शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सुखी संसारात स्मार्टफोन कालवतोय बिब्बा

By अरुण वाघमोडे | Updated: December 23, 2018 11:01 IST

बहुतांशीवेळा क्षुल्लक कारणांतून पती-पत्नीत वाद होतात़ हे वाद मात्र क्षणिक असतात़ स्वारी म्हटले की, पुन्हा संसाराचा गाडा रूळावर येतो

अरुण वाघमोडेअहमदनगर : पती-पत्नीच्या वादात एकेकाळी सासरी पती, सासू-सासऱ्याकडून त्रास, हुंड्यासाठी छळ, पतीचे व्यसन, विवाहबाह्य सबंध हे कळीचे मुद्दे ठरत होते. बदल्या काळात मात्र ‘मोबाईल आणि सोशल मीडिया’ संसार तुटण्यास कारणीभूत ठरत आहे.जिल्हा पोलीस दलाच्यावतीने महिलांसाठी चालविल्या जाणा-या दिलासा सेलकडे १५ आॅगस्ट २०१७ ते डिसेंबर २०१८ या काळात एकूण पती-पत्नीच्या वादातून २२३५ तक्रारी दाखल झाल्या आहेत. दिलासा सेलकडून झालेल्या समुपदेशनातून यातील ७५४ जोडप्यांनी आपसातील वाद मिटविले आहेत. ४६६ जणांनी स्वतंत्र निर्णय घेतला आहे. २१५ प्रकरणे गुन्हा दाखल पात्र ठरली आहेत.८ जणांना मानसोपचार तज्ज्ञांकडे पाठविण्यात आले आहे तर ७ जोडप्यांनी घटस्पोट घेतला आहे. एकूण दाखल तक्रांरीपैकी ४५ ते ५० टक्के प्रकरणात मोबाईल हेच वादाचे कारण समोर आले आहे.

बहुतांशीवेळा क्षुल्लक कारणांतून पती-पत्नीत वाद होतात. हे वाद मात्र क्षणिक असतात़ स्वारी म्हटले की, पुन्हा संसाराचा गाडा रूळावर येतो. गेल्या काही वर्षांत मात्र या नाजूक नात्याला ‘स्मार्ट फोन’ची दृष्ट लागली आहे. दिलासा सेलकडे गेल्या वर्षभरात पती-पत्नीच्या वादातून दाखल झालेल्या २२३५ तक्रारींपैकी ९०० जोडप्यांनी मोबाईल हेच वादाचे कारण नमूद केले आहे. मोबाईलमुळे काडीमोडपर्यंत आलेल्यांमध्ये नवविवाहितांची सर्वाधिक संख्या आहे.१५ आॅगस्ट २०१७ ते डिसेंबर २०१८ - २२३५ - तक्रारी दाखलपत्नींच्या तक्रारीपती तासनंतास मोबाईलवर बोलतो, आॅफिसमधून घरी आल्यानंतर व्हाटसअ‍ॅप आणि फेसबुकवर व्यस्त असतो, मला वेळ देत नाही, माझ्यापेक्षा त्याला त्याच्या व्हाटसअ‍ॅपवरील मैत्रिणी महत्त्वाच्या वाटतात, समजावून सांगितले तर माझ्यावरच रागावतो, मुलांना वेळ देत नाही, घरातील सर्व कामे मलाच करावे लागतात, मला त्याच्या मोबाईल पाहून देत नाही, त्याच्या मोबाईलचा पासवर्ड सांगत नाही. माझी त्याला कदरच नाही, माझी भावना तो समजून घेत नाही. तो आता माझ्यावर पहिल्यासारखं पे्रम करत नाही, मोबाईल ‘माझी सवत’ झाली आहे.पतींच्या तक्रारीआॅफिसमधील कारणांमुळे फोनवर बोलावे लागते, व्हॉटसअप गु्रप हा आता व्यवसायाचा भाग झाला आहे.  ‘ती’ शुल्लक कारणातून सतत कटकट करत असते. छोट्या-मोठ्या गोष्टींवरून संशय घेते. मी तिला घरात काहीच कमी पडू देत नाही.  माझ्यापेक्षा ती जास्त मोबाईलवर बोलते, तिच्या जुन्या मित्रांच्या ती संपर्कात आहे, माहेरी जास्त बोलते, तिच्या नातेवाईकांमध्ये माझी तिने बदनामी केली आहे. ती घरी असते तिला कशाला हवा स्मार्ट फोन, हिच्यामुळे माझे वैयक्तिक आयुष्य संपून चालले आहे. हिच्या कटकटीला मी आता वैतागलो आहे.

मुलांची फरपटपती-पत्नीतील भांडण विकोपाला गेल्यानंतर हा वाद प्रथम नातेवाईकांकडे जातो़ तेथे काहीच तोडगा निघाला नाही. तर पत्नी थेट माहेरी निघून जाते़ वाद आणखी वाढतो. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रारी आणि हे प्रकरण दिलासा सेलकडे येते. दिलासा सेलमध्ये पती-पत्नी व त्यांच्या नातेवाईकांना एकत्र बोलावून समजावून सांगितले जाते. यातील काही जण आपसातील वाद मिटवून घेतले आहेत तर काहीचें वाद थेट विकोपाला गेल्याने ‘घटस्पोट’ हाच पर्याय त्यांनी निवडला आहे़ यामध्ये त्यांच्या मुलांची फरपट होत आहे.पती-पत्नींमध्ये मोबाईलमुळे वाद होण्याचे सर्वाधिक प्रमाण आहे. मोबाईल हे कारण क्षुल्लक वाटत असले तरी याच कारणातून सुखी संसार विस्कटलेले दिसतात़. दिलासा सेलकडे आलेल्या जोडप्यांचे समुपदेशन केले जाते. त्यांच्या नातेवाईकांनाही समजावून सांगितले जाते.  घटस्पोटाचे दुष्परिणाम त्यांना सांगितले जातात. यातून अनेकांचे प्रबोधन होते़ काही प्रकरणात वाद विकोपालाच गेला असते तर संबंधित महिलेला कायदेशीर मदत केली जाते. - कल्पना चव्हाण, निरीक्षक, दिलासासेल

 

टॅग्स :Ahmed Shahzadअहमद शहजादahmednagar policeअहमदनगर पोलीस