होते. आमदार जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, विनायक देशमुख, नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, रोहिदास कर्डिले, सुरेश वाबळे, डॉ.उषाताई तनपुरे, बाबासाहेब भिटे, अजित कदम, मनिषा ओहोळ, बाळासाहेब लटके, नंदा गाढे, अ‍ॅड.शारदा लगड, प्रमिला कोळसे, सुयोग नालकर उपस्थित होते.पाटील पुढे म्हणाले, मोदींनी सामान्य जनतेला फसवले. इतिहासातील उच्चांकी बेरोजगारी झाली. उरी, पठाणकोट, पुलवामा असे मोठे हल्ले देशावर झाले. कुणीही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला नाही. उलट सैनिकांच्या नावाने मतांचा जोगवा मागत आहेत. निवडणुकीनंतर एनडीएमधील काही घटकपक्ष शरद पवार यूपीएमध्ये आणतील. पंतप्रधानपद जाईल, या भीतीने मोदी राष्ट्रवादी व पवार यांच्यावर टीका करीत आहेत. यूपीए सरकार सत्तेवर आले तर शेतकऱ्यांना पवार यांच्या व्याख्येतील सरसकट कर्जमाफी दिली जाईल. चार महिन्यानंतर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येईल. निळवंडे कालव्याची कामे पूर्ण करू. स्व. शिवाजी गाडे यांनी सुजय विखे यांना उमेदवारी देऊ नका, असे सांगितले होते. संग्राम जगताप यांचा विजय पक्का आहे, असेही पाटील यांनी सांगितले.आमदार आव्हाड म्हणाले, मोदी यांच्या सभेनंतर फिरणाºया तीन क्लिपमुळे नगरकरांना शरमेने मान खाली घालावी लागली. नोटाबंदी सर्वात मोठा घोटाळा आहे. शेतकरी आत्महत्या, पाच वर्षात काय केले. यावर मोदी बोलत नाहीत. त्यांनी हिंदू मुस्लिम द्वेष वाढविला. देशाच्या सैनिकांचा आम्हाला अभिमान आहे. परंतु, पुलवामा घटनेत ३५० किलो आरडीएक्स कुठून आले. याचे उत्तर देत नाहीत. मोदींचा पराभव केला नाही तर हिटलर पुन्हा जन्माला येईल, असेही आव्हाड यांनी सांगितले.स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, दादासाहेब पवार, अजित कदम, अ‍ॅड.पंढरीनाथ पवार, तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे यांची भाषणे झाली. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019