शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

श्रीरामपूर बाजार समितीतील अपहार प्रकरणाची चौकशी लांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 18:27 IST

बाजार समितीच्या कांदा अनुदानात अपहार झाल्याच्या तक्रारीची चौकशी धिम्या गतीने सुरू आहे. याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी पंधरा दिवसांत तपासणी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश २२ डिसेंबरला दिले. मात्र, अजूनही माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे.

श्रीरामपूर : बाजार समितीच्या कांदा अनुदानात अपहार झाल्याच्या तक्रारीची चौकशी धिम्या गतीने सुरू आहे. याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी पंधरा दिवसांत तपासणी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश २२ डिसेंबरला दिले. मात्र, अजूनही माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे.हा वेळकाढूपणा संचालकांच्या सोयीचा असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते जितेंद्र भोसले यांनी केला आहे. संचालकांनी कांदा अनुदान लाटल्याची तक्रार झाल्यानंतर खळबळ उडाली होती. आजी-माजी सभापती, उपसभापतींच्या जवळच्या लोकांनी लाभ उठविल्याने शेतकरी अनुदानापासून वंचित राहिल्याची तक्रार मंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे करण्यात आली होती. सचिवांसह काही व्यापारीदेखील आरोपांच्या कचाट्यात सापडले होते. जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी यासंबंधी चौकशी करण्याचे आदेश दिले. दप्तर, हिशोबाची पुस्तके, खरेदी दराच्या दप्तराची तपासणी, बाजार व देखरेख शुल्क यांचीदेखील तपासणी केली जाणार आहे. राज्य सरकारच्या निर्देश तत्त्वांचे पालन केले जात आहे अथवा नाही याची चौकशी समितीकडून खातरजमा करण्याचे आदेश देण्यात आले होते.येथील सहायक निबंधक व्ही. यु. लकवाल यांनी तपासणी सुरू करताच जिल्हा उपनिबंधकांनी त्यांचे कामकाज थांबवित राहाता येथील सहायक निबंधक जे. बी. शेळके, राहुरीच्या सहायक निबंधक कार्यालयातील मुख्य लिपिक एन. डी. खंडेराय, एस. एस. कोठुळे, आर. एल. रहाणे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला. तपासणीसाठी दप्तर व आवश्यक ती माहिती उपलब्ध क रून पंधरा दिवसांमध्ये अहवाल सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे. या दुस-या चौकशी समितीने २९ डिसेंबरला बाजार समितीच्या कार्यालयात तपासणी केली. अजूनही माहिती जमा करण्याचेच काम सुरू आहे. शेतकरी संघटनेचे भोसले यांनी त्यास आक्षेप घेतला आहे. संचालक मंडळाला एक प्रकारे पुरावे नष्ट करण्यासाठी संधी दिली जात आहे, असे भोसले यांचे म्हणणे आहे. पणन संचालकांकडे त्यासंबंधी दाद मागणार असून योग्य दिशेने तपास न झाल्यास चौकशी अधिका-यांविरोधात खासगी तक्रार दाखल क रू असे त्यांनी म्हटले आहे.

राहाता येथील दैनंदिन कामकाजामुळे चौकशीसाठी वेळ लागत आहे. पुढील आठ ते पंधरा दिवस आणखी खर्ची पडणार आहेत. त्यानंतरच अहवाल तयार होईल.-जे. बी. शेळके, चौकशी अधिकारी तथा सहायक निबंधक, राहाता.बेलापूर उपआवारात शेतमालाची लिलावाद्वारे खरेदी केली जात नाही. याबाबीकडे मी लक्ष वेधले आहे. शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी माझी लढाई सुरू राहणार आहे.-जितेंद्र भोसले, शेतकरी संघटना

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर