शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

शूरा आम्ही वंदिले : हिमालयी योद्धा, मिनीनाथ गिरमकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 11:40 IST

घरची परिस्थिती अतिशय हलाखीची. सहा महिन्यांचे असताना पितृछत्र हरपले. लहानपणी गोळ्या बिस्कीट विकून बारावीपर्यंत शिक्षण घेतले.

ठळक मुद्देशिपाई मिनीनाथ गिरमकरजन्मतारीख ६ डिसेंबर १९७४सैन्यभरती १२ फेब्रुवारी १९९६वीरगती १८ नोंव्हेबर २००१सैन्यसेवा ५ वर्षेवीरमाता नर्मदाबाई रघुनाथ गिरमकर

घरची परिस्थिती अतिशय हलाखीची. सहा महिन्यांचे असताना पितृछत्र हरपले. लहानपणी गोळ्या बिस्कीट विकून बारावीपर्यंत शिक्षण घेतले. एकुलता एक मुलगा असल्याने गावातच एखादी टपरी टाकून पोट भरावे, असे आईला वाटायचे. मात्र श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदीच्या काठच्या अजनुज गावातील मिनीनाथ रघुनाथ गिरमकर यांनी देशसेवेसाठी सैन्य दलात भरती होणे पसंत केले़ कारगील युद्धात आॅपरेशन रक्षकमध्ये अतिरेक्यांशी कडवी झुंज दिली.अजनुज हे भीमा नदी काठावरील उसाचे आगार. वाळू उपशातून बनलेले धनिकांचे गाव. वळणेश्वर महाराजांची पावनभूमी. या भूमीत रघुनाथ व नर्मदाबाई यांच्या पोटी ६ डिसेंबर १९७४ रोजी मिनीनाथ यांचा जन्म झाला. मिनानाथ अवघे सहा महिन्याचे असताना पितृछत्र हरपले. ना जमीन, ना आर्थिक परिस्थिती चांगली़ प्रतिकूल परिस्थितीत नर्मदाबाई यांनी दीड रुपया रोजाने काम करून मिनानाथ यांना लहानाचे मोठे करण्यासाठी लढाई लढली. मिनीनाथ यांनी लहानपणापासून गरीबीचे चटके सोसले. आईच्या लढाईकडे पाहून आईला मदत करण्यासाठी मिनीनाथ धडपड करत असे.मिनानाथ आठवीत असताना त्यांच्या मावशीने खाऊ घेण्यासाठी २५ रुपये दिले. पण मिनानाथ यांनी या पैशातून स्वत:साठी खाऊ न घेता २५ रुपयांचे दोन गोळ्यांचे पुडे आणले. या गोळ्या विक्रीतून दुप्पट पैसे जमले. गोळ््या विक्रीतून पैसे दुप्पट झाल्याने मिनीनाथ यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. याच पैशातून आईला मराठी शाळेजवळ गोळ्या-बिस्कीट विक्रीचा व्यवसाय सुरू करुन दिला. आईच्या हातातील खुरपे काढून घेतले. गोळ्या, बिस्किटे अन् पेरू विकून स्वत:चे शिक्षण केले. माध्यमिक शिक्षण गावातच झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी श्रीगोंदा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयात प्रवेश घेतला. अजनुज ते श्रीगोंदा असा बसने दररोज प्रवास करावा लागणार होता. मात्र बसचा पास काढण्यासाठी पैसे नसायचे, मात्र चिकाटीने त्यांनी शिक्षण घेतले़ बारावीत असताना १२ फेब्रुवारी १९९६ रोजी मिनीनाथ सैन्यदलात भरती झाले. जबलपूर (मध्यप्रदेश) येथे नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण यशस्वी पार पाडल्यानंतर त्यांची पहिली पोस्टींग नोव्हेंबर १९९६ जोधपूर (राजस्थान) रोजी झाली़मिनानाथ सुट्टीला अजनुजमध्ये आले की सर्वांच्या भेटी घेत असत. विचारपूस करीत असत. असेच एकदा सुट्टीवर असताना शेजारील विठ्ठल घाडगे व पांडुरंग घाडगे यांचे छप्पर पेटले. मिनीनाथ यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जाळात उडी मारुन घाडगे यांचे संसारोपयोगी साहित्य बाहेर काढले होते, अशा मिनानाथ यांच्या सामाजिक व धाडसी आठवणी त्यांचे मित्र सांगतात़जोधपूर येथून मिनानाथ यांची १९९९ मध्ये जम्मू काश्मीर राज्यातील रामबन येथे बदली झाली़ त्याचवेळी कारगील युद्धाला तोंड फुटले होते़ कारगिल युद्धात मिनानाथ गिरमकर यांनी पाकिस्तानी सैनिकाविरोधात जोरदार लढा दिला़ पाकिस्तानने आपले सैन्य माघारी घेतले़ त्यानंतरही सीमेवर छोट्या-मोठ्या चकमकी झडत होत्या़रामबन हा भाग पाकिस्तानी सीमेलगत आणि हिमालय पर्वत रांगेत वसलेला आहे़ त्यामुळे या भागात अतिरेक्यांना प्रवेश करण्यास सोपे जाते़ २००१ मध्ये पाकिस्तानी हद्दीतून भारतीय सीमा ओलांडून अतिरेक्यांचा एक मोठा गट सीमाबन भागात घुसल्याची माहिती लष्कराला मिळाली़ या घुसखोरांपासून भारतीय सीमांचे आणि स्थानिकांचे रक्षण करण्यासाठी सैन्याकडून आॅपरेशन रक्षक मोहीम हाती घेण्यात आली़ तो रविवारचा (१८ नोव्हेंबर २००१) दिवस होता़ रामबनच्या दिशेने घुसखोरांचा एक लोंढा येत असल्याची माहिती लष्कराला मिळाली़ हिमालयाच्या पीर पांजल डोंगररांगेत लष्कर व घुसखोरांमध्ये धुमश्चक्री झाली़ घुसखोर उंच डोंगरावरुन भारतीय जवानांवर गोळीबार करीत होते़ वरच्या दिशेने गोळीबार करणे, सैन्याला कठीण जात होते़ तरीही हिमालयाचे जिगर घेऊन मिनानाथ या घुसखोरांवर तुटून पडले होते़ आपल्या बंदुकीत मिनानाथ यांनी अत्यंत वेगवान मारा घुसखोरांच्या दिशेने सुरु केला़ त्यामुळे काही वेळ थांबून घुसखोरांनी मिनिनाथ यांना टार्गेट करुन पहाडावरुन त्यांच्यावरच निशाणा साधला़ घुसखोरांच्या बंदुकीतून निघालेल्या एका गोळीने मिनानाथ यांचा वेध घेतला़ ही गोळी त्यांच्या थेट डोक्यातच घुसली अन् ते रक्ताच्या थारोळ्यात पडले़१९ नोव्हेंबर २००१ रोजी नर्मदाबाई यांना लष्करी अधिकाऱ्यांचा फोन आला. ते हिंदीतून सांगत होते़ पण नर्मदाबाई यांना काही समजले नाही़ २५ नोव्हेंबर रोजी तब्बल सातव्या दिवशी मिनानाथ यांचे पार्थिव गावात आले. मिनिनाथ यांचे पार्थिव पाहताक्षणी नर्मदाबाई बेशुद्ध पडल्या. शोकाकुल वातावरणात ‘जय जवान जय किसान’, ‘मिनानाथ गिरमकर अमर रहे!’ अशा घोषणा देत लष्करी इतमामात वीरपुत्र मिनानाथ यांना अखेरचा निरोप देण्यात आला. मात्र, अनेक दिवसांच्या उपचारानंतर नर्मदाबाई शुद्धीवर आल्या़ आजही त्यांना मुलाची आठवण आली की, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते, एव्हढा गंभीर आघात नर्मदाबार्इंवर झाला़घराला तिरंग्याचा रंगअजनुज गावात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या घरात नर्मदाबाई राहतात़ शहीद मुलाची आठवण म्हणून या वीरमातेनं तिरंग्याचा रंग घराला दिला आहे. शहीद मिनानाथ यांची आठवण अन् प्रेरणा म्हणून गावकरी व वीरमातेने शाळा परिसरात शहीद स्मारक बांधले आहे. वीरमाता नर्मदाबाई दरवर्षी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवतात. गावातील वळणेश्वर माध्यमिक विद्यालयास सांस्कृतिक मंच त्यांनी बांधून दिला आहे.आठवण आली की दवाखानामी एकुलत्या एक मुलासाठी कपाळावर सौभाग्याचे कुंकू नसताना संघर्ष केला. वारसा हक्काची गुंठाभरही जमीन मिळाली नाही. माझं लेकरू शहीद झाल्याची बातमी समजल्यानंतर मी बेशुद्ध पडले. चार वर्षे माझी विस्मरणात गेली. आताही त्याची आठवण आली की बीपी वाढतो. दवाखान्यात जाण्याची वेळ येते. साहेब मला नका विचारू. गावाला विचारा मिनानाथ कसा होता. सध्या मी आजारी असून तीन वर्षापासून मला विलास नाना गिरमकर यांच्या घरून डबा येतो. तो डबा खात एकएक दिवस मी ढकलत आहे. गावातील लोकच माझा आधार आहेत, असे वीरमाता नर्मदाबाई सांगतात.लग्नासाठी यायचे होते...आले पार्थिवमिनानाथ यांचे लग्नाचे वय झाल्याने त्यांच्या आईने एक मुलगी पाहिली. मुला-मुलीचे एकमेकांना पाहणे झाली़ मुलगी पसंत असल्यामुळे मिनानाथ यांनी लग्नास होकार दिला. आईने लग्नाची तारीखही काढली होती. २१ नोव्हेंबर रोजी ते लग्नाच्या तयारीसाठी सुट्टी काढून येणार होते़ पण १८ नाव्हेंबर रोजीच घुसखोरांच्या गोळी मिनानाथ यांचा घात केला अन् थेट मिनानाथ यांचे पार्थिवच अजनुज गावात आले़ ते पाहून वीरमाता नर्मदाबाई बेशुद्ध पडल्या़ चार वर्षे त्यांच्यावर उपचारच सुरु होते़मी आठवीत होतो़ मला पुस्तके, वह्या नव्हत्या. मिनानाथ दहावीला होते. त्यांनी माझी परिस्थिती पाहिली. गोळ्या, बिस्कीट विकून मिळालेल्या पैशातून त्यांनी मला वह्या, पेन, पुस्तके घरी आणून दिली. ते जरी परिस्थितीने गरीब होते, तरी मनाने खूप श्रीमंत होते़ दानशूर होते- -विजय गिरमकर, मिनानाथ यांचे चुलतबंधू- शब्दांकन : बाळासाहेब काकडे

टॅग्स :AhmednagarअहमदनगरIndependence Dayस्वातंत्र्य दिनLokmatलोकमत