शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अहमदनगर जिल्ह्यात सहा तालुके शिवथाळीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 11:59 IST

अहमदनगर : प्रत्येक तालुक्यात शिवथाळी केंद्र सुरू करण्याच्या शासन निर्णयाला जिल्ह्यातील सहा तालुक्यांनी अद्यापही प्रतिसाद न दिल्याने येथे शिवथाळीचा घास गरजूंच्या मुखापर्यंत गेलेला नाही. पाथर्डी, शेवगाव, जामखेड, श्रीरामपूर, राहाता व संगमनेर या सहा तालुक्यांत तेथील तालुका प्रशासनाच्या उदासिनतेमुळे शिवथाळीला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : प्रत्येक तालुक्यात शिवथाळी केंद्र सुरू करण्याच्या शासन निर्णयाला जिल्ह्यातील सहा तालुक्यांनी अद्यापही प्रतिसाद न दिल्याने येथे शिवथाळीचा घास गरजूंच्या मुखापर्यंत गेलेला नाही. पाथर्डी, शेवगाव, जामखेड, श्रीरामपूर, राहाता व संगमनेर या सहा तालुक्यांत तेथील तालुका प्रशासनाच्या उदासिनतेमुळे शिवथाळीला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात उल्लेख केल्याप्रमाणे गरजूंना १० रूपयांत भोजन देण्याचा शब्द सरकार स्थापन केल्याबरोबर खरा केला. प्रारंभी जिल्ह्याच्या ठिकाणी १० रूपयांत जेवण देण्याची व्यवस्था करून याला शिवथाळी असे नाव देण्यात आले. नगर शहरात मार्चपर्यंत १० केंद्रांवर ही शिवथाळी सुरू करण्यात आली. परंतु पुढे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरीब जनता भुकेली राहू नये, यासाठी या योजनेचा तालुकास्तरावर विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्याप्रमाणे १ एप्रिलपासून प्रत्येक तालुक्यात दीडशे थाळी व जिल्ह्याच्या ठिकाणी असणाºया केंद्रांवर थाळीसंख्या दुप्पट करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हा पुरवठा अधिकाºयांच्या अधिपत्त्याखाली हे काम सुरू असून त्यांनीही आदेश देत प्रत्येक तहसीलदारांना ही केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्या. आठ तालुक्यांत ही केंद्रे सुरू झाली, मात्र दीड महिना लोटला तरी पाथर्डी, शेवगाव, जामखेड, संगमनेर, श्रीरामपूर व राहाता येथे शिवथाळीचा स्वाद गरजूंपर्यंत गेलेला नाही. जिल्हा पुरवठा विभागाने वारंवार सूचना देऊनही तालुका प्रशासन दाद देत नसल्याचे यावरून लक्षात येते. शासन स्वत: अनुदान देत आहे. अनेक हॉटेलचालक हे केंद्र चालवण्यासाठी पुढे येत आहेत. मग तालुका प्रशासनाला अडचण कशाची आहे? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. ---तालुका प्रशासन पुरवठा विभागाला दाद देईना नगर शहरात १२ व आठ तालुक्यांच्या ठिकाणी असे एकूण २० ठिकाणी सध्या शिवथाळी केंद्र सुरू आहेत. तेथे सुमारे ४७०० थाळ्यांचे वाटप सुरू आहे. सहा तालुक्यांना सूचना देऊनही त्यांनी केंद्र सुरू केलेले नाही. याबाबत पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती पुरवठा विभागाकडून समजली. मात्र तालुका प्रशासन पुरवठा विभागाला दाद देत नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.