शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

पाण्यासाठी महापालिकेत ठिय्या

By admin | Updated: March 16, 2016 08:29 IST

अहमदनगर : महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा व ठेकेदारावर नसलेल्या नियंत्रणामुळे कल्याण रस्ता परिसरातील हजारो नागरिकांच्या वसाहतीत पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे.

अहमदनगर : महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा व ठेकेदारावर नसलेल्या नियंत्रणामुळे कल्याण रस्ता परिसरातील हजारो नागरिकांच्या वसाहतीत पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. नगरसेविकेने पाठपुरावा करूनही प्रशासनाने पाणीप्रश्न सोडविला नाही, त्यामुळे संतापलेल्या सुमारे पाचशे नागरिकांनी महापालिकेवर मंगळवारी मोर्चा काढला. सकारात्मक तोडगा निघत नाही, तोपर्यंत आयुक्तांच्या दालनाबाहेर मोर्चेकऱ्यांनी ठिय्या दिला. तत्काळ काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. नगरसेविका उषा शरद ठाणगे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पाचशे नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा आणला. मोर्चा येणार असल्याने मनपा प्रशासनाने अगोदरच पोलीस बंदोबस्त मागविला होता. मुख्य प्रशासकीय इमारतीत नागरिकांनी ठिय्या मांडला. आमचा प्रभाग टॅँकरमुक्त करा, अशी मागणी करत प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर, प्रशांत सोसायटी, भृंगऋषी सोसायटीसह अन्य वसाहतींत पाण्याची समस्या आहे. रात्री-बेरात्री सुटणारे पाणी, काही भागांना तर टॅँकरने पाणी पुरवठा यामुळे नागरिक बेजार झाले आहेत. फेज टू पाणी योजनेची पाईपलाईन टाकून झाली, फक्त सीना नदीवरील पुलावर लाईन टाकणे बाकी आहे. मात्र, गत दोन वर्षांपासून ही लाईन टाकलेली नाही. आमदार संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, नगरसेविका उषा ठाणगे यांच्यासमोबत प्रशासनाची बैठक झाली, पण तरीही प्रशासनाने हे काम केले नाही. परिणामी या भागातील पाणी समस्या कायम आहे. पाणी योजनेच्या ठेकेदाराने हे काम करण्यास नकार दिला आहे. मनपाचा अंदाजीत खर्च व ठेकेदाराचा खर्च यात तफावत असल्याने हे काम होत नाही. ठेकेदार काम करत नसेल तर स्वखर्चातून काम करण्याची तयारीही उषा ठाणगे यांनी दाखविली. आयुक्त विलास ढगे यांनी तत्काळ ठेकेदाराशी संपर्क साधून काम सुरू करण्याचे आदेश दिले. तसे लेखी आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिले. त्यानंतर मोर्चा माघारी घेण्यात आला. नगरसेविका उषा ठाणगे यांनी सीना नदीच्या पुलावरील पाईपलाईन पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. ही लाईन टाकून झाली तरी कल्याण रस्ता परिसरातील नागरिकांची पाण्याची समस्या सूटणार आहे. उपायुक्त अजय चारठाणकर, पाणी पुरवठा विभागप्रमुख परिमल निकम यांच्याशी चर्चा केली. दिवाळीनंतर पंधरा दिवसात पुलावरील पाईपलाईन टाकून दोन महिन्यात पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. मात्र, अजूनपर्यंत ही लाईन सुरू झालेली नाही. ही नागरिकांची फसवणूक असल्याचे ठाणगे यांचे म्हणणे आहे.