शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

राज्य सरकारने नागरिकत्त्व दुरुस्ती बिलास विरोध करावा-मेधा पाटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 13:57 IST

संसदेत मंजूर झालेले नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयक ही एकप्रकारे हिटलरशाहीच्या दिशेने सुरु झालेली वाटचाल आहे. हे बिल केवळ मुस्लिमांच्या विरोधात आहे असे नव्हे तर संविधानाच्या विरोधात आहे. त्यामुळे राज्यातील सरकारने या बिलास विरोध करावा. केवळ तटस्थ राहणे हा पर्याय नाही,असे प्रतिपादन जनआंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केले.

संगमनेर : संसदेत मंजूर झालेले नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयक ही एकप्रकारे हिटलरशाहीच्या दिशेने सुरु झालेली वाटचाल आहे. हे बिल केवळ मुस्लिमांच्या विरोधात आहे असे नव्हे तर संविधानाच्या विरोधात आहे. त्यामुळे राज्यातील सरकारने या बिलास विरोध करावा. केवळ तटस्थ राहणे हा पर्याय नाही,असे प्रतिपादन जनआंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केले.दिवंगत स्वातंत्र्यसैनिक भास्करराव दुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त येथे सुरु असलेल्या समाजवादी कार्यकर्ता संमेलनानिमित्त पाटकर यांची जाहीर सभा झाली. यावेळी व्यासपीठावर हरजिंदरसिंह (कवी लालटू), राजा अवसक, अ‍ॅड. निशाताई शिवूरकर, प्रदीप मालपाणी, सदाभाऊ मगदूम, जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत यांची उपस्थिती होती.पाटकर म्हणाल्या, सध्या देशात व्होट बँकेच्या आधारे लोकांना घाबरविण्याचे राजकारण सुरु आहे. लोकांचा आवाजच दाबला जात आहे. लोकांच्या हक्कासाठी जो लढेल त्याला तुरुंगात टाकले जात आहे. नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयक मंजूर करताना ठरवून मुस्लिम धर्माला वगळले गेले. आपली राज्यघटना विशिष्ट धर्मांची नाही. ती सर्वधर्मनिरपेक्षता सांगते. मात्र या विधेयकाने घटनाच मोडीत काढण्याचे काम केले आहे. त्यामुळे गावोगावी या विधेयकाच्या विरोधात आंदोलन उभे राहणे आवश्यक आहे. समाजवादी कार्यकर्त्यांनी त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. जनतेनेही नागरिकत्त्वाच्या नोंदीसाठी कुठलीही कागदपत्रे न देता असहकार पुकारावा.संसदेत विविध राजकीय पक्षांनी या विधेयकास विरोध केला. मात्र, काही पक्ष तटस्थ राहिले आहेत. अशी तटस्थताही योग्य नाही. कारण पुढील निवडणुकीत या राजकीय पक्षांना याबाबत लोकांना उत्तर द्यावे लागेल. महाराष्ट्रात नवे पर्यायी सरकार स्थापन झाले आहे. या सरकारने नवा विकल्प देऊ केला आहे. त्यामुळे या सरकारने या विधेयकाच्या विरोधात भूमिका घ्यायला हवी. जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत यांनी सभेचे सूत्रसंचालन केले. हनुमंत उबाळे यांनी आभार मानले.मंत्रालयाचे दरवाजे उघडल्यासारखे वाटलेमी मुंबईत मंत्रालयात गेले होते. तेव्हा तेथील दरवाजे उघडे पाहून बरे वाटले. गत पाच वर्षे वाईट परिस्थिती होती, असेही मेधा पाटकर म्हणाल्या. आपली काहीही चूक नसताना पासपोर्ट जप्त करण्यात आला. मला जे पत्र पाठविले गेले त्यावर अधिकाºयांची स्वाक्षरी देखील नव्हती. उत्तर देण्याची संधी देखील आपणाला दिली गेली नाही. बडवानी येथे माझे कार्यालय असताना व मी तेथे राहत असतानाही मला फरार दाखविले गेले. हे सगळे आश्चर्यकारक आहे, असेही त्या म्हणाल्या. 

टॅग्स :Medha Patkarमेधा पाटकरSangamnerसंगमनेर