शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

अंकुरलेल्या सोयाबीन पिकाला तुषार सिंचनाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:14 IST

खरीप हंगामात सुरुवातीला राहाता तालुक्यात सलग भागात पाऊस न पडता ठिकठिकाणच्या भागांत पेरणीयोग्य पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ...

खरीप हंगामात सुरुवातीला राहाता तालुक्यात सलग भागात पाऊस न पडता ठिकठिकाणच्या भागांत पेरणीयोग्य पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात खरीप पिकांची पेरणी केली आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जमिनीवर निघालेली ही पिके आता संकटात सापडली आहेत. अनेक भागांत तुषार सिंचनाचा आधार घेत पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे दिसत आहे.

तालुक्यात यावर्षी साडेसोळा हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणीचे उद्दिष्ट आहे. खरीप पेरणीचा कालावधी जवळपास संपायला आला, तरी तालुक्यात अवघ्या साडेचार ते पाच हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झालेली आहे. पाऊस कमी प्रमाणात असलेल्या भागात तर अजूनही अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, ते शेतकरी पावसाने दडी मारल्याने आता तुषार सिंचनाचा आधार घेत अंकुरलेले पीक वाचविण्यासाठी मोठी कसरत करत आहेत.

.................

एकीकडे मुसळधार पाऊस, दुसरीकडे विकतचे पाणी...

राहाता तालुक्यात सोमवारी (दि. ५) सायंकाळी आडगाव या गावच्या परिसरात अक्षरशः ढगफुटीसदृश पाऊस झाला. तर, या गावच्या लगतच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या खडकेवाके शिवारात सध्या विकत पाणी घेऊन शेतकरी पिके वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

....................

पावसाच्या आगमनाची डोळे लावून वाट पाहत आहोत. पण, पावसाचे दर्शन काही होईना. जर येत्या काही दिवसांत पाऊस पडला नाही, तर शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अवेळी आणि अपुऱ्या पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी कमालीचा धास्तावला आहे. आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी तरी बऱ्यापैकी पाऊस होईल, या आशेने बी-बियाणे व खताची जुळवाजुळव केली आहे.

- रामप्रसाद मगर, शेतकरी, गोगलगाव

....................

दरवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस सुरुवातीलाच कमी झाला. त्यामुळे थोडीशी ओल आली. या ओलीचा आधार घेत महागडे बियाणे घेऊन पेरणी केली. मात्र, पाऊस नसल्याने पीक उगवेल की नाही, अशी शंका आहे. त्यामुळे आता तुषार सिंचनाचा आधार घेत अंकुरलेल्या पिकांना वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. अगोदरच शेतकरी देशोधडीला लागले आहेत. पुन्हा खर्च करून हातात काहीच पडले नाही, तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

-राजू धनवटे, शेतकरी, वाकडी