शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

शिवसेनेत बेरजेचे राजकारण नसते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:19 IST

अहमदनगर : शिवसेनेने बेरजेचे राजकारण कधीच केले नाही, असे वक्तव्य शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे यांनी केले आहे. महापालिकेतील सभापती ...

अहमदनगर : शिवसेनेने बेरजेचे राजकारण कधीच केले नाही, असे वक्तव्य शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे यांनी केले आहे. महापालिकेतील सभापती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या वक्तव्यामुळे सेनेमध्ये दोन गट असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

लिंक रोड, केडगाव येथील जे.एल.पी. सोसायटीमधील कल्पतरू कॉलनी येथे स्वीकृत नगरसेवक संग्राम शेळके यांच्या निधीतून वाॅर्ड क्रमांक १५ मध्ये अंतर्गत ड्रेनेजलाईन कामाच्या उद्घाटनप्रसंगी शिंदे बोलत होते. यावेळी नगरसेवक संग्राम शेळके, नगरसेवक विजय पठारे, प्रवक्ते रमेश परतानी, कृष्णा साळवे, संग्राम केदार, पिराजी कोतकर, दिलीप दहिफळे, अप्पासाहेब गागरे, जालिंदर पालवे, सागर गायकवाड, आनंद विधाते, तेजस कपिले, नीलेश लहाने, आदित्य पालवे, चेतन जाधव, डॉ. सोमनाथ पवार व सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी शिंदे म्हणाले, बेरजेच्या राजकारणापेक्षा शिवसेनेचा मुख्य उद्देश हा शहराचा विकास करण्याचा आहे. शिवसेनेने इतर पक्षाप्रमाणे कधीही श्रेय लाटण्याचे काम केले नाही, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे. उपनगरांचा विकास फक्त शिवसेनेच्याच माध्यमातून होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. सभापतिपदाच्या निवडणुकीत बेरीज झाली असती तर सेनेचा सभापती होऊ शकला असता. मात्र सेनेत फूट पडल्याचे सभापती निवडणुकीच्या दिवशीच स्पष्ट झाले.