शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

जिल्हा मुख्यालयासाठी श्रीरामपूरचेच गुण जुळणार; जिल्हा विभाजन पुन्हा चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 17:45 IST

राज्यातील भौगोलिकदृष्ट्या मोठ्या जिल्ह्यांच्या विभाजानाच्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याने नगरमध्येही त्याचे पडसाद उमटणार आहेत. नगरचे विभाजन होऊन श्रीरामपूर मुख्यालय व्हावे यासाठी जिल्हा कृती समिती व स्थानिक नेत्यांनी नव्याने मोर्चेबांधणी केली आहे.

श्रीरामपूर : मागील भाजप व शिवसेना सरकारमध्ये रखडलेल्या जिल्हा विभाजनाच्या प्रश्नाला महाविकास आघाडी सरकारमध्ये चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राज्यातील भौगोलिकदृष्ट्या मोठ्या जिल्ह्यांच्या विभाजानाच्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याने नगरमध्येही त्याचे पडसाद उमटणार आहेत. नगरचे विभाजन होऊन श्रीरामपूर मुख्यालय व्हावे यासाठी जिल्हा कृती समिती व स्थानिक नेत्यांनी नव्याने मोर्चेबांधणी केली आहे.दिवंगत नेते गोंविदराव आदिक यांनी १९७८ मध्ये पुलोद सरकारमध्ये पाटबंधारे मंत्री असताना श्रीरामपूरला जिल्ह्याचे मुख्यालय करण्याचा विचार मांडला. त्यादृष्टीने येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयही त्यांनी आणले. तालुका पातळीवरील ते सर्वात पहिले परिवहन कार्यालय ठरले. त्यानंतरच्या काळात मुख्यमंत्री झालेल्या ए. आर. अंतुले यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात औरंगाबाद (जालना) व उस्मानाबाद (लातूर) या जिल्ह्यांचे विभाजन केले. तेव्हापासूनच नगर जिल्हा विभाजन व श्रीरामपूर मुख्यालयाचा प्रश्न चर्चेत आहे. मागील भाजप-शिवसेना सरकारमध्ये पालकमंत्री राम शिंदे यांनी अनेकदा जाहिररित्या या प्रश्नाला वाच्यता फोडली. तेव्हा श्रीरामपूरकरांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र त्यास यश मिळाले नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये लातूर, बीडसह नगर अन्य जिल्ह्याचे विभाजन पुन्हा चर्चेत आले आहे. श्रीरामपुरातील सर्वच राजकीय पक्षाचे प्रमुख नेते महाविकास आघाडी सरकारचा भाग आहेत. काँग्रेसचे आमदार लहू कानडे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांचा त्यात समावेश आहे. आम्ही त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.त्यांनीही श्रीरामपूर मुख्यालयाला पाठिंबा दिला आहे. जिल्हा विभाजन होते की त्रिभाजन हे पहावे लागेल. त्रिभाजन हे सुद्धा सरकारच्या विचाराधीन आहे. प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने सरकार त्यावर निर्णय घेईल. आपण लोकप्रतिनिधी या नात्याने श्रीरामपूरकरांच्या भावनेसोबतच आहोत. जिल्हा कृती समितीला सर्व ते सहकार्य करत आहे, असे आमदार लहू कानडे यांनी सांगितले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूरcollectorजिल्हाधिकारी