शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

‘स्टॅण्डिंग’मुळे ऊठ‘बस’

By admin | Updated: June 19, 2014 00:10 IST

अहमदनगर: प्रसन्ना पर्पल अभिकर्ता संस्थेने बुधवारपासून शहर बससेवा बंद केली. या निर्णयाने दिवसभरात शहरातील पाच हजार प्रवाशांचे हाल झाले.

अहमदनगर: प्रसन्ना पर्पल अभिकर्ता संस्थेने बुधवारपासून शहर बससेवा बंद केली. या निर्णयाने दिवसभरात शहरातील पाच हजार प्रवाशांचे हाल झाले. प्रवासी, विद्यार्थी रस्त्यावर ताटकळत उभे असल्याचे चित्र ठिकठिकाणच्या रस्त्यावर दिसत होते. स्थायी समितीच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करत अभिकर्ता संस्थेने सेवा बंद करून बसेसही शहराबाहेर हलविल्या. गत तीन वर्षापासून शहरात प्रसन्न पर्पल मोबालिटी ही अभिकर्ता संस्था शहर बससेवा चालवित आहे. संस्थेला आतापर्यंत दोन कोटी रुपयांचा तोटा झाला. तोट्यातील नुकसान भरपाई देण्यास महापालिकेने असमर्थता दर्शविली आहे. स्थायी समितीने तसा निर्णय घेतला. त्यामुळे तोटा सहन करून सेवा देणे शक्य नसल्याचे सांगत संस्थेच्या संचालक मंडळाने बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. बससेवा बंद करू नये असे पत्र मंगळवारीच महापालिकेने संस्थेला दिले. शहरात २३ बसेस सुरू होत्या या बसेसमधून सुटीच्या काळात दररोज पाच हजार प्रवासी प्रवास करायचे. अन्य काळात प्रवासी संख्या १५ हजाराच्या आसपास असायची. बससेवा बंद झाल्याने शहर बससेवेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. प्रवासी व विद्यार्थ्यांना रिक्षाचा आधार घ्यावा लागला. पर्याय नसल्याने रिक्षाचालकांच्या अरेरावीला प्रवाशांना सामोरे जावे लागले. शाळा सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचेही हाल झाले. शाळा, कॉलेजबाहेर विद्यार्थी ताटकळत उभे होते. (प्रतिनिधी)महापालिका आयुक्त विजय कुलकर्णी हे रजेवर आहेत. त्यामुळे अभिकर्ता संस्थेने शहर बससेवा बंद करण्याचा निर्णय घेऊनही प्रशासनाच्यावतीने कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. बससेवा बंद करत असल्याचे पत्र मनपा प्रशासनाला मिळाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.