शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

कर्मयोगाची शिकवण देणारी गीता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 13:11 IST

गीता परिवाराच्या वतीने स्वामी श्री. गोविंदगिरी महाराज यांच्या ७१ व्या जन्मवर्षानिमित्त संगमनेरात ७१ हजार गीतेचे मुखोंद्गत अध्याय त्यांना भेट दिले जाणार आहेत. यानिमित्ताने स्वत: संपूर्ण गीता कंठस्थ करणारे गीता परिवाराचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांचे विचार. गीता जयंतीनिमित्त हा विशेष लेख.

गीता जयंती विशेष/  श्रीमद्भगवद गीता केवळ धर्मग्रंथ नाही तर मानवी जीवनमूल्यांचा तो आधार ग्रंथ आहे. भारतीय तत्वज्ञानाने जगाला दिलेली ती अनुपम भेट आहे. म्हणूनच या ग्रंथावर जगात सर्वाधिक टीका लिहिल्या गेल्या. संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी, लोकमान्य टिळकांचे गीता रहस्य, विनोबाजींची गीताई अशी कितीतरी नावे लिहिता येतील. सशस्त्र क्रांतिचा नारा देणा-या भगतसिंगपासून अहिंसेचा मंत्र देणा-या गांधीजींपर्यंत सर्वांनाच हा ग्रंथ प्रिय वाटला, मार्गदर्शक झाला. भगवद्गीता हा योगशास्त्रांना सोपे करून सांगणारा, नकारात्मकतेला सकारात्मकतेत बदलून पडलेल्या मनाला ऊर्जा देणारा आणि विवेक जागविणारा ग्रंथ आहे. अनेकांनी मला प्रश्न विचारला की भगवद्गीता वाचून त्याचा अर्थ समजून घेतला की झाले. गीता पाठ करण्याचे काय कारण? साखर केवळ दुधात घालून चालत नाही ती चमच्याने घोळवली तरच साखरेची गोडी दुधात विरघळते. त्याच प्रमाणे गीता केवळ वाचून कळाली तरी जीवनात घोळवायची असेल तर पाठांतर मदत करते. त्या निमित्ताने आपण पुन्हा पुन्हा ती समजावून घेतो. जीवनात जेव्हा द्वंद निर्माण होते तेव्हा परिवार, धर्म आणि क्षेत्र धर्म द्वंदात गोंधळलेल्या अर्जुनाला निमित्त करून सांगितलेली गीता आपल्यालाही पदोपदी मार्गदर्शन करते. मुलांना तर संस्कृत कळतही नाही मग केवळ पाठांतर करून काय उपयोग? असाही प्रश्न मला अनेकांनी विचारला. बालवयात स्मरणशक्ती तीव्र असते. पाठांतर पटकन होते. मोठेपणी पाठांतराला मर्यादा येतात. पण त्यावेळी समज वाढलेली असते. लहानपणी पाठ केलेले सर्व मोठेपणीही लक्षात रहाते. तेव्हा अर्थ कळाला की आपण लहानपणी हे पाठ करून ठेवले याचा मोठा आनंद मनाला झाल्याशिवाय राहत नाही. मला गीतेचे १८ अध्याय पाठ करायला तीन वर्ष लागली. मुलांनी केवळ पंधरा-वीस दिवसात दोन अध्याय सहज पाठ केलेत. बालवयात पाठांतराचा हा मोठा फायदा मिळतो. या शिवाय संस्कृत उच्चारणामुळे स्पष्ट उच्चार करण्याची सवय जडते. वाणी शुध्द होते. स्वरयंत्राला व्यायाम मिळून आवाजालाही धार लागते. गीता कर्मयोगाची शिकवण देते. सातत्याने सत्कर्म करत रहायला प्रेरित करते. निर्भयता, शुध्दता, स्वच्छता, ज्ञानोपासना, योगाचरण, व्यवस्थित रहाणे, दान, दमन, अर्पण, स्वाध्याय, तप, आर्जव, अहिंसा, सत्य, क्र ोध, त्याग, शांती, दया, अलोलुप्त्व, मार्दव, लज्जा, तेज, क्षमा, धैर्य, शुध्दता, निर्वेरता, निरभिमान अशा दैवी संपदा म्हणजेच जीवनातील सद्संस्कारांचे प्रतिपादन करते. बालवयात या संस्कार सिंचनाची सर्वाधिक  आवश्यकता असते. शालेय शिक्षणाला सदाचरणाच्या शिक्षणाची जोड असणे किती महत्त्वाचे आहे. याचे भान आता जगाला येऊ लागले आहे. भारतीय शिक्षण पध्दतीत संस्कारांचे अनन्यसाधारण महत्त्व होते. कितीही मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा, पैसा कमावला तरीही मनाची शांती नसेल तर हे सर्व निरर्थक असते. मनाची शांती आणि समत्वाचे शिक्षण गीता देते. या दृष्टीने आजच्या प्रचंड स्पर्धेच्या युगात ‘सुख दु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ’ असे विचारांनी समत्व साधण्याचे प्रशिक्षण गीतेकडून मिळते. अंतरंग योगात प्रवेश कसा करावा याचे सुरेख विवेचन गीता करते. म्हणूनच गीतेचा अभ्यास सर्वार्थाने उपयुक्त आहे. एखाद्या ग्रंथाची जयंती साजरी व्हावी असा एकमात्र गं्रथ गीता आहे. आज गीता जयंतीच्या निमित्ताने या ग्रंथाचा परिसस्पर्श आपल्याही जीवनाला व्हावा, असा संकल्प प्रत्येकाने करायला हवा!- डॉ.संजय मालपाणी, गीता परिवाराचे प्रमुख, संगमनेर.

टॅग्स :SangamnerसंगमनेरAhmednagarअहमदनगर