शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

कुकडीच्या आवर्तनात राजकीत अडथळा, प्रशासन हतबल

By admin | Updated: May 3, 2016 23:50 IST

श्रीगोंदा : जमावबंदी आदेश झुगारुन काही नेते व कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्याने कुकडीच्या आवर्तनात अडथळा निर्माण झाला आहे.

श्रीगोंदा : जमावबंदी आदेश झुगारुन काही नेते व कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्याने कुकडीच्या आवर्तनात अडथळा निर्माण झाला आहे. काहींनी चाऱ्या उघडल्या तर काहींनी स्वत:च्या शेततळ्यात पाणी नेले. त्यामुळे हतबल झालेल्या प्रशासकीय यंत्रणेने कि. मी. क्रमांक १३२ जोड कालवा बंद केला. वेळू तलाव, गवते खाण अर्धवट भरली आहे. त्यामुळे बाबुर्डी, लिंपणगाव, मढेवडगाव, म्हातारपिंप्री, लोणीव्यंकनाथ येथे जलसंकट उभे राहिले आहे. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी भीषण पाणीटंचाई विचारात घेऊन वेळू तलाव व गवते खाण भरण्याचे आदेश करताना लोणीव्यंकनाथ केटीवेअर व गोठण तलावात पाणी सोडण्यावर उचित कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जलसंपदा विभागाने नियोजन करीत १३२ जोड कालव्यास पाणी सोडले, परंतु श्रीगोंदा, लोणीव्यंकनाथ व पारगाव सुद्रिक येथे रविवारी काहींनी चाऱ्या फोडून पाणी शेततळ्यात वळविले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जलसंपदा विभागाने १३२ कालवा काही तास अगोदरच बंद केला. त्यामुळे काही नेत्यांचा मीपणा सामान्य नागरिकांना चांगलाच भोवला. सोमवारी रात्री उशिरा माजी मंत्री बबनराव पाचपुते व कुकडीचे कार्यकारी अभियंता सुभाष कोळी यांच्यात १३२ ला पाणी सोडण्यासंदर्भात चर्चा झाली. कोळी म्हणाले, ५०० एमसीएफटी पाणी वाढून मिळाल्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन पाणी सोडता येईल. ( तालुका प्रतिनिधी) ‘रेल रोको’चा इशारा कुकडीच्या पाण्यासाठी बाबुर्डी, मढेवडगाव, म्हातारपिंप्रीमधील कार्यकर्त्यांनी सोमवारी कार्यकारी अभियंता सुभाष कोळी यांना घेराव घातला तर भाजपाचे लिंपणगाव येथील कार्यकर्ते नंदकुमार कोकाटे यांनी लिंपणगाव येथील तलावात पाणी सोडावे, यासाठी रेल रोको करण्याचा इशारा दिला. पोलीस गायब, कालवा बंद जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी कुकडी कालव्यावर जमावबंदी आदेश लागू केला होता. रविवारी १३२ वरील चाऱ्या ठिकठिकाणी फोडण्यात आल्या. त्यामुळे पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाया गेले. मात्र एकही पोलीस अथवा अधिकारी कालव्यावर फिरकला नाही, त्यामुळे नियोजन कोलमडले. परिणामी १३२ चा कालवा प्रशासनास काही तास अगोदरच बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे चार गावांवर जलसंकट उभे राहिले आहे.