शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

विचारांनी जुळल्या रेशीमगाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 16:43 IST

जात-पंथ अन् थेट धर्माचा उंबरा ओलांडून दोघेही एकमेकांचे झाले़ जे म्हणत होते, यांचा संसार टिकणार नाही, त्यांच्याच नाकावर टिच्चून दोघांनीही यशस्वी संसार केला. नाव कमावले. निख्खळ प्रेमाचा एक अध्याय लिहिला.

व्हॅलेंटाईन-डे स्पेशल / साहेबराव नरसाळे ती खूप आवडायची. पण प्रपोज करण्याची त्याची डेअरिंग नव्हती. आपल्या जोडीदाराचे मन न कळेल ती प्रेयसी कसली? तिने ते हेरले अन् तिनेच प्रपोज केले. जात-पंथ अन् थेट धर्माचा उंबरा ओलांडून दोघेही एकमेकांचे झाले़ जे म्हणत होते, यांचा संसार टिकणार नाही, त्यांच्याच नाकावर टिच्चून दोघांनीही यशस्वी संसार केला. नाव कमावले. निख्खळ प्रेमाचा एक अध्याय लिहिला. ही लव्हस्टोरी आहे. नीलिमा आणि प्रियदर्शन बंडेलू यांची.आजच्या नीलिमा बंडेलू या तेव्हाच्या नीलिमा भास्करराव जाधव. दीन-दलितांसाठी आयुष्य वेचणा-या कॉम्रेड भास्करराव जाधव यांच्या कन्या. लहान-पणापासून त्यांच्यावर कम्युनिस्ट विचारांचे संस्कार झालेले. वाचनही प्रचंड. त्यांचे अख्खे कुटुंबच कॉम्रेड़ या कॉम्रेड मुलीने १९८४ साली प्रियदर्शन यांना प्रपोज केले. थेट लग्नाचीच मागणी घातली. त्यावेळचे हे मोठे धाडस. प्रियदर्शन आणि नीलिमा हे दोघेही एकमेकांचे लहानपणापासूनचे सोबती़ एकाच वर्गात शिकलेले़ पुढे पत्रकारितेसाठी नीलिमा पुण्याला गेल्या. लाल निशाण पक्षाच्या श्रमिक विचार दैनिकात त्यांनी उपसंपादक म्हणून कामही केले. परंतु त्यांना एमएसडब्ल्यूचे शिक्षण घ्यायचे होते. त्यासाठी त्या नगरला आल्या. प्रियदर्शन हे नीलिमा यांना एमएसडब्ल्यूचा प्रोजेक्ट करायला मदत करीत़ वरकरणी पाहता त्यांची लव्हस्टोरी साधी-सरळ वाटते. पण प्रियदर्शन हे धर्माने ख्रिश्चऩ दोघांचाही धर्म वेगळा़ आवडीनिवडी प्रचंड वेगळ्या. प्रियदर्शन यांचे कुटुंब एकदम धार्मिक़ रुढी, परंपरा पाळणारे़ दिवसातून तीन वेळा प्रार्थना करणारे. त्याउलट जाधव कुटुंब़ पूर्णपणे नास्तिक म्हणता येईल असे. नीलिमा यांच्यावरही तोच पगडा. पण प्रियदर्शन हे नीलिमा यांच्यासाठी जीव की प्राण. त्यांनी त्याच दिवशी वडिलांना गाठले़ प्रियदर्शन यांच्याशी विवाह करण्याचा घेतलेला निर्णय सांगितला. भास्करराव जाधव यांनी कागदावर दोन कॉलम पाडले. एका कॉलममध्ये सकारात्मक तर दुस-या कॉलममध्ये कराव्या लागणा-या तडजोडी लिहिल्या होत्या. या दोन्ही बाबींवर एकदा विचार कर आणि मग निर्णय घे, असा सल्ला दिला. पण नीलिमा यांचा निर्णय पक्का होता. त्याच दिवशी सायंकाळी प्रियदर्शन यांच्या आई विनता बंडेलू यांना भेटून नीलिमा यांनी लग्नाचा विषय काढला. त्या एकदम हबकल्या़ धर्म, रुढी, परंपरा असं सारं त्यांनी नीलिमा यांना सांगितलं. त्यावर नीलिमा यांनी आपल्या सासूबार्इंची समजूत काढली अन् अवघ्या चार तासात लग्नाचा मुहूर्त ठरला. १९८४ साली सौभाग्य सदन कार्यालयात आंतरधर्मीय नोंदणीपद्धतीने दोघांचाही विवाह झाला. नीलिमा आणि प्रियदर्शन हे दोघेही नाटक, सांस्कृतिक कार्यक्रमात रमणारे होते. त्यामुळे दोघांचेही मित्र-मैत्रिणी एकच़ नीलिमा-प्रियदर्शन यांच्या रेशीमगाठी जुळल्यानंतर अनेकजण म्हणू लागले, यांचा विवाह टिकणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पण नीलिमा-प्रियदर्शन यांनी सर्वांची भविष्यवाणी खोटी ठरवत, आपल्या लव्हस्टोरीला सक्सेस स्टोरी बनविले. लग्नानंतर कुटुंबाची वीण अधिक घट्ट व्हावी, म्हणून नीलिमा प्रार्थना करु लागल्या़ सासूबार्इंसोबत चर्चला जाऊ लागल्या. दरम्यान प्रियदर्शन हे नगर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते. दोघेही विविध मुद्यांवर वैचारिक मत मांडीत. पण त्यांच्यात कधी वाद झाले नाहीत. दोघांचेही कविता संग्रह प्रकाशित झाले. नीलिमा यांच्या भावकविता तर प्रियदर्शन यांच्या सामाजिक, पददलितांचे जगणे मांडणा-या कविता होत्या. याविषयी बोलताना प्रियदर्शन बंडेलू सांगतात, नीलिमा यांच्यामुळेच माझ्यामध्ये सामाजिक जाणिवा अधिक प्रगल्भ झाल्या. त्या कवितेत उमटल्या. नीलिमा-प्रियदर्शन यांच्या संसारवेलीवर प्रिनित व निमिषा ही दोन पुष्पे उमलली. दोघेही उच्चशिक्षित आहेत.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरValentine Dayव्हॅलेंटाईन्स डेLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट