शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजकार्य घडते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:16 IST

कोपरगाव : जोपर्यंत माणसावर आध्यात्मिक संस्कार होत नाहीत, तोपर्यंत त्याला समाजाची ओढ लागत नाही. आणि समाजाची ओढ लागली की ...

कोपरगाव : जोपर्यंत माणसावर आध्यात्मिक संस्कार होत नाहीत, तोपर्यंत त्याला समाजाची ओढ लागत नाही. आणि समाजाची ओढ लागली की त्याच्या हातून विधायक काम घडून जाते. समाजामध्ये काम करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु, मागे न राहता पुढे चालत राहिले तर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपल्या हातून समाजकार्य आपोआप घडते, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी येथे व्यक्त केले.

कोपरगाव येथील के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व वृक्षवेध फाउंडेशन यांच्या वतीने दत्तक गाव अंजनापूर (ता. कोपरगाव) येथे आयोजित वृक्षारोपण व कृतज्ञता कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे होते. याप्रसंगी शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधीक्षक संजय सातव, स्नेहालय परिवार अहमदनगरचे संस्थापक गिरीश कुलकर्णी, संदीप रोहमारे, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, प्रा. एन. जी. बारे, वृक्षवेध फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गव्हाणे, सर्व सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. शैलेंद्र बनसोडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एस. गायकवाड, डॉ. एस. एम. देवरे, डॉ. सुरेखा भिंगारदिवे आयोजक म्हणून उपस्थित होते.

अशोकराव रोहमारे म्हणाले, अंजनापूर हे गाव पर्यावरण रक्षणासाठी पुढे आले ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळेच हे गाव आमच्या महाविद्यालयाने दत्तक घेतले आणि आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक या गावात सातत्याने वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे काम करीत आहे. यावेळी संजय सातव, गिरीश कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. रुबी कन्स्ट्रक्शनचे संचालक संदीप गाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

............

फोटो१०- अंजनापूर, कोपरगाव