शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

माजी सैनिकांसाठी विशेष भरती प्रक्रिया

By | Updated: December 9, 2020 04:16 IST

अहमदनगर : राज्यामधील सरकारी नोकर भरतीमध्ये माजी सैनिकांसाठी राखीव असलेली पदे भरण्यासाठी लवकरच विशेष भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, ...

अहमदनगर : राज्यामधील सरकारी नोकर भरतीमध्ये माजी सैनिकांसाठी राखीव असलेली पदे भरण्यासाठी लवकरच विशेष भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी माजी सैनिकांच्या शिष्टमंडळाला दिली. या शिष्टमंडळाने मंत्री कडू यांची मंत्रालयात भेट घेतली. त्यावेळी शिष्टमंडळाला वरील आश्वासन दिले.

राज्य सरकारच्या पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक भरतीमध्ये माजी सैनिकांची १२३१ पदे रिक्त आहेत. त्यामध्ये माजी सैनिक, शहीद सैनिक कुटुंबीयांची संख्या अल्प प्रमाणात आहे, तरीही शिक्षण विभाग ही पदे भरण्यास उत्सुक नव्हता. शासनानेही याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे माजी सैनिक, वीरपत्नी, वीर पाल्य यांनी १६ डिसेंबर या विजयदिनापासून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिष्टमंडळास मंत्रालयात चर्चेसाठी निमंत्रित केले होते. यावेळी मंत्री कडू यांनी शिष्टमंडळाशी गत बुधवारी (दि. २) सकारात्मक चर्चा केली. तसेच लवकरच विशेष भरती प्रक्रिया राबवून माजी सैनिकांना शासन सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, शिष्टमंडळाला लेखी आश्वासन न मिळाल्याने माजी सैनिक उपोषणावर ठाम आहेत. या शिष्टमंडळात सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष माजी खासदार बिग्रेडिअर सुधीर सावंत, कार्यकारी अध्यक्ष नारायण अंकुशे, कोकण विभागप्रमुख सुभाष दरेकर, माजी सैनिक उमेदवार सुभेदार मेजर प्रभाकर काळे, माजी सैनिक अमर माने, माजी सैनिक राजेंद्र राजळे आदी उपस्थित होते. शिक्षण विभागातर्फे सहसचिव इम्तियाज काझी, कक्ष अधिकारी कविता तोंडे, प्रशासकीय अधिकारी राजेश शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते.

---

----

सैनिक हा वयाच्या ३५ ते ४० व्या वर्षी सेवानिवृत्त होत असतो. इतर सेवेमध्ये ही अट वयाच्या ५८ वर्षांपर्यंत आहे. त्यामुळे सैनिकांना सेवानिवृत्त करण्यापूर्वी त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार राज्यातील सेवेमध्ये सामावून घ्यावे.

-बिग्रेडिअर सुधीर सावंत, (निवृत्त)

--

फोटो- ०८ माजी सैनिक

माजी सैनिकांच्या शिष्टमंडळाने शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेतली. यावेळी सुधीर सावंत यांच्यासह राज्यातील माजी सैनिक संघटनेचे विभागीय प्रतिनिधी.