शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
3
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
4
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
5
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
6
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
7
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
8
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
9
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
10
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
11
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
12
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या
13
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
14
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
15
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
16
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
17
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
18
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
19
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
20
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

..तर ठेवींचे पैसे बुडण्याचीच भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:22 IST

श्रीगोंदा : केंद्र शासनाने परदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढविण्याचे धोरण घेतले आहे. त्यामुळे भविष्यात ठेवी व कर्जावरील व्याज दरात घसरण ...

श्रीगोंदा : केंद्र शासनाने परदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढविण्याचे धोरण घेतले आहे. त्यामुळे भविष्यात ठेवी व कर्जावरील व्याज दरात घसरण होणार आहे. त्यामुळे पतसंस्थांनी जादा व्याज दराने ठेवी घेण्याच्या मोहात पडू नये आणि ठेवीदारांनी प्रमाणापेक्षा जादा व्याजदराने पैशाची गुंतवणूक करू नये. यातून ठेवीचे पैसे बुडण्याची भीती आहे, असे मत श्रीगोंद्याचे सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडेकर यांनी व्यक्त केले.

बेलवंडी (ता.श्रीगोंदा) येथील व्यापाऱ्यांच्या सहकारी पतसंस्थेने आयोजित सहकारी संस्था सभासद प्रशिक्षण चर्चासत्रात ते बोलत होते .

अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार होते.

खेडेकर म्हणाले, बेलवंडी व्यापाऱ्यांची सहकारी पतसंस्थेची स्थापना १८ वर्षापूर्वी झाली. २५ कोटींच्या ठेवीवर २० कोटी कर्ज वितरण केले. कोणत्याही संस्थेने जादा शाखा काढण्याच्या फंद्यात पडू नये. जादा शाखा काढल्या की मॅनेजमेंट होत नाही. त्यामुळे संस्था अडचणीत येते. याचा फटका मोठमोठ्या बॅकांनाही बसला आहे.

शेलार म्हणाले, बेलवंडी व्यापाऱ्यांची सहकारी पतसंस्थेने राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून कारभार केला. त्यामुळे संस्थेची प्रगती झाली आहे.

यावेळी हास्यसम्राट अशोक देशमुख यांनी ‘ताण, तणाव कमी कसा करावा’ या विषयावर मार्गदर्शन केले. सभासदांना विमा चेक वाटप करण्यात आले. अग्नीपंख फाउंडेशनला पाच हजाराची मदत करण्यात आली.

यावेळी पोलीस निरीक्षक अरविंद माने, सुनील साखरे, बाळासाहेब बडदे यांची भाषणे झाली.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोराटे, सुभाष काळाणे, उत्तमराव डाके, केशव कातोरे, युवराज पवार, मुख्याध्यापक पवार आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सोपानराव हिरवे यांनी केले. सचिव किसनराव वऱ्हाडे यांनी आभार मानले.