शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

माझी वसुंधरा अभियानात शिर्डी नगर पंचायत राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:16 IST

पंचत्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत शिर्डी नगर पंचायतीने ...

पंचत्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत शिर्डी नगर पंचायतीने नगर पंचायत गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. आज, शनिवारी दुपारी या स्पर्धांचा ऑनलाइन पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी आयोजित करण्यात आलेल्या माझी वसुंधरा स्पर्धेत चार गटांत ६८६ ग्रामीण व नागरी संस्थांनी सहभाग घेतला. नगर पंचायत गटात १३० नगर पंचायती या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. यात शिर्डी नगर पंचायतीने १११३ गुण मिळवून सर्वोत्कृष्ट प्रथम पुरस्कार पटकावला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिर्डी नगर पंचायतीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना ऑनलाइन पद्धतीने हा पुरस्कार प्रदान केला. यावेळी उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. या अभियानात नगर पंचायतीने वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन, नूतनीकरणक्षम ऊर्जेचा वापर, ई-चार्जिंग पॉइंट स्थापन करणे, स्वच्छ हवा व विविध क्षेत्रांत गेल्या वर्षभर केलेल्या सातत्यपूर्ण कामामुळे आणि सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे शहराला प्रथम क्रमांक मिळाल्याचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी सांगितले.

नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, आमदार राधाकृष्ण विखे, खासदार डॉ़ सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिर्डीचे नागरिक, नगर पंचायत पदाधिकारी, अधिकारी यांच्या संयुक्त प्रयत्नांनी यश मिळाले आहे.

..............

साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साईनगरीने वसुंधरा अभियानात मिळवलेला पुरस्कार अभिमानास्पद आहे. शहरातील नागरिक, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक, पदाधिकारी, कर्मचारी, सर्व जण अभिनंदनास पात्र आहेत.

- राधाकृष्ण विखे, आमदार