शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजकार्य घडते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:16 IST

कोपरगाव : जोपर्यंत माणसावर आध्यात्मिक संस्कार होत नाहीत, तोपर्यंत त्याला समाजाची ओढ लागत नाही. आणि समाजाची ओढ लागली की ...

कोपरगाव : जोपर्यंत माणसावर आध्यात्मिक संस्कार होत नाहीत, तोपर्यंत त्याला समाजाची ओढ लागत नाही. आणि समाजाची ओढ लागली की त्याच्या हातून विधायक काम घडून जाते. समाजामध्ये काम करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु, मागे न राहता पुढे चालत राहिले तर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपल्या हातून समाजकार्य आपोआप घडते, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी येथे व्यक्त केले.

कोपरगाव येथील के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व वृक्षवेध फाउंडेशन यांच्या वतीने दत्तक गाव अंजनापूर (ता. कोपरगाव) येथे आयोजित वृक्षारोपण व कृतज्ञता कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे होते. याप्रसंगी शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधीक्षक संजय सातव, स्नेहालय परिवार अहमदनगरचे संस्थापक गिरीश कुलकर्णी, संदीप रोहमारे, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, प्रा. एन. जी. बारे, वृक्षवेध फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गव्हाणे, सर्व सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. शैलेंद्र बनसोडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एस. गायकवाड, डॉ. एस. एम. देवरे, डॉ. सुरेखा भिंगारदिवे आयोजक म्हणून उपस्थित होते.

अशोकराव रोहमारे म्हणाले, अंजनापूर हे गाव पर्यावरण रक्षणासाठी पुढे आले ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळेच हे गाव आमच्या महाविद्यालयाने दत्तक घेतले आणि आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक या गावात सातत्याने वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे काम करीत आहे. यावेळी संजय सातव, गिरीश कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. रुबी कन्स्ट्रक्शनचे संचालक संदीप गाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

............

फोटो१०- अंजनापूर, कोपरगाव