शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

शिर्डी मतदारसंघातून लढणार नाही : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 18:49 IST

आगामी लोकसभा निवडणूक शिर्डीतून नव्हे तर दक्षिण मध्य मुंबईतून लढविणार असल्याचे केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नगर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.

अहमदनगर: आगामी लोकसभा निवडणूक शिर्डीतून नव्हे तर दक्षिण मध्य मुंबईतून लढविणार असल्याचे केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नगर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.आठवले म्हणाले, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचा चेहरा आणखी व्यापक करण्यासाठी आणि निवडणूकीत विजय मिळविण्यासाठी येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत नॉन दलित (दलितेतर) प्रतिनिधांना उमेदवारी देणार आहे. या निवडणुकीत सेना-भाजपाची युती झाली नाही तर लोकसभेच्या चार तर विधानसभेच्या २५ जागा पक्ष मागणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे. नोटाबंदी आणि जीएसटी या विषयांवरून विरोध टीका करत असले तरी हे दोन्ही निर्णय देशहिताचेच आहेत.  सरकारविरोधात दोन दिवसांपूर्वी देशात पुकारलेल्या भारतबंदला प्रतिसाद मिळाला नाही. केलेली कामे आणि आणि चांगल्या निर्णयाच्या जोरावर केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार आहे. अ‍ॅट्रोसिटी कायद्यात कुठलाही बदल होणार नाही. हा कायदा दलितांच्या रक्षणासाठी असून सवर्णांना त्रास देण्यासाठी नाही. याचा गैरवापर होत असेल तर मंत्री म्हणून यात लक्ष्य घालणार आहे. दलितांवरील अत्याचारांच्या घटनेबाबत कुणी राजकारण करू नये. आरक्षणाची मर्यादा ७५ टक्यांपर्यंत केली तर मराठा समाजासह रजपूत, जाठ, ठाकूर, धनगर या समाजाला आरक्षण देणे शक्य होणार आहे. फडणवीस सरकार मराठा समाजाच्या बाजुने उभा आहे, असे सांगत आठवले यांनी दलित शब्दाच्या वापरास मनाई करणा-या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाकडून याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.आम्ही नक्षलवाद्यांपेक्षा खतरनाकआम्ही नक्षलवाद्यांपेक्षाही खतरनाक आहोत. पण पोलीसांनी आम्हाला कधी अटक केली नाही. कारण आम्ही जनहित आणि देशहितासाठी काम करतोत. काही दिवसांपूर्वी अटक झालेल्या विचारवंतांविरोधात ते नक्शलवाद्यांशी संबंधित असल्याचे पुरावे असल्याचे पोलीस सांगत आहेत. चौकशीतून सत्य समोर येईलच. नक्शलवादी विचारसरणी असणा-यांनी आंबेडकरवादी असल्याचा बुरखा पांघरू नये, असे आठवले म्हणाले.पोलीसांनी भिडेंच्या विरोधात पुरावे शोधावेतभीमा-कोरेगाव दंगलीशी नाव जोडले गेलेले संभाजी भिडे हे सर्वत्र फिरून वाद्ग्रस्त वक्तव्य करत आहेत. पोलीसांनी भिंडेंच्या विरोधात पुरावे गोळा करून कडक कारवाई करावी. भिंडेंचे वक्तव्य जरी तपासले तरी पुरावे मिळतील़ असे आठवले म्हणाले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRamdas Athawaleरामदास आठवले