शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मढीच्या बाजारात गाढवांनी खाल्ला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 16:59 IST

दुुष्काळामुळे पाणी टंचाईचा फटका व वाहतुकीच्या साधनांचा न परवडणारा खर्च, दूरची पायपीट यामुळे मढी (ता.पाथर्डी) येथे रंगपंचमीनिमित्त दरवर्षी भरणाऱ्या बाजारात यावर्षी गाढवांची आवक घटली. मात्र तुलनेत ग्राहक वाढल्याने गाढवांच्या किंमतीत वाढ झाल्याने यंदा त्यांनी चांगलाच भाव खाल्ला.

चंद्रकांत गायकवाडतिसगाव : दुुष्काळामुळे पाणी टंचाईचा फटका व वाहतुकीच्या साधनांचा न परवडणारा खर्च, दूरची पायपीट यामुळे मढी (ता.पाथर्डी) येथे रंगपंचमीनिमित्त दरवर्षी भरणाऱ्या बाजारात यावर्षी गाढवांची आवक घटली. मात्र तुलनेत ग्राहक वाढल्याने गाढवांच्या किंमतीत वाढ झाल्याने यंदा त्यांनी चांगलाच भाव खाल्ला.मढीत पोहोचण्यापूर्वीच तिसगावचे शमा शेख यांच्या शेतवस्तीवर मुक्कामी असलेली ट्रकभर गाढवे एकाच ग्राहकाने खरेदी केली. या गाढवांना प्रत्येकी ६ ते १२ हजार रूपयांचा दर मिळाला. आमराईतील बाजारात राजस्थान येथून मुराद शहा यांनी आणलेल्या ४० गाढवांना प्रत्येकी १० ते १२ हजार रूपयांपर्यंत किंमत मिळाली. मुखेड (जि़ नांदेड) येथील श्रीरंग मामिलवार यांनीही काठेवाडी प्रकारातील १०० गाढवे विक्रीला आणली होती. शरीरकाठी, वय, प्रतवारी, रंग पाहून बाजारात त्यांचा दर ठरतो. गेल्यावर्षी काठेवाडी गाढवांना ९ ते १९ हजार रूपये किंमत होती. यंदा यात वाढ होऊन या गाढवांचा दर १२ ते २५ हजार रूपये असा वधारला आहे. यांत्रिकीकरण झाले तरी गाढवांशिवाय काही वाहतुकीची कामे होतच नाहीत, असे ते म्हणाले. पाणी टंचाईने वीटभट्ट्या बंद असल्या तरी जनावरांची खरेदी करावीच लागते, असे बेलापूरचे भाऊसाहेब नवनिघे यांनी सांगितले.गाढवांच्या खरेदी विक्रीची माहिती व उलाढालीमुळे पाच वर्षांपासून रंगपंचमी बाजारात राजस्थानी गाढवे आणतो. यावर्षी दरात तेजी आहे. गेल्यावर्षी साडेसात हजार ते अकरा हजार रूपये असलेला दर यंदा १० ते १५ हजार रूपयांपर्यंत पोहोचला आहे. हा बाजार या भूमीचे वैभव आहे. माणसांसह जनावरांना किमान पिण्याचे पाणी उपलब्ध करणे गरजेचे आहे. - मुरादभाई शहा, व्यापारीशके १०१० मध्ये रंगपंचमीच्या मुहूर्तावर चैतन्य कानिफनाथ महाराजांनी येथे संजीवन समाधी घेतल्याची आख्यायिका आहे. त्यानंतर सुमारे ३०० वर्षांनी छत्रपती शाहू महाराजांनी सरदार चिमाजी सावंत यांच्याकरवी कानिफनाथ गडाचे बांधकाम अठरापगड जातीधर्माच्या लोकांनी पूर्ण केले. त्यानुसार विविध समाजाचे मानपान सुरू आहेत. गाढवांचा बाजार आरंभही त्याच कालखंडात आहे. गाढवे हेच त्यावेळी एकमेव वाहतुकीचे साधन होते. रंगपंचमीस १००९ वर्षांची, तर गाढवांच्या बाजारास ७५० वर्षांची परंपरा आहे. मधुकर साळवे, विश्वस्त, श्रीक्षेत्र मढी देवस्थान.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर