शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपुरात तरुणांकडे आला गावचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:21 IST

श्रीरामपूर : तालुक्यातील मंगळवारी निवड झालेल्या प्रमुख ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदी काही तरुण व उमेदीच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागली आहे. ...

श्रीरामपूर : तालुक्यातील मंगळवारी निवड झालेल्या प्रमुख ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदी काही तरुण व उमेदीच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागली आहे. ग्रामीण भागातील काही दिग्गज व जुन्या नेत्यांना धक्का देत या तरुणांनी सत्तांतर घडविले. उच्च शिक्षित असलेल्या गावच्या या नव्या सूत्रधारांकडून जनतेला कामाच्या अपेक्षा आहेत.

लोकसंख्येने मोठ्या असलेल्या बेलापूर, टाकळीभान, पढेगाव, निपाणीवाडगाव, वडाळा महादेव, गोंडेगाव, गोवर्धनपूर या प्रमुख ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडीचा कार्यक्रम मंगळवारी (दि.९) पार पडला. यात अपेक्षेप्रमाणे निवडणुकीत जाएंट किलर ठरलेल्या तरुणांकडे ग्रामपंचायतीचा कारभार आला आहे.

बेलापूर येथे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व पदवीधर असलेल्या महेंद्र साळवी तसेच एमबीएचे शिक्षण घेतलेले अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे उपसरपंचपदी विराजमान झाले आहेत. खंडागळे यांनी उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत दिवंगत नेते मुरलीधर खटोड यांचे चिरंजीव रवी यांचा ११ विरुद्ध ६ अशा फरकाने पराभव केला. ग्रामपंचायतीत जाणकारांचे अंदाज चुकवत सत्तांतर घडवून आणण्यात याच तरुणांनी भूमिका बजावली.

टाकळीभान येथे यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य राहिलेल्या कान्हा खंडागळे यांना आता उपसरपंचपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. खंडागळे यांचा दांडगा जनसंपर्क असून, अडचणीतील लोकांचे प्रश्न सोडविण्यावर त्यांचा भर असतो. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची त्यांनी साथ केली आहे.

गोंडेगाव ग्रामपंचायतीत सत्तांतर होत सरपंच व उपसरपंचपदी दोघा तरुणांना संधी मिळाली आहे. सरपंच झालेल्या सागर बढे यांना उमेदीच्या काळात काम करण्याची संधी मिळाली आहे. वडाळा महादेव येथे दादासाहेब झिंज यांच्या रूपाने तरुण सरपंच लाभला आहे. ते मागील काळात सदस्य राहिले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस

अविनाश आदिक यांचे ते समर्थक आहेत. बेलापूर खुर्द येथे दीपक बारहाते तर गोवर्धनपूर येथे राहुल जगताप यांना उपसरपंच पदावर काम करण्याची संधी मिळाली. बारहाते हे व्यवसायाने वकील आहेत.

वयाच्या तिशीत व चाळिशीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेवर काम करण्याची या तरुणांना संधी मिळाली आहे. कोरोना काळात मागे पडलेल्या कामांना त्यांना चालना देता येणार आहे. त्याकरिता १५ व्या वित्त आयोगाचा निधी खात्यांवर जमा झालेला आहे. गावपातळीवर कामाची छाप सोडत जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच सहकाराच्या राजकारणात त्यांना शिरकाव करण्याची संधी प्राप्त झाली आहे.