शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

श्रीगोंदेकरांनी ५७ वर्षात दिले अवघे चार आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 12:40 IST

श्रीगोंद्याच्या ५७ वर्षाच्या राजकीय इतिहासात विधानसभेच्या अकरा निवडणुका झाल्या. यात चार दिग्गज नेत्यांच्या हातात आमदारकीची सत्ता दिली आहे. या काळात भौगौलिक व राजकीय स्थित्यंतरे झाली. यातून श्रीगोंद्याची राजकीय रणभूमी राज्याच्या पटलावर नेहमीच गाजत राहिली आहे.

मतदारसंघाचा इतिहास /बाळासाहेब काकडे । श्रीगोंदा : श्रीगोंद्याच्या ५७ वर्षाच्या राजकीय इतिहासात विधानसभेच्या अकरा निवडणुका झाल्या. यात चार दिग्गज नेत्यांच्या हातात आमदारकीची सत्ता दिली आहे. या काळात भौगौलिक व राजकीय स्थित्यंतरे झाली. यातून श्रीगोंद्याची राजकीय रणभूमी राज्याच्या पटलावर नेहमीच गाजत राहिली आहे.संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर विधानसभा अस्तित्वात आली. १९६२ ला पहिला आमदार होण्याचा मान दलित नेते बाबूराव भारस्कर यांना मिळाला. त्यांनी १९६२ ते १९७७ या काळात सत्तेचा वजीर आपल्या ताब्यात ठेवला. १९७२ ला काँग्रेस पक्षाने त्यांना तिकीट नाकारले. यावेळी प्रभाकर शिंदे यांना उमेदवारी दिली. बाबूराव भारस्कर यांनी या निवडणुकीत पक्षादेश म्हणून शिंदे यांना पाठिंबा दिला तरी श्रीगोंदेकरांनी आमदारकीची माळ भारस्कर यांच्याच गळ्यात घातली. बाबूराव भारस्कर लोणीव्यंकनाथ येथे समाज मंदिरात असताना त्यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी मामलेदार तार घेऊन लोणीव्यंकनाथला आले. मुंबईला जाण्यासाठी ना पैसे.. ना अंगावर कपडे...त्यावेळी स्व.शिवाजीराव जंगले यांचे वडील कान्होजी जंगले यांनी भारस्कर यांना कपडे व प्रवासासाठी १०० रुपये दिले. भारस्कर मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले. १९६५ च्या सुमारास तालुक्यातील काष्टी परिसरातील १५-१६ गावांमध्ये घोडचे पाणी आले. दुष्काळी भागातील घोडचा पट्टा ओयासिस झाला. सन १९७२ ला ढोकराईच्या माळरानावर शिवाजीराव नागवडे यांनी श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून विकासाचे धुराडे पेटविले. १९७७ ला शिवाजीराव नागवडे यांना आमदारकीची संधी मिळाली. मात्र अडीच वर्षात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. काँग्रेस विचारसरणीच्या राजकारणाला श्रीगोंदेकरांनी छेद देत बबनराव पाचपुते यांच्याकडे आमदारकीची सत्ता दिली. पाचपुते १९८० ते १९९५ आमदार राहिले. मात्र शिवाजीराव नागवडे यांनी पाचपुतेंचा राजकीय पिच्छा सोडला नाही. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत पाचपुतेंचा त्यांनी पराभव केला. त्यानंतर पाचपुतेंनी पुन्हा पंधरा वर्षे म्हणजे २०१४ पर्यंत आपणाकडे आमदारकी शाबूत ठेवली.कुकडीचे पाणी अंगणी आले. भीमा, घोड नदीवर बंधारे झाले. दुष्काळी तालुक्याची ओळख पाणीदार तालुका म्हणून झाली. कुकडी, साईकृपा साखर कारखान्याची धुराडी पेटली. भाकरीभोवती फिरणारे राजकारण साखरेभोवती फिरू लागले. प्रचारातील सायकल, बैलगाडी, ट्रॅक्टर गेले. अलिशान गाड्यांचा धुराडा उडू लागला. पुन्हा कुकडी, घोडचा पाणी प्रश्न बदलत्या काळात ऐरणीवर आला आहे. राजकारणाचे चंगळवादी विश्व आले. तत्व, निष्ठा गेली. घोडेबाजार सुरू झाला. रात्रीत झेंडे बदल होऊ लागले. त्यामुळे नेत्यांची झोपच संपली. २०१४ मध्ये माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी राष्टवादीचे नेते शरद पवार यांना सोडचिठ्ठी दिली. शरद पवार यांनी नागवडे, जगताप यांची मूठ बांधून बबनराव पाचपुते यांचा पराभव केला. आमदार राहुल जगताप या युवा नेतृत्वाचा उदय श्रीगोंद्याच्या रणभूमीवर झाला. होम टु होम प्रचार संपला. सोशल मीडियावरच्या दिखाऊ व विकाऊ प्रचाराची सुगी सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत पुन्हा राजकीय प्रतिष्ठा आणि अस्तित्वासाठी २०१९ चा महामुकाबला सुरू झाला. या मुकाबल्यात कोणाला उमेदवारी? कुणाच्या हाती बंडाचे निशाण? याविषयी सर्वांना उत्सुकता आहे.सायकल आणि शंभर रुपये बाबूराव भारस्कर हे मूळ शेवगावचे. एक सायकल आणि शंभर रुपये घेऊन याच भांडवलावर १५ आमदारकीची सत्ता भोगली. समाजकल्याणमंत्री झाले. सत्तेच्या माध्यमातून पैसा न कमविता माणसाला माणूस जोडण्याचे काम केले. माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी  १९८० ला बुलेटवर प्रचार केला. आमदारकीची सत्ता मिळवली. या प्रवासात पाचपुतेंनी अनेक प्लॅटफॉर्म बदलले. १९८० ला बबनराव पाचपुते हे अविवाहित होते. ते आमदार झाले. २०१४ ला अविवाहित आमदार म्हणून राहुल जगताप यांनी नवा इतिहास रचला. श्रीगोंद्यातील आमदार असे..१९६२ : बाबूराव भारस्कर१९७७ : शिवाजीराव नागवडे १९८० : बबनराव पाचपुते १९९५ : शिवाजीराव नागवडे १९९९ : बबनराव पाचपुते २०१४ : राहुल जगताप 

टॅग्स :Shrigondaश्रीगोंदाPoliticsराजकारण