शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

अख्या बेलापूर बदगी गावात वाटली चांदीची नाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 15:58 IST

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बेलापूर बदगी गावात गावातील निसर्गपूजक संत रामदास बाबांच्या १५० व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त गावातील नऊशे घरांत बाबांची प्रतिमा असलेली चांदीची नाणी वाटली.

मच्छिंद्र देशमुखकोतूळ : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बेलापूर बदगी गावात गावातील निसर्गपूजक संत रामदास बाबांच्या १५० व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त गावातील नऊशे घरांत बाबांची प्रतिमा असलेली चांदीची नाणी वाटली. तर गावाने चार लाख रूपयांचा मसाला वापरून ११ हजार लिटर आमटी बनवली. नऊशे घरांतून सरासरी दोनशे चपात्या घेऊन दीड लाख चपात्यांचा महाप्रसाद केला.अकोले तालुक्याच्या दक्षिणेला बेलापूर बदगी गावात गेली १५० वर्षे अन्नदानाची एक अनोखी परंपरा सुरू आहे. दीडशे वर्षांपूर्वी बेलापूर गावात कच नदीच्या काठावर योगी रामदासबाबा नावाचे अवलिया होऊन गेले. ते ध्यान धारणा, गोपालन, वृक्षसंवर्धन करत. उतारवयात त्यांनी गावात संजीवन समाधी घेतली. समाधीपूर्वी स्वत:च्या गायी विकल्या. त्यातून आलेले तत्कालिन चांदीचे रुपया प्रत्येक उंबरठ्यावर एक याप्रमाणे दिले. त्यातून दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीला आमटी चपातीचा महाप्रसाद करण्याचे सांगितले. आज गावात कुटुंब संख्या वाढली. तरी दीडशे वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे.सध्या गावात नऊशे कुटुंब आहेत. ज्येष्ठ द्वादशीला दरवर्षी हा चपाती आमटीचा महाप्रसाद होतो. प्रत्येक कुटुंब कमीत कमी एक पायलीभर गव्हाच्या चपात्या महाप्रसादासाठी देते. तर काही कुटुंब दुप्पट, तिप्पट देतात. लोकवर्गणीतून आमटी तयार होते. या कार्यक्रमासाठी लेकीबाळी, पाहुणे, बाहेरगावी नोकरी, व्यावसायास असलेले, आसपास गावातील लोक जमतात. न चुकता येथे येतात. या पाच दिवसांचे काळात मोठी गर्दी होत असल्याने गृहोपयोगी वस्तू, मिठाई, खेळणी यांची दुकाने मोठ्या संख्येने असतात.यंदा या सोहळ्यात चार लाख रूपयांचा मसाला वापरला. सहाशे किलो शेंगदाणा तेल वापरून ११ हजार लिटर आमटी केली. तर नऊशे घरातून किमान दीड लाख चपाती आली. प्रत्येक पाहुण्याला, भाविकांना आग्रहाने जेवणासाठी अमंत्रित केले होते. यंदा रामदासबाबांच्या १५० व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त गावाने लोकवर्गणीतून रामदासबाबांची प्रतिमा असलेली नऊशे चांदीची नाणी दिली.मी गेली ४६ वर्षे आमटी बनविण्याचे काम करतो. मी शासकीय नोकरीत असलो तरी काम बाजूला ठेवून निस्वार्थपणे हे काम करतो. दरवर्षी दोन तीनशे लिटर आमटी वाढवावी लागते. भाविकांची संख्या वाढत आहे. आमटी, चपाती सोडून दुसरा पदार्थ इथे नसतो. द्वादशी, त्रयोदशीला हा महाप्रसाद असतो. -किसन गणपत फापाळे, बेलापूर, आमटीचे आचारी.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर