शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

युरोपातील ‘रोझी पास्टर’ पक्ष्यांचे श्रीरामपुरात वादळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 12:48 IST

‘पंछी, नदीया, पवन के झोंके! कोई सरहद ना इन्हे रोके !! सरहद तो इन्सानों के लिए हैै,! सोचो हमने, क्या पाया, इन्साँ होके’!! या प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या काव्य पंक्तीचा येथे उल्लेख करण्यामागे कारण विशेषही तसेच आहे.

शिवाजी पवारश्रीरामपूर : ‘पंछी, नदीया, पवन के झोंके! कोई सरहद ना इन्हे रोके !! सरहद तो इन्सानों के लिए हैै,! सोचो हमने, क्या पाया, इन्साँ होके’!! या प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या काव्य पंक्तीचा येथे उल्लेख करण्यामागे कारण विशेषही तसेच आहे. युरोपातील रोझी पास्टर जे भोरड्या, गुलाबी मैैना या नावाने ओळखले जाणारे पक्षी श्रीरामपूर तालुक्यातील अशोक साखर कारखान्यावर मुक्कामी आले आहेत. या ठिकाणी ते गेली दहा वर्षे सातत्याने येतात. युरोपात म्हणजेच त्यांच्या मूळ गावी बर्फवृष्टी सुरू होताच हे पक्षी हजारो किलोमीटर अंतर कापत भारताकडे झेपावतात.डिसेंबर-जानेवारी हे हिवाळ्यातील दोन महिने त्यांचा येथे सहवास असतो. अशोक साखर कारखाना कार्यस्थळावरील इमारतींवर एकत्र जमून सूर्यास्तानंतर ते आकाशात कवायती सादर करतात. ते पाहण्यासाठी पक्षीप्रेमी व निसर्गप्रेमींची मोठी गर्दी होते. अवघा दहा मिनिटे होणारा आकाशातील त्यांचा अदभूत थरार अचंबित व तितकाच आकर्षित करणारा ठरतो. विशेष म्हणजे वडाच्या एका झाडावर रात्री त्यांचा मुक्काम ठरलेला आहे.शेतातील पिकांचे अवशेष, किडे हा त्यांचा आहार. शेतकरी व अन्य नागरिकांना कसलेही आर्थिक वा मानसिक नुकसान पोहोचू न देता ते या ठिकाणी आपले नाते व मैत्री जोडतात. हे नाते प्रत्येक वर्षी अधिक घट्ट होते आहे. जारो मैैलाच्या आपल्या प्रवासादरम्यान शांतता, सहजीवन यांचाच जणू ते संदेश देणारे दूत ठरले आहेत.

युरोपातील रोझी पास्टर जे भोरड्या, गुलाबी मैैना या नावाने ओळखले जाणारे पक्षी श्रीरामपूर तालुक्यातील अशोक साखर कारखान्यावर मुक्कामी आले आहेत. या ठिकाणी ते गेली दहा वर्षे सातत्याने येतात. युरोपात म्हणजेच त्यांच्या मूळ गावी बर्फवृष्टी सुरू होताच हे पक्षी हजारो किलोमीटर अंतर कापत भारताकडे झेपावतात.भारतात दरवर्षी युरोपियन देशांमधून स्थलांतरित होऊन रोझी पास्टर पक्षी नगरमध्ये येतात़ या पक्ष्यांना आपल्याकडे पळस मैना किंवा भोरड्या किंवा गुलाबी मैना म्हणून ओळखले जाते़ नगर शहरातील तारकपूर बसस्थानक, भिस्तबाग, न्यू आर्टस् कॉलेजचा परिसर तसेच नगर तालुक्यातील कापूरवाडी येथेही हे पक्षी हिवाळ्यात आढळतात़ युरोपात बर्फ पडण्यास सुरुवात झाली की पक्ष्यांना अन्न मिळणे अवघड होते़ त्यामुळे अन्नाच्या शोधार्थ ते भारतात येतात़ हे पक्षी साधारणपणे फेबु्रवारीपर्यंत भारतात राहतात़ नंतर हळूहळू पुन्हा त्यांच्या मायदेशात परत जातात.-  प्रा़ सुधाकर कु-हाडे, पक्षी अभ्यासकव्हिडिओ पाहण्यासाठी  www.Lokmat.com  पेजला भेट द्या.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर