शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शिर्डी विमानतळावरच पास अन् प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 03:59 IST

शिर्डी येथील श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन १ आॅक्टोबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे या विमानतळावर श्री साईदर्शनाचा पास आणि मंदिरातील प्रसादाचे काऊंटर सुरू करण्यात येणार आहे. देशातील अशा प्रकारची ही पहिलीच सुविधा असणार आहे.

विशेष प्रतिनिधी  मुंबई : शिर्डी येथील श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन १ आॅक्टोबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे या विमानतळावर श्री साईदर्शनाचा पास आणि मंदिरातील प्रसादाचे काऊंटर सुरू करण्यात येणार आहे. देशातील अशा प्रकारची ही पहिलीच सुविधा असणार आहे.श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्ष सोहळ्याचे उद्घाटन राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते होण्याची शक्यता असून त्याच दिवशी त्यांच्या हस्ते विमानतळाचेही उद्घाटन करण्यात येईल. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.या विमानतळावरून उड्डाणाची परवानगी नागरी उड्डयण महासंचालकांकडून येत्या चार-पाच दिवसांत मिळेल. त्या दृष्टीने एमएडीसीकडून सर्व कार्यवाही विक्रमी वेळात करण्यात आली आहे, असे एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी गुरुवारी ‘लोकमत’ला सांगितले.एमएडीसीने ३०० कोटी रुपये खर्चून या विमानतळाची उभारणी केली असून त्यासाठी श्री साईबाबा संस्थानने ५० कोटी रुपयांचा वाटा उचलला आहे. इतर निधी राज्य शासनाने दिला असून आणखी ५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. कमी खर्चात चांगला विमानतळ उभारल्याबद्दल केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाने एमएडीसीची प्रशंसा केली असून देशात अन्यत्र या धर्तीवर विमानतळ उभारण्याचा प्राधिकरणाचा मानस आहे. या विमानतळावर नजीकच्या काळात योगा, ध्यान केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे.शिर्डीच्या विमानतळावरून सुरुवातीला दररोज सुमारे ५०० प्रवासी ये-जा करतील, असा अंदाज आहे. शिर्डी-मुंबई हे अंतर विमानाने ३५ मिनिटांत गाठता येईल. मुंबई-शिर्डी ही विमानसेवा अलायन्स एअरलाइनने, शिर्डी-हैदराबाद सेवा जेट एअरवेजने, तर इंडिगोने भोपाळ-नागपूर-शिर्डी सेवा सुरू करण्याची तयारी दाखविली आहे.कोल्हापूर, नांदेड, नाशिकहून विमानसेवा सहा महिन्यांतकोल्हापूर, नांदेड आणि नाशिकहून मुंबईसाठीची विमानसेवा येत्या सहा महिन्यांत सुरू करण्यात येणार आहे. नांदेडहून तर पुढील महिन्यापासून विमान उड्डाण घेईल. पाठोपाठ नाशिकची सेवा सुरू होईल, असे सुरेश काकाणी यांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २६ ते २९ सप्टेंबरदरम्यान सिंगापूर आणि दक्षिण कोरियाच्या दौ-यावर जात आहेत. सिंगापूरमध्ये जगप्रसिद्ध चांगी एअरपोर्ट इंटरनॅशनलसोबत पुणे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी तांत्रिक सहकार्याबाबत करार होणार आहे.

टॅग्स :Governmentसरकार