शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

शिर्डी विमानतळचे उद्घाटन काकडीकरांनी पाहिले दुरून; विमानतळाच्या दारातच प्रशासनाने अडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 16:09 IST

ज्या काकडी गावातील शेतक-यांची संपूर्ण जमीन शिर्डी विमानतळात गेलेली आहे, अशा शेतक-यांना, नागरिकांनाच उद्घाटनादरम्यान विमानतळावर येण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे या शेतक-यांना विमानतळाचा उद्घाटनाचा सोहळा हा लांबून पहावा लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कअस्तगाव : शिर्डी विमानतळाचे लोकार्पण रविवारी १० वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. परंतु ज्या काकडी गावातील शेतक-यांची संपूर्ण जमीन विमानतळात गेलेली आहे, अशा शेतक-यांना, नागरिकांनाच उद्घाटनादरम्यान विमानतळावर येण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे या शेतक-यांना विमानतळाचा उद्घाटनाचा सोहळा हा लांबून पहावा लागला.काकडी गावातील सुमारे ७६४ शेतकरी खातेदारांच्या जमिनी विमानतळात गेल्या आहेत. विमानतळात जमीन गेलेल्या एका कुटुंबातील एका व्यक्तीला विमानतळात नोकरी दिली जाईल, असे आश्वासन विमानतळाच्या भूमिपूजन सोहळ्यात झालेल्या सभेत तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले होते. त्यानंतर अनेक लोकप्रतिनिधींकडे ग्रामस्थांनी पाठपुरावा केला. आंदोलने, उपोषणे झाली. परंतु अजूनही या गावातील थोडक्याच नागरिकांना नोकºया मिळाल्या आहेत. तर अनेक नागरिक अजून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. ज्यांना नोक-या मिळाल्या त्यांनाही कनिष्ठ दर्जाचे काम मिळाल्यामुळे विमानतळात घेतलेले कामगारही निराश आहेत. तसेच काकडी गावच्या सरपंच नानुबाई विनायक सोनवणे यांनाच कसेबसे उद्घाटनादरम्यान आत सोडण्यात आले. गावातील काही ठराविक नागरिकांना पास दिले असतानाही आत सोडण्यात आले नाही. काकडी गावातील अनेक नागरिकांना पास दिले नाहीत, पण मुख्य प्रवेशद्वाराशेजारीही फिरकू दिले नाही. आपल्याच शेतात येऊन आपल्यावर विमान प्राधिकरणाने गाजवलेला अधिकार नागरिकांनी अनुभवला. राष्ट्रपतींचा ताफा शिर्डीच्या दिशेने गेल्यानंतर आजूबाजूला जमलेल्या नागरिकांनी मुख्य प्रवेशद्वाराकडे जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना हुसकून लावले. त्यामुळे काकडी गाव अस्वस्थ होते.

विमानतळ उद्घाटनादरम्यान काकडी गावातील कुणालाही आत सोडण्यात आले नाही. फक्त मला सोडण्यात आले. उद्घाटन होऊन गेले आता काय करणार. भूमिपूजनानंतर आठ वर्षे होऊन गेले गाव एकत्र राहिले नाही. आता आपले काय चालणार. राष्ट्रपतींसोबत बोलण्यास परवानगी मिळाली नाही. जमिनी जाऊन काही फायदा गावाला झाला नाही.-नानुबाई विनायक सोनवणे, सरपंच, काकडी.