शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

साकळाई सिंचन योजना : 32 गावातील शेतकरी रस्त्यावर, चिखलीत रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 14:01 IST

नगर आणि श्रीगोंदा तालुक्यात सुमारे 32 गावांचे भविष्य असलेल्या साकळाई उपसा जलसिंचन योजना पूर्ण करण्यासाठी कृती समितीच्या वतीने चिखली येथील जुना टोल नाका येथे आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

श्रीगोंदा : नगर आणि श्रीगोंदा तालुक्यात सुमारे 32 गावांचे भविष्य असलेल्या साकळाई उपसा जलसिंचन योजना पूर्ण करण्यासाठी कृती समितीच्या वतीने चिखली येथील जुना टोल नाका येथे आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सुमारे तीन हजार शेतकरी सहभागी झाले होते. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी बैलगाड्या घेऊन रस्त्यावर उतरले होते. सुमारे दीड तास वाहतूक ठप्प झाली होती.साकळाई उपसा सिंचन योजना समितीचे अध्यक्ष झेंडे महाराज म्हणाले, आतापर्यत पुढा-यांनी भुलथापाच मारल्या आहेत. जनतेला झुलवत ठेवण्याचे काम सरकारने केले आहे. शेतक-याच्या लढ्यात नगर - श्रीगोंदा तालुक्यातील पुढा-यांनी लढ्यात सहभाग न घेतल्यास त्यांचाही समाचार घेऊ असा इशारा त्यांनी दिला. आमदार राहुल जगताप म्हणाले, साकळाई योजना पूर्ण करण्यासाठी यापूर्वीही विधानभवनात आवाज उठवला आहे. या अधिवेशनातही आवाज उठवणार आहे. योजनेसाठी पक्षाचे नेते शरद पवार यांची सर्व मदत मिळवून देऊ. माजी सभापती बाळासाहेब हराळ म्हणाले, साकळाईसाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा द्या. नेत्यांच्या गाड्या आडवा. भाजपाचे नेते संतोष लगड म्हणाले, योजना मार्गी न लागल्यास सर्व पक्षातील नेत्यांनी पदाचे राजीनामे दिले पाहिजे. जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी यावेळी लोकपाल व लोकायुक्त साठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्याचा ठराव मांडला. ‘अण्णा हजारे हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देत ठराव मंजूर केला.यावेळी एकजूट करून लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. वेळप्रसंगी पदाचे राजीनामे देण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. १० फेब्रुवारी रोजी रुईछत्तीसी येथे नगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अडविण्याचा इशारा दिला.यावेळी जेष्ठ समाजसेवक राजाराम भापकर, सभापती पुरुषोत्तम लगड, दादाभाऊ चितळकर, रामदास झेंडे, रवींद्र भापकर, सरपंच ज्ञानेश्वर कवडे, शरद बोठे, संजय धामणे, सरपंच अण्णा चोभे, सरपंच प्रवीण कोठुळे, नारायण रोडे, शरद चोभे, लहू कासार उपस्थित होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा