शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेतील सर्व प्रश्न सोडविणार-वैभव पिचड; पठार भागात दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 13:53 IST

मतदारसंघासह पठारभागातील पाटपाण्याचे आणि रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आहे.  सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही भाजपाचे उमेदवार वैभव पिचड यांनी दिली. 

अकोले : मतदारसंघासह पठारभागातील पाटपाण्याचे आणि रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आहे.  सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही भाजपाचे उमेदवार वैभव पिचड यांनी दिली. संगमनेर तालुक्यातील पठारभागाच्या दौ-यावर महायुतीचे उमेदवार वैभव पिचड हे बुधवारी आले होते. त्यावेळी बोटा गावातील सभेमध्ये ते बोलत होते. जनार्दन आहेर, सुरेखा गव्हाणे, अशोक इथापे, मीनानाथ पांडे, अरूण इथापे,  बबन गागरे, उत्तम ढेरंगे, संतोष शेळके,  दिलीप साळगट,  विलास शेळके, नितीन आहेर उपस्थित होते.पिचड म्हणाले, पाच वर्षे विरोधात असताना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचे काम केले. वेळप्रसंगी रास्ता रोको आंदोलनही केले. मात्र आपले सरकार नसल्याने मतदार संघातील रस्त्यांची कामे, पाटपाण्याचे प्रश्न सोडवता आले नाही. तरीही आपण आपल्या आमदार निधीतून थोडा-थोडा निधी देण्याचे काम केले आहे. सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून रखडलेले सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे काम आपल्याला करायचे आहे. पिचडांनी पस्तीस वर्ष काय केले ? असे प्रतिस्पर्धी उमेद्वार सांगतात. माजी मंत्री पिचड यांनी पठारभागाच्या विकासासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. याभागातील सर्व सामान्य शेतकरी सुजलाम सफलाम झाला आहे. पाच वर्षात महायुतीच्या सरकारवर कुठलाच भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही.शिवाजी तळेकर म्हणाले, अकलापूर गावच्या विकासासाठी पिचड यांनी भरभरून निधी दिला. त्यामुळे आज  त्यांच्या माध्यमातून विविध विकास कामे मार्गी लागली आहेत. अशोक वाघ म्हणाले, पिचड यांनी पठारभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता  त्यांच्या पाठीशी आहे. यावेळी उत्तम ढेरंगे, अशोक इथापे, दिलीप साळगट, बाळासाहेब ढोले, अरूण इथापे, गणेश यांची भाषणे झाली.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019