शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

ब्रिटिशांनीही आणली होती  शिर्डीच्या रामनवमी उत्सवावर बंदी, ७९ वर्षांपूर्वीचा निर्णय : १९४१ला आली होती कॉलराची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 12:31 IST

शिर्डी : ब्रिटिश सरकारने कॉलराची साथ पसरू नये यासाठी १९४१ साली शिर्डीतील रामनवमी उत्सवाला येण्यासाठी भाविकांवर बंदी घातली होती़ कॉलराचा फैलाव होऊ नये म्हणून ७९ वर्षापूर्वी ब्रिटिशांनी धार्मिक भावनांचा विचार न करता 

प्रमोद आहेर । लोकमत न्यूज नेटवर्कशिर्डी : ब्रिटिश सरकारने कॉलराची साथ पसरू नये यासाठी १९४१ साली शिर्डीतील रामनवमी उत्सवाला येण्यासाठी भाविकांवर बंदी घातली होती़ कॉलराचा फैलाव होऊ नये म्हणून ७९ वर्षापूर्वी ब्रिटिशांनी धार्मिक भावनांचा विचार न करता यात्रेवर बंदी आणली होती. या घटनेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उजाळा मिळाला आहे़  १९४१ साली ५ ते ७ एप्रिल रामनवमी यात्रा होती़ यावेळी शिर्डीसह आसपासच्या गावात कॉलराची साथ असल्याने सरकारने यात्रा बंद ठेवण्याचा हुकूम काढला़ कुस्त्यांचा हंगामा, शोभेची दारू फोडणे यासह गर्दी होईल व रोगाचा फैलाव होईल असे सर्व कार्यक्रम बंद ठेवण्यात आले होते. यात्रेत एकही दुकान येऊ दिले नाही. कोपरगावला गोदावरीचे पाणीही दूषित असल्याने कावड मिरवणूकही बंद ठेवण्यात आली होती. ४ एप्रिलनंतर आलेल्या भाविकांना पोलिसांनी शिर्डीत प्रवेश दिला नाही़ दूरदूरून आलेले लोक पोलिसांच्या हुकुमाने परत गेले़ जे लोक यात्रेच्या अगोदर आले होते त्यांना कॉलराचे इंजेक्शन दिले गेले. त्यांना १३ एप्रिल पर्यंत शिर्डीत ठेवून घेतले़ दर्शनाला तरी परवानगी द्यावी, म्हणून तात्या कोते व सुखटणकर हे नगरला जाऊन जिल्हाधिकारी बहादूर यांना भेटले. पाच ताराही केल्या. पण उपयोग झाला नाही़उत्सवात कीर्तन, भजन, अभिषेक कार्यक्रम अल्प प्रमाणात करण्यात आले़ पाच दिवसांचा उत्सव होता. सरकारच्या हुकूमाने तीन दिवसांचा रद्द झाला. उर्वरित दोन दिवस सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सरकारच्या हुकुमाला अनुसरून बंद करावे लागले़ उत्सवात स्थानिकांना भोजनाऐवजी कोरडा शिधा देण्यात आला़ याच पार्श्वभूमीवर शिर्डीला येतांना भाविकांनी मच्छरदाणी आणण्याचे आवाहन २३ जून १९४१ रोजी संस्थानकडून करण्यात आले होते़ शिर्डी गॅझेटिअरमध्ये याबाबत सविस्तर नोंदी आहेत़