शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

साहेब... किराणा, भाजीपाला संपलाय कारवाई नका करू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:19 IST

अहमदनगर : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. रुग्णालयात बेड मिळत नाहीत, इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत. अशा ...

अहमदनगर : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. रुग्णालयात बेड मिळत नाहीत, इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत. अशा भयानक परिस्थितीत प्रशासन ही साथ आटोक्यात आणण्याचे कसोशीने प्रयत्न करत असताना काही रिकामटेकडे मात्र नियमांचे उल्लंघन करण्यातच धन्यता मानत आहेत. संचारबंदी असतानाही किराणा संपलाय, भाजीपाला आणायला चाललोय, गावाकडे अर्जंट जायचे आहे, पोटदुखीच्या गोळ्या घ्यायच्यात, असे एक से बढकर एक कारणे सांगत काही जण विनाकारण रस्त्यावर भटकंती करताना पोलिसांना आढळून आले.

ज्यांना वास्तविक रुग्णालय, मेडिकल अथवा इतर अत्यावश्यक काम आहे, अशांची विचारणा करून पोलिसांनी त्यांना जाण्यास परवानगी दिली. मात्र क्षुल्लक कारणे सांगून विनाकारण भटकंती करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वीकेंड लॉकडायनच्या काळात शनिवार व रविवार असे दोन दिवस पोलिसांनी शहरासह जिल्हाभरात ८२२ जणांना ४ लाख २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने शनिवार व रविवार अशी दोन दिवस संचारबंदी लागू केली होती. अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार करण्यास बंदी होती. शहरासह ग्रामीण भागातही नागरिकांनी या संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत घरीच थांबणे पसंत केले. काही जणांनी मात्र हा आदेश गांभीर्याने न घेता काहीतरी कारण काढून घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मग पोलिसांनीही अशा रिकामटेकड्यांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांना चांगलाच दणका दिला.

.........

औषधे आणायला तिघांचे काय काम ?

संचारबंदीत तपासणीदरम्यान पोलिसांना बहुतांश जणांनी हॉस्पिटल व मेडिकलमध्ये जात असल्याचे कारण सांगितले. औषधे आणायला मात्र एका मोटारसायकलवर दोन ते तीन जण जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. अशावेळी पोलिसांनी त्यांना समज देत एकाच व्यक्तीला जाण्याची परवानगी दिली. बहुतांश जणांनी खोटी कारणे सांगून घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला.

............

शनिवारी झालेली कारवाई

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४१४ जणांना २ लाख १८ हजार ८०० रुपयांचा दंड करण्यात आला.

..........

रविवारी झालेली कारवाई

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४०८ जणांना २ लाख ७४ हजार रुपयांचा दंड करण्यात आला.

..............

दोन दिवसांच्या संचारबंदीला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. ज्यांना हॉस्पिटल, मेडिकलमध्ये काम आहे, त्यांच्यावर कुठल्या स्वरूपाची कारवाई करण्यात आली नाही. मात्र, जे विनाकारण फिरत होते, खोटे कारणे सांगत होते त्यांना कलम १८८ प्रमाणे प्रत्येकी ५०० रुपये दंड करण्यात आला.

-किरण सुरसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तोफखाना पोलीस स्टेशन

..........

ओळी- संचारबंदीच्या काळात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर पाेलिसांनी दंडात्मक कारवाई केली.

फोटो मेलवर आहे