शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
2
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या आंदोलन केले सुरू
4
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही
5
'डेंजर झोन'मध्ये साई सुदर्शननं घेतला जबरदस्त No Look Catch! कॅरेबियन बॅटरसह सगळेच शॉक (VIDEO)
6
"मोदी सरकारने अदानीच्या कल्याणमधील सिमेंट कंपनीसाठी सर्व नियम बदलले", काँग्रेसचा गंभीर आरोप
7
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट; लॉन्च केल्या ₹35,440 कोटींच्या दोन योजना...
8
बँकांत तब्बल १७६ कोटी रुपये पडून, तुमचे तर नाहीत ना? मालकच मिळेनात, १० वर्षांपासून ग्राहक फिरकले नाहीत, पैसे नेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
9
बिहारमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं...! 57 पेक्षा जास्त जागा द्यायला लालूंचा नकार; आता काय होणार?
10
पैशांसाठी पोलिसांची हैवानियत! पास झाला म्हणून पार्टी करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण; पॅनक्रियाज हॅमरेजने मृत्यू
11
नव्या रुपात परततेय Tata Sierra! पेट्रोल, डिझेल, EV व्हर्जनमध्ये होणार लाँच; थेट Creta, Seltos सारख्या कारला देणार टक्कर
12
VIDEO: रोहित शर्मा सुरक्षा रक्षकावर भडकला; मुंबईच्या शिवाजी पार्कवर नेमकं काय घडलं? पाहा...
13
"३१ हजार कोटींच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार, पण माझी एक अट", उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी
14
'मिस्टर मोदी, तुम्ही दुबळे आहात...', अफगाणी परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
15
गजकेसरीसह ३ राजयोगांचा वरदान काळ: ९ राशींचे मंगल, हाती पैसा खेळेल; सुख-समृद्धी, शुभ-भरभराट!
16
FD मध्ये गुंतवणूक करायचीय? हे आहेत 10 बेस्ट बँक ऑप्शन्स, येथे मिळतोय जवळपास 9% परतावा; जाणून घ्या सविस्तर
17
Diwali 2025: रांगोळीत दडलंय लक्ष्मी कृपेचं गूढ, एकदा समजून घ्याल तर स्टिकर वापरणार नाही!
18
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
19
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
20
Shubman Gill Record : टीम इंडियातील 'प्रिन्स'ची कमाल; क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'चा महारेकॉर्ड मोडला

श्रीगोंदेकरांनी ५७ वर्षात दिले अवघे चार आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 12:40 IST

श्रीगोंद्याच्या ५७ वर्षाच्या राजकीय इतिहासात विधानसभेच्या अकरा निवडणुका झाल्या. यात चार दिग्गज नेत्यांच्या हातात आमदारकीची सत्ता दिली आहे. या काळात भौगौलिक व राजकीय स्थित्यंतरे झाली. यातून श्रीगोंद्याची राजकीय रणभूमी राज्याच्या पटलावर नेहमीच गाजत राहिली आहे.

मतदारसंघाचा इतिहास /बाळासाहेब काकडे । श्रीगोंदा : श्रीगोंद्याच्या ५७ वर्षाच्या राजकीय इतिहासात विधानसभेच्या अकरा निवडणुका झाल्या. यात चार दिग्गज नेत्यांच्या हातात आमदारकीची सत्ता दिली आहे. या काळात भौगौलिक व राजकीय स्थित्यंतरे झाली. यातून श्रीगोंद्याची राजकीय रणभूमी राज्याच्या पटलावर नेहमीच गाजत राहिली आहे.संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर विधानसभा अस्तित्वात आली. १९६२ ला पहिला आमदार होण्याचा मान दलित नेते बाबूराव भारस्कर यांना मिळाला. त्यांनी १९६२ ते १९७७ या काळात सत्तेचा वजीर आपल्या ताब्यात ठेवला. १९७२ ला काँग्रेस पक्षाने त्यांना तिकीट नाकारले. यावेळी प्रभाकर शिंदे यांना उमेदवारी दिली. बाबूराव भारस्कर यांनी या निवडणुकीत पक्षादेश म्हणून शिंदे यांना पाठिंबा दिला तरी श्रीगोंदेकरांनी आमदारकीची माळ भारस्कर यांच्याच गळ्यात घातली. बाबूराव भारस्कर लोणीव्यंकनाथ येथे समाज मंदिरात असताना त्यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी मामलेदार तार घेऊन लोणीव्यंकनाथला आले. मुंबईला जाण्यासाठी ना पैसे.. ना अंगावर कपडे...त्यावेळी स्व.शिवाजीराव जंगले यांचे वडील कान्होजी जंगले यांनी भारस्कर यांना कपडे व प्रवासासाठी १०० रुपये दिले. भारस्कर मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले. १९६५ च्या सुमारास तालुक्यातील काष्टी परिसरातील १५-१६ गावांमध्ये घोडचे पाणी आले. दुष्काळी भागातील घोडचा पट्टा ओयासिस झाला. सन १९७२ ला ढोकराईच्या माळरानावर शिवाजीराव नागवडे यांनी श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून विकासाचे धुराडे पेटविले. १९७७ ला शिवाजीराव नागवडे यांना आमदारकीची संधी मिळाली. मात्र अडीच वर्षात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. काँग्रेस विचारसरणीच्या राजकारणाला श्रीगोंदेकरांनी छेद देत बबनराव पाचपुते यांच्याकडे आमदारकीची सत्ता दिली. पाचपुते १९८० ते १९९५ आमदार राहिले. मात्र शिवाजीराव नागवडे यांनी पाचपुतेंचा राजकीय पिच्छा सोडला नाही. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत पाचपुतेंचा त्यांनी पराभव केला. त्यानंतर पाचपुतेंनी पुन्हा पंधरा वर्षे म्हणजे २०१४ पर्यंत आपणाकडे आमदारकी शाबूत ठेवली.कुकडीचे पाणी अंगणी आले. भीमा, घोड नदीवर बंधारे झाले. दुष्काळी तालुक्याची ओळख पाणीदार तालुका म्हणून झाली. कुकडी, साईकृपा साखर कारखान्याची धुराडी पेटली. भाकरीभोवती फिरणारे राजकारण साखरेभोवती फिरू लागले. प्रचारातील सायकल, बैलगाडी, ट्रॅक्टर गेले. अलिशान गाड्यांचा धुराडा उडू लागला. पुन्हा कुकडी, घोडचा पाणी प्रश्न बदलत्या काळात ऐरणीवर आला आहे. राजकारणाचे चंगळवादी विश्व आले. तत्व, निष्ठा गेली. घोडेबाजार सुरू झाला. रात्रीत झेंडे बदल होऊ लागले. त्यामुळे नेत्यांची झोपच संपली. २०१४ मध्ये माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी राष्टवादीचे नेते शरद पवार यांना सोडचिठ्ठी दिली. शरद पवार यांनी नागवडे, जगताप यांची मूठ बांधून बबनराव पाचपुते यांचा पराभव केला. आमदार राहुल जगताप या युवा नेतृत्वाचा उदय श्रीगोंद्याच्या रणभूमीवर झाला. होम टु होम प्रचार संपला. सोशल मीडियावरच्या दिखाऊ व विकाऊ प्रचाराची सुगी सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत पुन्हा राजकीय प्रतिष्ठा आणि अस्तित्वासाठी २०१९ चा महामुकाबला सुरू झाला. या मुकाबल्यात कोणाला उमेदवारी? कुणाच्या हाती बंडाचे निशाण? याविषयी सर्वांना उत्सुकता आहे.सायकल आणि शंभर रुपये बाबूराव भारस्कर हे मूळ शेवगावचे. एक सायकल आणि शंभर रुपये घेऊन याच भांडवलावर १५ आमदारकीची सत्ता भोगली. समाजकल्याणमंत्री झाले. सत्तेच्या माध्यमातून पैसा न कमविता माणसाला माणूस जोडण्याचे काम केले. माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी  १९८० ला बुलेटवर प्रचार केला. आमदारकीची सत्ता मिळवली. या प्रवासात पाचपुतेंनी अनेक प्लॅटफॉर्म बदलले. १९८० ला बबनराव पाचपुते हे अविवाहित होते. ते आमदार झाले. २०१४ ला अविवाहित आमदार म्हणून राहुल जगताप यांनी नवा इतिहास रचला. श्रीगोंद्यातील आमदार असे..१९६२ : बाबूराव भारस्कर१९७७ : शिवाजीराव नागवडे १९८० : बबनराव पाचपुते १९९५ : शिवाजीराव नागवडे १९९९ : बबनराव पाचपुते २०१४ : राहुल जगताप 

टॅग्स :Shrigondaश्रीगोंदाPoliticsराजकारण