शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

राज्य सरकारने नागरिकत्त्व दुरुस्ती बिलास विरोध करावा-मेधा पाटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 13:57 IST

संसदेत मंजूर झालेले नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयक ही एकप्रकारे हिटलरशाहीच्या दिशेने सुरु झालेली वाटचाल आहे. हे बिल केवळ मुस्लिमांच्या विरोधात आहे असे नव्हे तर संविधानाच्या विरोधात आहे. त्यामुळे राज्यातील सरकारने या बिलास विरोध करावा. केवळ तटस्थ राहणे हा पर्याय नाही,असे प्रतिपादन जनआंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केले.

संगमनेर : संसदेत मंजूर झालेले नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयक ही एकप्रकारे हिटलरशाहीच्या दिशेने सुरु झालेली वाटचाल आहे. हे बिल केवळ मुस्लिमांच्या विरोधात आहे असे नव्हे तर संविधानाच्या विरोधात आहे. त्यामुळे राज्यातील सरकारने या बिलास विरोध करावा. केवळ तटस्थ राहणे हा पर्याय नाही,असे प्रतिपादन जनआंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केले.दिवंगत स्वातंत्र्यसैनिक भास्करराव दुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त येथे सुरु असलेल्या समाजवादी कार्यकर्ता संमेलनानिमित्त पाटकर यांची जाहीर सभा झाली. यावेळी व्यासपीठावर हरजिंदरसिंह (कवी लालटू), राजा अवसक, अ‍ॅड. निशाताई शिवूरकर, प्रदीप मालपाणी, सदाभाऊ मगदूम, जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत यांची उपस्थिती होती.पाटकर म्हणाल्या, सध्या देशात व्होट बँकेच्या आधारे लोकांना घाबरविण्याचे राजकारण सुरु आहे. लोकांचा आवाजच दाबला जात आहे. लोकांच्या हक्कासाठी जो लढेल त्याला तुरुंगात टाकले जात आहे. नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयक मंजूर करताना ठरवून मुस्लिम धर्माला वगळले गेले. आपली राज्यघटना विशिष्ट धर्मांची नाही. ती सर्वधर्मनिरपेक्षता सांगते. मात्र या विधेयकाने घटनाच मोडीत काढण्याचे काम केले आहे. त्यामुळे गावोगावी या विधेयकाच्या विरोधात आंदोलन उभे राहणे आवश्यक आहे. समाजवादी कार्यकर्त्यांनी त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. जनतेनेही नागरिकत्त्वाच्या नोंदीसाठी कुठलीही कागदपत्रे न देता असहकार पुकारावा.संसदेत विविध राजकीय पक्षांनी या विधेयकास विरोध केला. मात्र, काही पक्ष तटस्थ राहिले आहेत. अशी तटस्थताही योग्य नाही. कारण पुढील निवडणुकीत या राजकीय पक्षांना याबाबत लोकांना उत्तर द्यावे लागेल. महाराष्ट्रात नवे पर्यायी सरकार स्थापन झाले आहे. या सरकारने नवा विकल्प देऊ केला आहे. त्यामुळे या सरकारने या विधेयकाच्या विरोधात भूमिका घ्यायला हवी. जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत यांनी सभेचे सूत्रसंचालन केले. हनुमंत उबाळे यांनी आभार मानले.मंत्रालयाचे दरवाजे उघडल्यासारखे वाटलेमी मुंबईत मंत्रालयात गेले होते. तेव्हा तेथील दरवाजे उघडे पाहून बरे वाटले. गत पाच वर्षे वाईट परिस्थिती होती, असेही मेधा पाटकर म्हणाल्या. आपली काहीही चूक नसताना पासपोर्ट जप्त करण्यात आला. मला जे पत्र पाठविले गेले त्यावर अधिकाºयांची स्वाक्षरी देखील नव्हती. उत्तर देण्याची संधी देखील आपणाला दिली गेली नाही. बडवानी येथे माझे कार्यालय असताना व मी तेथे राहत असतानाही मला फरार दाखविले गेले. हे सगळे आश्चर्यकारक आहे, असेही त्या म्हणाल्या. 

टॅग्स :Medha Patkarमेधा पाटकरSangamnerसंगमनेर