शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

श्रीरामपुरात तरुणांकडे आला गावचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:21 IST

श्रीरामपूर : तालुक्यातील मंगळवारी निवड झालेल्या प्रमुख ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदी काही तरुण व उमेदीच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागली आहे. ...

श्रीरामपूर : तालुक्यातील मंगळवारी निवड झालेल्या प्रमुख ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदी काही तरुण व उमेदीच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागली आहे. ग्रामीण भागातील काही दिग्गज व जुन्या नेत्यांना धक्का देत या तरुणांनी सत्तांतर घडविले. उच्च शिक्षित असलेल्या गावच्या या नव्या सूत्रधारांकडून जनतेला कामाच्या अपेक्षा आहेत.

लोकसंख्येने मोठ्या असलेल्या बेलापूर, टाकळीभान, पढेगाव, निपाणीवाडगाव, वडाळा महादेव, गोंडेगाव, गोवर्धनपूर या प्रमुख ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडीचा कार्यक्रम मंगळवारी (दि.९) पार पडला. यात अपेक्षेप्रमाणे निवडणुकीत जाएंट किलर ठरलेल्या तरुणांकडे ग्रामपंचायतीचा कारभार आला आहे.

बेलापूर येथे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व पदवीधर असलेल्या महेंद्र साळवी तसेच एमबीएचे शिक्षण घेतलेले अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे उपसरपंचपदी विराजमान झाले आहेत. खंडागळे यांनी उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत दिवंगत नेते मुरलीधर खटोड यांचे चिरंजीव रवी यांचा ११ विरुद्ध ६ अशा फरकाने पराभव केला. ग्रामपंचायतीत जाणकारांचे अंदाज चुकवत सत्तांतर घडवून आणण्यात याच तरुणांनी भूमिका बजावली.

टाकळीभान येथे यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य राहिलेल्या कान्हा खंडागळे यांना आता उपसरपंचपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. खंडागळे यांचा दांडगा जनसंपर्क असून, अडचणीतील लोकांचे प्रश्न सोडविण्यावर त्यांचा भर असतो. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची त्यांनी साथ केली आहे.

गोंडेगाव ग्रामपंचायतीत सत्तांतर होत सरपंच व उपसरपंचपदी दोघा तरुणांना संधी मिळाली आहे. सरपंच झालेल्या सागर बढे यांना उमेदीच्या काळात काम करण्याची संधी मिळाली आहे. वडाळा महादेव येथे दादासाहेब झिंज यांच्या रूपाने तरुण सरपंच लाभला आहे. ते मागील काळात सदस्य राहिले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस

अविनाश आदिक यांचे ते समर्थक आहेत. बेलापूर खुर्द येथे दीपक बारहाते तर गोवर्धनपूर येथे राहुल जगताप यांना उपसरपंच पदावर काम करण्याची संधी मिळाली. बारहाते हे व्यवसायाने वकील आहेत.

वयाच्या तिशीत व चाळिशीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेवर काम करण्याची या तरुणांना संधी मिळाली आहे. कोरोना काळात मागे पडलेल्या कामांना त्यांना चालना देता येणार आहे. त्याकरिता १५ व्या वित्त आयोगाचा निधी खात्यांवर जमा झालेला आहे. गावपातळीवर कामाची छाप सोडत जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच सहकाराच्या राजकारणात त्यांना शिरकाव करण्याची संधी प्राप्त झाली आहे.