शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सामाजिक सलोखा हे जिल्ह्याचे वैशिष्ट्य : राम शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 11:37 IST

सामाजिक सलोखा हे आपल्या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे, ते सर्वांनी मिळून कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन जिल्हयाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

अहमदनगर : सामाजिक सलोखा हे आपल्या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे, ते सर्वांनी मिळून कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन जिल्हयाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.महाराष्ट्र दिनाच्या ५९ व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राऊंडवर झाला. त्यानंतर केलेल्या भाषणात ते बोलत होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.यावेळी पोलीस दलाच्या पथकाने मानवंदना दिली. त्यानंतर शानदार संचलन झाले. ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी संचलनाची पाहणी केली. पालकमंत्री शिंदे म्हणाले, आपला जिल्हा हा संतांचा वारसा लाभलेला जिल्हा आहे. जिल्ह्यातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. हा वारसा आणि परंपरा आपण सर्वांनी जपली पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी परेड कमांडर परिविक्षाधिन सहायक पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने शानदान संचलन केले. सूत्रसंचलन गीतांजली भावे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 7 वाजता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उप विभागीय अधिकारी उज्वला गाडेकर व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सावेडी येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर