शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

शिवभोजन केंद्र अडचणीत; सरकार अनुदान देईना, चार महिन्यांपासून थकले 

By चंद्रकांत शेळके | Updated: October 5, 2023 21:13 IST

शिवभोजन चालक १० रुपयांत ही थाळी ग्राहकाला देतात. प्रतिथाळीमागे शिवभोजनचालकांना शहरी भागात ४० रुपये, तर ग्रामीण भागात २५ रुपये अनुदान मिळते.

अहमदनगर : सर्वसामान्य लोकांना केवळ १० रुपयांत, प्रसंगी मोफत भोजन देणारे शिवभोजन केंद्रचालकच जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे उपाशी राहण्याच्या मार्गावर आहेत. कारण, जिल्हा प्रशासनाकडे पुरेसा निधी असूनही केवळ कर्मचाऱ्यांच्या दप्तर दिरंगाईमुळे हे अनुदान गेल्या चार महिन्यांपासून रखडले आहे.

जिल्ह्यात सध्या ३७ शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. यात ग्रामीण भागात १९ कार्यरत असून, तेथे २१२५ थाळी मंजूर आहेत. तर शहरी भागात १८ केंद्रांवर २२०० थाळी मंजूर आहेत. अशा एकूण ४३२५ थाळी दररोज नागरिकांना दिल्या जातात.

शिवभोजन चालक १० रुपयांत ही थाळी ग्राहकाला देतात. प्रतिथाळीमागे शिवभोजनचालकांना शहरी भागात ४० रुपये, तर ग्रामीण भागात २५ रुपये अनुदान मिळते.

या ३७ शिवभोजन केंद्रांचे महिन्याचे साधारण ४० लाखांचे अनुदान होते. शासन आदेशानुसार शिवभोजन केंद्रांना १५ दिवसांत अनुदान देण्याची तरतूद आहे. परंतु जिल्ह्यातील अनुदान गेल्या चार महिन्यांपासून थकले आहे. प्रत्येक शिवभोजन केंद्रावर १०० ते २०० पर्यंत थाळीसंख्या दररोज असते. त्यासाठी हजारोंचा खर्च आहे. शिवभोजन चालक उसनवारी करून केंद्र चालवत आहेत. जिल्हा प्रशासनाला शासनाकडून निधी आलेला आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे अनुदान वाटप झालेले नाही. ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही अनेकदा शासनाने तीन-तीन महिने अनुदान रखडवले आहे. यामुळे अनेक शिवभोजन केंद्र बंद झाली आहेत.अन्नधान्य वितरणकडून प्रस्तावच येईनातदररोज किती लोकांनी भोजन घेतले याची एकत्रित माहिती केंद्रचालक ग्रामीण भागात संबंधित तहसील, तसेच शहरी भागात अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांकडे पाठवतात. येथे या माहितीची तपासणी करून अंतिम प्रस्ताव जिल्हा पुरवठा कार्यालयाकडे पाठवला जातो. परंतु गेल्या चार महिन्यांपासून हे प्रस्तावच तालुका, तसेच अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांकडून पुरवठा विभागाकडे आलेले नाहीत. यामुळे हे अनुदान रखडले आहे.चार महिन्यांचे दीड कोटी थकलेदररोज साधारण ४ हजार थाळ्या वाटप होतात. त्यापोटी महिन्याला सुमारे ४० लाखांचे अनुदान शिवभोजन चालकांना द्यावे लागते. असे एकूण चार महिन्यांचे सुमारे दीड कोटी रुपये प्रशासनाने थकवले आहेत. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून अनुदान देण्यात दिरंगाई होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनीच यात लक्ष घालण्याची मागणी शिवभोजन चालकांनी केली आहे.