शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

पाण्यासाठी महापालिकेत ठिय्या

By admin | Updated: March 16, 2016 08:29 IST

अहमदनगर : महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा व ठेकेदारावर नसलेल्या नियंत्रणामुळे कल्याण रस्ता परिसरातील हजारो नागरिकांच्या वसाहतीत पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे.

अहमदनगर : महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा व ठेकेदारावर नसलेल्या नियंत्रणामुळे कल्याण रस्ता परिसरातील हजारो नागरिकांच्या वसाहतीत पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. नगरसेविकेने पाठपुरावा करूनही प्रशासनाने पाणीप्रश्न सोडविला नाही, त्यामुळे संतापलेल्या सुमारे पाचशे नागरिकांनी महापालिकेवर मंगळवारी मोर्चा काढला. सकारात्मक तोडगा निघत नाही, तोपर्यंत आयुक्तांच्या दालनाबाहेर मोर्चेकऱ्यांनी ठिय्या दिला. तत्काळ काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. नगरसेविका उषा शरद ठाणगे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पाचशे नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा आणला. मोर्चा येणार असल्याने मनपा प्रशासनाने अगोदरच पोलीस बंदोबस्त मागविला होता. मुख्य प्रशासकीय इमारतीत नागरिकांनी ठिय्या मांडला. आमचा प्रभाग टॅँकरमुक्त करा, अशी मागणी करत प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर, प्रशांत सोसायटी, भृंगऋषी सोसायटीसह अन्य वसाहतींत पाण्याची समस्या आहे. रात्री-बेरात्री सुटणारे पाणी, काही भागांना तर टॅँकरने पाणी पुरवठा यामुळे नागरिक बेजार झाले आहेत. फेज टू पाणी योजनेची पाईपलाईन टाकून झाली, फक्त सीना नदीवरील पुलावर लाईन टाकणे बाकी आहे. मात्र, गत दोन वर्षांपासून ही लाईन टाकलेली नाही. आमदार संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, नगरसेविका उषा ठाणगे यांच्यासमोबत प्रशासनाची बैठक झाली, पण तरीही प्रशासनाने हे काम केले नाही. परिणामी या भागातील पाणी समस्या कायम आहे. पाणी योजनेच्या ठेकेदाराने हे काम करण्यास नकार दिला आहे. मनपाचा अंदाजीत खर्च व ठेकेदाराचा खर्च यात तफावत असल्याने हे काम होत नाही. ठेकेदार काम करत नसेल तर स्वखर्चातून काम करण्याची तयारीही उषा ठाणगे यांनी दाखविली. आयुक्त विलास ढगे यांनी तत्काळ ठेकेदाराशी संपर्क साधून काम सुरू करण्याचे आदेश दिले. तसे लेखी आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिले. त्यानंतर मोर्चा माघारी घेण्यात आला. नगरसेविका उषा ठाणगे यांनी सीना नदीच्या पुलावरील पाईपलाईन पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. ही लाईन टाकून झाली तरी कल्याण रस्ता परिसरातील नागरिकांची पाण्याची समस्या सूटणार आहे. उपायुक्त अजय चारठाणकर, पाणी पुरवठा विभागप्रमुख परिमल निकम यांच्याशी चर्चा केली. दिवाळीनंतर पंधरा दिवसात पुलावरील पाईपलाईन टाकून दोन महिन्यात पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. मात्र, अजूनपर्यंत ही लाईन सुरू झालेली नाही. ही नागरिकांची फसवणूक असल्याचे ठाणगे यांचे म्हणणे आहे.