शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गांधी जयंतीपासून राळेगणमध्ये समाजसेवक अण्णा हजारे यांचे पुन्हा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 12:30 IST

शेतकऱ्यांचे प्रश्न , लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीबाबत केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता तातडीने केली नाही, तर येत्या गांधी जयंतीला २ आॅक्टोबरपासून राळेगणसिद्धीत पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी केंद्र सरकारला तिसरे स्मरणपत्र पाठवून दिला आहे.

राळेगण सिद्धी : शेतकऱ्यांचे प्रश्न , लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीबाबत केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता तातडीने केली नाही, तर येत्या गांधी जयंतीला २ आॅक्टोबरपासून राळेगणसिद्धीत पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी केंद्र सरकारला तिसरे स्मरणपत्र पाठवून दिला आहे.देशातील प्रत्येक राज्य कृषी मूल्य आयोगाकडून आलेल्या शिफारशींमधील ४० ते ५० टक्के कपात केंद्रिय कृषी मूल्य आयोगाकडून केली जाते. शेतकºयांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळण्यासाठी केंद्र सरकारने कृषी विभागाचा हस्तक्षेप टाळावा. केंद्रिय कृषी मूल्य आयोगाला स्वायतत्ता देण्याचे आश्वासन पाळावे, अशी मागणी हजारे यांनी केली आहे.पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंह यांना हजारे यांनी याबाबत बुधवारी पत्र पाठविले. नवी दिल्ली येथे शहीद दिनापासून (दि. २३ मार्च) केलेल्या उपोषणाच्या सातव्या दिवशी केंद्र सरकारने मागण्यांसदर्भात आश्वासनांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हजारे यांनी उपोषण सोडले होते. या आश्वासनानुसार केंद्र सरकारची काय कार्यवाही सुरू आहे?, याची माहिती आपणाला अद्याप मिळाली नसल्याचे हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी केंद्रिय कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता देण्यासंदर्भात उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्येक राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचा अहवाल केंद्रिय आयोगाकडे जातो. त्यात केंद्रिय आयोग ४० ते ५० टक्के कपात करतो. कारण, कृषी विभागाचा हस्तक्षेप होतो. केंद्रिय कृषी मूल्य आयोगात तीन अनुभवी शेतक-यांचा समावेश असला पाहिजे.सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा फटकारले असतानाही केंद्र सरकारची लोकपाल व लोकायुक्त नियुक्ती न करण्याची कृती अशोभनीय आहे. न्यायालयाने दहा दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. सरकारच सर्वोच न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करीत नसेल तर हा न्यायालयाचा अवमान आहे. - अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारे