शहरं
Join us  
Trending Stories
1
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
2
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
3
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
4
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
5
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
6
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
7
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
8
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
9
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
10
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
11
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
12
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
13
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
14
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
15
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
16
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
17
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
18
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
19
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
20
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्म/मुक्ती फक्त ज्ञानानेच मिळते / अशोकानंद महाराज कर्डिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 12:30 IST

जोपर्यंत प्रकाश येत नाही तोपर्यंत अंधार जाऊ शकत नाही. तुम्ही कोणतेही कर्म करा काहीही उपयोग होत नाही. शेकडो जन्म जरी गेले आणि आत्मज्ञान झाले नाही तर मुक्त होऊ शकत नाही.

       भज गोविन्दम -१७        कुरुते गंगासागरगमनं व्रतपरिपालनमथवा दानम्।           ज्ञानविहिन:सर्वमतेन मुक्ति: न भवति जन्मशतेने-...—————————-सब तीर्थ बार बार, गंगासागर एक बार, अशी म्हण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत. पण आता तसे नाही रहिले. सब तीर्थ बार बार और गंगासागर भी बार बार. कारण पूर्वी गंगासागर येथील कपिल मुनींचे मंदिर समुद्रात होते. आता ते मंदिर खूप अलीकडे आणले आहे. जेथे गंगा समुद्राला मिळते त्या तीर्थाला गंगासागर म्हणतात. या गंगासागराहुन जवळच बांगलादेश आहे आणि तेथून सर्रास तस्करी होत असते. किंबहुना येथे बरेचसे लोक हे बंगला देशीच आहेत. अवैध रित्या घुसलेले आहेत. त्यांच्यावर कोणाचाही कंट्रोल नाही. आम्ही त्यांची अरेरावी अनुभवली आहे. असो.

आदि शंकराचार्य स्वामी महाराज सांगतात, तुम्ही गंगासागरला गेलात तरीही मुक्त होऊ शकणार नाही. कारण मुक्ती फक्त आणि फक्त ज्ञानानेच मिळते. इतर कोणत्याही साधनाने मोक्ष मिळत नाही. हा श्रुतीचा सिद्धांत आहे व ज्ञानापेक्षा या जगात काहीही पवित्र नाही, असे भगवत गीता सांगते. 

‘न हि ज्ञानेनसदृश्यं पवित्रमिह विद्यते. श्रुती माउली पण सांगते ऋतेज्ञानात न मुक्ति: ज्ञानादेव कैवल्यम्’ ज्ञानाशिवाय इतर कोणत्याही साधनाने मुक्ती नाही. फक्त ज्ञानानेच मुक्ती मिळते. हा अबाधित सिद्धांत आहे.  

ज्ञानेश्वरीमध्ये फार छान संगितले आहे, ज्ञानेश्वरी अध्याय १२ मध्ये माउली म्हणतात,

‘मोक्ष देऊनि उदार । काशी होय कीर । परी वेचावें लागें शरीर । तिये गांवीं ॥ १७३ ॥हिमवंतु दोष खाये । परी जीविताची हानि होये । तैसें शुचित्व नोहे । सज्जनाचें ॥ १७४ ॥ शुचित्वें शुचि गांग होये । आणि पापतापही जाये ।परी तेथें आहे । बुडणें एक ॥ १७५ ॥ खोलिये पारु नेणिजे । तरी भक्तीं न बुडिजे । रोकडाचि लाहिजे। न मरतां मोक्षु ॥१७६॥

अनेक प्रकारचे तीर्थ आहेत. सप्त पुरी, चार धाम, बारा ज्योतिर्लिंग हे सर्व जरी तुम्ही फिरून आलात तरीही जर आत्मज्ञान झाले नाही तर काहीही उपयोग नाही. हेमाडपंडिताने काही हजारवर व्रते सांगितली आहेत आणि हे व्रते जर करायचे म्हटले तर आयुष्य पुरणार नाही.  —-  नलगे तीर्थीचे भ्रमण। नलगे दंडन मुंडण। नलगे पंचांगी साधना। तुम्ही आठवा मधुसूदना गा...।।श्री संत एकनाथ महराज ‘वासुदेव’ या अभंगात सांगतात की, तीर्थ भ्रमण, दंडण मुंडण, पंचाग्नी साधन हे काहीही मुक्तीसाठी आवशक नाही. किंवा लेने को हरिनाम है, देने को अन्नदान। तरने को है दीनता डूबने अभिमान,असे म्हणतात.

दानाचे प्रकार 

अन्नदान,गोदान,भूदान,कांचनदान वस्त्रदान रक्तदान, गजदानआणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्ञानदान. या वेगवेगळ्या प्रकारच्या दानाने फारतर पुण्य उत्पन्न होईल पण मुक्ती मिळणार नाही. कारण मुक्ती फक्त ज्ञानाने मिळते. ब्रह्म्स्वरुपाच्या अज्ञानामुळेच जगतभ्रम होत असतो. तो भ्रम त्याच्याच ज्ञानाने जात असतो. दुसºया कशानेही जात नाही. उदा. रज्जूच्या अज्ञानाने सर्प भ्रम होतो व त्याच रज्जूच्या ज्ञानाने सर्प भ्रम जातो. ज्ञानेश्वरीमध्ये माउली म्हणतात,स्वप्नीच्या घायो ओखद(औषध) चेववी धनंजयो तेवी अज्ञान ययाज्ञानची खड्ग स्वपांतील दुखाला जागे करणे हे औषध आहे.

प्रतीयोगीच्या आगमनाने अनुयोगी जात असतो. जोपर्यंत प्रकाश येत नाही तोपर्यंत अंधार जाऊ शकत नाही. तुम्ही कोणतेही कर्म करा काहीही उपयोग होत नाही. शेकडो जन्म जरी गेले आणि आत्मज्ञान झाले नाही तर मुक्त होऊ शकत नाही. ( हा श्लोक सुबोधाचार्य रचित आहे असेही मानले जाते. )म्हणून ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे श्रेयस्कर आहे. 

-भागवताचार्य श्री अशोकानंद महाराज कर्डिले गुरुकुल भागवताश्रम,  चिचोंडी(पाटील)तालुका नगर संपर्क- ९४२२२२०६०३        

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिक