शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

ब्रिटिशांनीही आणली होती  शिर्डीच्या रामनवमी उत्सवावर बंदी, ७९ वर्षांपूर्वीचा निर्णय : १९४१ला आली होती कॉलराची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 12:31 IST

शिर्डी : ब्रिटिश सरकारने कॉलराची साथ पसरू नये यासाठी १९४१ साली शिर्डीतील रामनवमी उत्सवाला येण्यासाठी भाविकांवर बंदी घातली होती़ कॉलराचा फैलाव होऊ नये म्हणून ७९ वर्षापूर्वी ब्रिटिशांनी धार्मिक भावनांचा विचार न करता 

प्रमोद आहेर । लोकमत न्यूज नेटवर्कशिर्डी : ब्रिटिश सरकारने कॉलराची साथ पसरू नये यासाठी १९४१ साली शिर्डीतील रामनवमी उत्सवाला येण्यासाठी भाविकांवर बंदी घातली होती़ कॉलराचा फैलाव होऊ नये म्हणून ७९ वर्षापूर्वी ब्रिटिशांनी धार्मिक भावनांचा विचार न करता यात्रेवर बंदी आणली होती. या घटनेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उजाळा मिळाला आहे़  १९४१ साली ५ ते ७ एप्रिल रामनवमी यात्रा होती़ यावेळी शिर्डीसह आसपासच्या गावात कॉलराची साथ असल्याने सरकारने यात्रा बंद ठेवण्याचा हुकूम काढला़ कुस्त्यांचा हंगामा, शोभेची दारू फोडणे यासह गर्दी होईल व रोगाचा फैलाव होईल असे सर्व कार्यक्रम बंद ठेवण्यात आले होते. यात्रेत एकही दुकान येऊ दिले नाही. कोपरगावला गोदावरीचे पाणीही दूषित असल्याने कावड मिरवणूकही बंद ठेवण्यात आली होती. ४ एप्रिलनंतर आलेल्या भाविकांना पोलिसांनी शिर्डीत प्रवेश दिला नाही़ दूरदूरून आलेले लोक पोलिसांच्या हुकुमाने परत गेले़ जे लोक यात्रेच्या अगोदर आले होते त्यांना कॉलराचे इंजेक्शन दिले गेले. त्यांना १३ एप्रिल पर्यंत शिर्डीत ठेवून घेतले़ दर्शनाला तरी परवानगी द्यावी, म्हणून तात्या कोते व सुखटणकर हे नगरला जाऊन जिल्हाधिकारी बहादूर यांना भेटले. पाच ताराही केल्या. पण उपयोग झाला नाही़उत्सवात कीर्तन, भजन, अभिषेक कार्यक्रम अल्प प्रमाणात करण्यात आले़ पाच दिवसांचा उत्सव होता. सरकारच्या हुकूमाने तीन दिवसांचा रद्द झाला. उर्वरित दोन दिवस सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सरकारच्या हुकुमाला अनुसरून बंद करावे लागले़ उत्सवात स्थानिकांना भोजनाऐवजी कोरडा शिधा देण्यात आला़ याच पार्श्वभूमीवर शिर्डीला येतांना भाविकांनी मच्छरदाणी आणण्याचे आवाहन २३ जून १९४१ रोजी संस्थानकडून करण्यात आले होते़ शिर्डी गॅझेटिअरमध्ये याबाबत सविस्तर नोंदी आहेत़