शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

मढीच्या बाजारात गाढवांनी खाल्ला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 16:59 IST

दुुष्काळामुळे पाणी टंचाईचा फटका व वाहतुकीच्या साधनांचा न परवडणारा खर्च, दूरची पायपीट यामुळे मढी (ता.पाथर्डी) येथे रंगपंचमीनिमित्त दरवर्षी भरणाऱ्या बाजारात यावर्षी गाढवांची आवक घटली. मात्र तुलनेत ग्राहक वाढल्याने गाढवांच्या किंमतीत वाढ झाल्याने यंदा त्यांनी चांगलाच भाव खाल्ला.

चंद्रकांत गायकवाडतिसगाव : दुुष्काळामुळे पाणी टंचाईचा फटका व वाहतुकीच्या साधनांचा न परवडणारा खर्च, दूरची पायपीट यामुळे मढी (ता.पाथर्डी) येथे रंगपंचमीनिमित्त दरवर्षी भरणाऱ्या बाजारात यावर्षी गाढवांची आवक घटली. मात्र तुलनेत ग्राहक वाढल्याने गाढवांच्या किंमतीत वाढ झाल्याने यंदा त्यांनी चांगलाच भाव खाल्ला.मढीत पोहोचण्यापूर्वीच तिसगावचे शमा शेख यांच्या शेतवस्तीवर मुक्कामी असलेली ट्रकभर गाढवे एकाच ग्राहकाने खरेदी केली. या गाढवांना प्रत्येकी ६ ते १२ हजार रूपयांचा दर मिळाला. आमराईतील बाजारात राजस्थान येथून मुराद शहा यांनी आणलेल्या ४० गाढवांना प्रत्येकी १० ते १२ हजार रूपयांपर्यंत किंमत मिळाली. मुखेड (जि़ नांदेड) येथील श्रीरंग मामिलवार यांनीही काठेवाडी प्रकारातील १०० गाढवे विक्रीला आणली होती. शरीरकाठी, वय, प्रतवारी, रंग पाहून बाजारात त्यांचा दर ठरतो. गेल्यावर्षी काठेवाडी गाढवांना ९ ते १९ हजार रूपये किंमत होती. यंदा यात वाढ होऊन या गाढवांचा दर १२ ते २५ हजार रूपये असा वधारला आहे. यांत्रिकीकरण झाले तरी गाढवांशिवाय काही वाहतुकीची कामे होतच नाहीत, असे ते म्हणाले. पाणी टंचाईने वीटभट्ट्या बंद असल्या तरी जनावरांची खरेदी करावीच लागते, असे बेलापूरचे भाऊसाहेब नवनिघे यांनी सांगितले.गाढवांच्या खरेदी विक्रीची माहिती व उलाढालीमुळे पाच वर्षांपासून रंगपंचमी बाजारात राजस्थानी गाढवे आणतो. यावर्षी दरात तेजी आहे. गेल्यावर्षी साडेसात हजार ते अकरा हजार रूपये असलेला दर यंदा १० ते १५ हजार रूपयांपर्यंत पोहोचला आहे. हा बाजार या भूमीचे वैभव आहे. माणसांसह जनावरांना किमान पिण्याचे पाणी उपलब्ध करणे गरजेचे आहे. - मुरादभाई शहा, व्यापारीशके १०१० मध्ये रंगपंचमीच्या मुहूर्तावर चैतन्य कानिफनाथ महाराजांनी येथे संजीवन समाधी घेतल्याची आख्यायिका आहे. त्यानंतर सुमारे ३०० वर्षांनी छत्रपती शाहू महाराजांनी सरदार चिमाजी सावंत यांच्याकरवी कानिफनाथ गडाचे बांधकाम अठरापगड जातीधर्माच्या लोकांनी पूर्ण केले. त्यानुसार विविध समाजाचे मानपान सुरू आहेत. गाढवांचा बाजार आरंभही त्याच कालखंडात आहे. गाढवे हेच त्यावेळी एकमेव वाहतुकीचे साधन होते. रंगपंचमीस १००९ वर्षांची, तर गाढवांच्या बाजारास ७५० वर्षांची परंपरा आहे. मधुकर साळवे, विश्वस्त, श्रीक्षेत्र मढी देवस्थान.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर