शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
2
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
3
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
4
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
5
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
6
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
7
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
8
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
9
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
10
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
11
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
12
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
13
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
14
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
15
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
16
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
17
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
18
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
19
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
20
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा

मढीच्या बाजारात गाढवांनी खाल्ला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 16:59 IST

दुुष्काळामुळे पाणी टंचाईचा फटका व वाहतुकीच्या साधनांचा न परवडणारा खर्च, दूरची पायपीट यामुळे मढी (ता.पाथर्डी) येथे रंगपंचमीनिमित्त दरवर्षी भरणाऱ्या बाजारात यावर्षी गाढवांची आवक घटली. मात्र तुलनेत ग्राहक वाढल्याने गाढवांच्या किंमतीत वाढ झाल्याने यंदा त्यांनी चांगलाच भाव खाल्ला.

चंद्रकांत गायकवाडतिसगाव : दुुष्काळामुळे पाणी टंचाईचा फटका व वाहतुकीच्या साधनांचा न परवडणारा खर्च, दूरची पायपीट यामुळे मढी (ता.पाथर्डी) येथे रंगपंचमीनिमित्त दरवर्षी भरणाऱ्या बाजारात यावर्षी गाढवांची आवक घटली. मात्र तुलनेत ग्राहक वाढल्याने गाढवांच्या किंमतीत वाढ झाल्याने यंदा त्यांनी चांगलाच भाव खाल्ला.मढीत पोहोचण्यापूर्वीच तिसगावचे शमा शेख यांच्या शेतवस्तीवर मुक्कामी असलेली ट्रकभर गाढवे एकाच ग्राहकाने खरेदी केली. या गाढवांना प्रत्येकी ६ ते १२ हजार रूपयांचा दर मिळाला. आमराईतील बाजारात राजस्थान येथून मुराद शहा यांनी आणलेल्या ४० गाढवांना प्रत्येकी १० ते १२ हजार रूपयांपर्यंत किंमत मिळाली. मुखेड (जि़ नांदेड) येथील श्रीरंग मामिलवार यांनीही काठेवाडी प्रकारातील १०० गाढवे विक्रीला आणली होती. शरीरकाठी, वय, प्रतवारी, रंग पाहून बाजारात त्यांचा दर ठरतो. गेल्यावर्षी काठेवाडी गाढवांना ९ ते १९ हजार रूपये किंमत होती. यंदा यात वाढ होऊन या गाढवांचा दर १२ ते २५ हजार रूपये असा वधारला आहे. यांत्रिकीकरण झाले तरी गाढवांशिवाय काही वाहतुकीची कामे होतच नाहीत, असे ते म्हणाले. पाणी टंचाईने वीटभट्ट्या बंद असल्या तरी जनावरांची खरेदी करावीच लागते, असे बेलापूरचे भाऊसाहेब नवनिघे यांनी सांगितले.गाढवांच्या खरेदी विक्रीची माहिती व उलाढालीमुळे पाच वर्षांपासून रंगपंचमी बाजारात राजस्थानी गाढवे आणतो. यावर्षी दरात तेजी आहे. गेल्यावर्षी साडेसात हजार ते अकरा हजार रूपये असलेला दर यंदा १० ते १५ हजार रूपयांपर्यंत पोहोचला आहे. हा बाजार या भूमीचे वैभव आहे. माणसांसह जनावरांना किमान पिण्याचे पाणी उपलब्ध करणे गरजेचे आहे. - मुरादभाई शहा, व्यापारीशके १०१० मध्ये रंगपंचमीच्या मुहूर्तावर चैतन्य कानिफनाथ महाराजांनी येथे संजीवन समाधी घेतल्याची आख्यायिका आहे. त्यानंतर सुमारे ३०० वर्षांनी छत्रपती शाहू महाराजांनी सरदार चिमाजी सावंत यांच्याकरवी कानिफनाथ गडाचे बांधकाम अठरापगड जातीधर्माच्या लोकांनी पूर्ण केले. त्यानुसार विविध समाजाचे मानपान सुरू आहेत. गाढवांचा बाजार आरंभही त्याच कालखंडात आहे. गाढवे हेच त्यावेळी एकमेव वाहतुकीचे साधन होते. रंगपंचमीस १००९ वर्षांची, तर गाढवांच्या बाजारास ७५० वर्षांची परंपरा आहे. मधुकर साळवे, विश्वस्त, श्रीक्षेत्र मढी देवस्थान.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर