शहरं
Join us  
Trending Stories
1
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
2
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
3
कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत...
4
रुपया गडगडल्यामुळे देशात महागाई वाढणार? आयातदारांची चिंता वाढली, RBI आता काय करणार?
5
Silver Price Today: चांदीचा दर विक्रमी उच्चांकावर, किंमत १.९० लाख रुपयांच्या पुढे; आता गुंतवणूक करणं योग्य होईल का?
6
Nana Patole: निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप; आयुक्तांना पदावरून हटवण्याची पटोलेंची मागणी
7
याला म्हणतात नशीब! गरिबीशी लढणाऱ्या २ मित्रांचं आयुष्यच बदललं; सापडला ५० लाखांचा हिरा
8
धक्कादायक! लग्नासाठी जमीन विकली; २ वेळा बनला नवरदेव, पण दोन्ही वेळा फसला, चुना लावून वधू पसार
9
टेस्लाला मोठा झटका, VinFast बनली EV मार्केटची 'महाराणी'! आता असा आहे इलॉन मस्क यांच्या फ्यूचर प्लॅन
10
मालवणीतील वादाप्रकरणी मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार अस्लम शेख यांच्यात शाब्दिक चकमक
11
VIDEO: लग्नमंडपात काकूंचीच हवाsss... नवरा-नवरी वरमाला घालत असताना हवेत ५ राऊंड्स गोळीबार
12
उगाच नाही पुतिन भारतात आले! रशिया-भारत शस्त्रास्त्र उत्पादक कंपन्यांची मोठी बैठक; कामालाही झाली सुरुवात
13
Vastu Tips: घरात गोलाकार किंवा अंडाकृती आरसा आहे? मग 'हे' वास्तू नियम वाचा; धोका टाळा 
14
"चहा प्यायला चला..." चक्क मराठीत बोलणारा हा पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे तरी कोण?
15
२०० रुपये रोजंदारीने काम करणाऱ्या शेतमजुराला लागली दीड कोटींची लॉटरी, पण आता घर सोडावं लागलं
16
Kangana Ranaut : "त्या व्यक्तीत काहीच दम नाही..."; जर्मनी दौऱ्यावरून कंगना राणौतने राहुल गांधींना डिवचलं
17
Social Media Ban: आता १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी, जगातील ऐतिहासिक निर्णय!
18
कृतिका कामराने कन्फर्म केलं रिलेशनशिप, 'या' प्रसिद्ध क्रिकेट होस्टला डेट करतीये अभिनेत्री
19
लवकर श्रीमंत व्हायचंय? मग एसआयपी नाही तर 'स्टेप-अप SIP' करा; बघा ११ कोटींचा फंड कसा जमा होईल
20
सोने व्यापाऱ्याचा डोळा लागला अन्...!  ‘सिद्धेश्वर एक्स्प्रेस’च्या एसी कोचमधून ₹५.५ कोटींचे दागिने चोरीला
Daily Top 2Weekly Top 5

आकारी पडीक जमिनींचा ताबा देऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:21 IST

श्रीरामपूर : तालुक्यातील ९ गावांमधील आकारी पडीक जमिनी कोणत्याही व्यक्तींना कराराने देऊ नयेत, असा आदेश उच्च न्यायालयाने शेती ...

श्रीरामपूर : तालुक्यातील ९ गावांमधील आकारी पडीक जमिनी कोणत्याही व्यक्तींना कराराने देऊ नयेत, असा आदेश उच्च न्यायालयाने शेती महामंडळाला दिला असल्याची माहिती विधीतज्ज्ञ अजित काळे यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या वारसांतर्फे या जमिनी परत मिळाव्यात आणि तोपर्यंत जमिनी कोणालाही हस्तांतरित करू नये, अशा स्वरूपाची याचिका जयदीप गिरीधर आसने व इतर यांनी विधीतज्ज्ञ अजित काळे यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे.

इंग्रज सरकारने १९१८मध्ये तत्कालीन कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ७ हजार ३६७ एकर जमिनी ३० वर्षांच्या कराराने ताब्यात घेतल्या होत्या. येवला येथे हा करार झाला होता. त्या जमिनी २३ जुलै १९२० रोजी इंग्रज सरकारने बेलापूर कंपनी इंडस्ट्रीज लिमिटेड (हरेगाव, ता. श्रीरामपूर) या कंपनीकडे वर्ग केल्या. पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९६५मध्ये कंपनीचे नाव कमी करून सरकारने जमीन ताब्यात घेतली. या जमिनी शेती महामंडळाकडे वर्ग करण्यात आल्या. त्या आजतागायत महामंडळाकडेच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे वारस त्यासाठी लढा देत आहेत.

न्यायालयात यापूर्वी दाखल एका याचिकेत २०१९मध्ये सुनावणी दरम्यान शेती महामंडळाच्यावतीने जमिनीचा ताबा इतर कोणालाही देण्यात येणार नाही, असे अभिवचन देण्यात आले होते. मात्र, तरीही २० ऑगस्ट २०२०मध्ये श्रीरामपूर येथील हरेगाव मळा व साखरवाडी (ता. फलटण, जि. सातारा) मळ्यामधील जमिनी १० वर्षांच्या कराराने देण्याचा घाट घातला गेला.

या जमिनी अशा पद्धतीने देण्यात येऊ नयेत व शेती महामंडळाने १५ एप्रिल २०२१मध्ये जमिनी कराराने देण्यासंदर्भात काढलेली निविदा प्रक्रिया रद्द करावी, अशा मागणीची याचिका शेतकऱ्यांना दाखल करावी लागली. न्यायालयाने या प्रकरणामध्ये तातडीने मंगळवारी सुनावणी घेतली. न्यायालयाने या जमिनीच्या निर्णयासंदर्भात सरकारला ६ जून २०२१ रोजी शपथपत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच करारधारकांना जमीन वापरण्यास परवानगी व प्रवेश देऊ नये, असा आदेश केला आहे.

यावेळी शेती महामंडळातर्फे ॲड. पराग बर्डे व शेतकऱ्यांतर्फे ॲड. अजित काळे यांनी काम पाहिले.

---