शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीच्या आवर्तनात राजकीत अडथळा, प्रशासन हतबल

By admin | Updated: May 3, 2016 23:50 IST

श्रीगोंदा : जमावबंदी आदेश झुगारुन काही नेते व कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्याने कुकडीच्या आवर्तनात अडथळा निर्माण झाला आहे.

श्रीगोंदा : जमावबंदी आदेश झुगारुन काही नेते व कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्याने कुकडीच्या आवर्तनात अडथळा निर्माण झाला आहे. काहींनी चाऱ्या उघडल्या तर काहींनी स्वत:च्या शेततळ्यात पाणी नेले. त्यामुळे हतबल झालेल्या प्रशासकीय यंत्रणेने कि. मी. क्रमांक १३२ जोड कालवा बंद केला. वेळू तलाव, गवते खाण अर्धवट भरली आहे. त्यामुळे बाबुर्डी, लिंपणगाव, मढेवडगाव, म्हातारपिंप्री, लोणीव्यंकनाथ येथे जलसंकट उभे राहिले आहे. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी भीषण पाणीटंचाई विचारात घेऊन वेळू तलाव व गवते खाण भरण्याचे आदेश करताना लोणीव्यंकनाथ केटीवेअर व गोठण तलावात पाणी सोडण्यावर उचित कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जलसंपदा विभागाने नियोजन करीत १३२ जोड कालव्यास पाणी सोडले, परंतु श्रीगोंदा, लोणीव्यंकनाथ व पारगाव सुद्रिक येथे रविवारी काहींनी चाऱ्या फोडून पाणी शेततळ्यात वळविले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जलसंपदा विभागाने १३२ कालवा काही तास अगोदरच बंद केला. त्यामुळे काही नेत्यांचा मीपणा सामान्य नागरिकांना चांगलाच भोवला. सोमवारी रात्री उशिरा माजी मंत्री बबनराव पाचपुते व कुकडीचे कार्यकारी अभियंता सुभाष कोळी यांच्यात १३२ ला पाणी सोडण्यासंदर्भात चर्चा झाली. कोळी म्हणाले, ५०० एमसीएफटी पाणी वाढून मिळाल्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन पाणी सोडता येईल. ( तालुका प्रतिनिधी) ‘रेल रोको’चा इशारा कुकडीच्या पाण्यासाठी बाबुर्डी, मढेवडगाव, म्हातारपिंप्रीमधील कार्यकर्त्यांनी सोमवारी कार्यकारी अभियंता सुभाष कोळी यांना घेराव घातला तर भाजपाचे लिंपणगाव येथील कार्यकर्ते नंदकुमार कोकाटे यांनी लिंपणगाव येथील तलावात पाणी सोडावे, यासाठी रेल रोको करण्याचा इशारा दिला. पोलीस गायब, कालवा बंद जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी कुकडी कालव्यावर जमावबंदी आदेश लागू केला होता. रविवारी १३२ वरील चाऱ्या ठिकठिकाणी फोडण्यात आल्या. त्यामुळे पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाया गेले. मात्र एकही पोलीस अथवा अधिकारी कालव्यावर फिरकला नाही, त्यामुळे नियोजन कोलमडले. परिणामी १३२ चा कालवा प्रशासनास काही तास अगोदरच बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे चार गावांवर जलसंकट उभे राहिले आहे.