शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

नगर जिल्ह्यात महाबीजच्या बियाण्यांचा तुटवडा; घरगुती बियाण्यांची पेरणी : अवकाळीमुळे बिजोत्पादन वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 12:31 IST

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) बीजोत्पादन कार्यक्रमाला मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. यंदा नगर जिल्ह्यात सोयाबीन, उडीद व मूगाच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. 

शिवाजी पवार  / 

श्रीरामपूर : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) बीजोत्पादन कार्यक्रमाला मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. यंदा नगर जिल्ह्यात सोयाबीन, उडीद व मूगाच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. 

सोयाबीनचे ६० टक्के तर मुगाच्या अवघ्या १२ टक्के बियाण्यांचा पुरवठा होऊ शकला आहे. कर्जत व जामखेड येथे उडदाच्या पेरणीकरिता थेट आंध्र प्रदेशातून बियाणे मागवावे लागत आहे. 

महामंडळाकडून शेतक-यांना सोयाबीन, मूग, उडीद पिकांच्या उच्चतम दर्जाचे बियाणे वाजवी दरात पुरविले जाते. महामंडळ शेतक-यांना चांगला दर देऊन पुन्हा ते बियाणे खरेदी करते.

 मात्र मागील वर्षी जिल्ह्यात पिकांच्या ऐन काढणीवेळी अवकाळीने तडाखा दिला. त्यामुळे सोयाबीन, मूग व उडदाचे उत्पादन वाया गेले. महामंडळाकडे आलेल्या जेमतेम शेतक-यांचे बियाणे गुणवत्तेच्या निकषात नापास ठरले. त्यामुळे ते नाकारण्यात आले. यंदाच्या खरीप हंगामातील पेरणीला त्याचा फटका बसला आहे. 

उत्तर नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, नेवासे, राहाता, कोपरगाव या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने सोयाबीनची पेरणी केली जाते. तेथे यंदा वितरकांनी २८ हजार क्विंटल बियाण्याची मागणी केली होती.

 प्रत्यक्षात पुरवठा मात्र अवघा १६ हजार क्विंटलपर्यंत होऊ शकला. सुमारे ४० टक्के तुटवडा निर्माण    झाला आहे. मात्र शेतकºयांनी स्वत:कडील बियाण्यांची पेरणी केल्याने ही उणीव काही अंशी भरून निघाली. महामंडळाला सोयाबीनच्या ४२ हजार क्विंटल बियाण्यांची उपलब्धता होण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात केवळ १९ हजार क्विंटल बियाणे पेरणीस पात्र ठरले.

दरम्यान, जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये उडीद व मूगाची पेरणी ब-यापैैकी होते. दक्षिणेमध्ये साडे तीन ते चार हजार क्विंटल उडीदाच्या बियाण्याची मागणी झाली आहे. मात्र महामंडळ दोन हजार क्विंटलचा देखील पुरवठा करण्यास असमर्थ ठरले. दीड हजार क्विंटल बियाण्याची मागणी एकट्या जामखेड तालुक्यातून झाली आहे. 

महामंडळाने वेळीच गांभीर्य लक्षात घेऊन आंध्र प्रदेशातून   बियाणे पुरविण्याकरिता निविदा मागविल्या होत्या. सुमारे ५०० क्विंटल बियाणे त्यातून उपलब्ध झाले असून आणखी काही प्रमाणात ते मिळेल असा विश्वास महामंडळाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला.मुगाच्या ८०० क्विंटल बियाण्याची मागणी असताना महामंडळाकडून कुठलाही पुरवठा होऊ शकलेला नाही.

सोयाबीनचे दर ७४ रुपयांवरउत्पादनाअभावी यंदा महामंडळाने अनुदानित सोयाबीन बियाण्यांचा शेतक-यांना पुरवठा केलेला नाही. यंदा सोयाबीनच्या बियाण्यांचे दर ६५ रुपये किलोहून ७४ रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे शेतक-यांना झळ बसली आहे.

शेतक-यांनी स्वत:कडील बियाण्यांची पेरणी करावी याकरिता महाबीजकडून जनजागृती करण्यात आली. एप्रिल व मे महिन्यातील उष्णतेमध्ये प्रयोगशाळेत नापास ठरलेले बियाणे आता हवामानातील बदलामुळे पेरणीयोग्य ठरू शकेल. तशा सूचना शेतक-यांना दिल्या आहेत. त्यामुळे तूट भरून निघेल, असे महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र जोशी यांनी सांगितले.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर