शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शिर्डी विमानतळचे उद्घाटन काकडीकरांनी पाहिले दुरून; विमानतळाच्या दारातच प्रशासनाने अडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 16:09 IST

ज्या काकडी गावातील शेतक-यांची संपूर्ण जमीन शिर्डी विमानतळात गेलेली आहे, अशा शेतक-यांना, नागरिकांनाच उद्घाटनादरम्यान विमानतळावर येण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे या शेतक-यांना विमानतळाचा उद्घाटनाचा सोहळा हा लांबून पहावा लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कअस्तगाव : शिर्डी विमानतळाचे लोकार्पण रविवारी १० वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. परंतु ज्या काकडी गावातील शेतक-यांची संपूर्ण जमीन विमानतळात गेलेली आहे, अशा शेतक-यांना, नागरिकांनाच उद्घाटनादरम्यान विमानतळावर येण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे या शेतक-यांना विमानतळाचा उद्घाटनाचा सोहळा हा लांबून पहावा लागला.काकडी गावातील सुमारे ७६४ शेतकरी खातेदारांच्या जमिनी विमानतळात गेल्या आहेत. विमानतळात जमीन गेलेल्या एका कुटुंबातील एका व्यक्तीला विमानतळात नोकरी दिली जाईल, असे आश्वासन विमानतळाच्या भूमिपूजन सोहळ्यात झालेल्या सभेत तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले होते. त्यानंतर अनेक लोकप्रतिनिधींकडे ग्रामस्थांनी पाठपुरावा केला. आंदोलने, उपोषणे झाली. परंतु अजूनही या गावातील थोडक्याच नागरिकांना नोकºया मिळाल्या आहेत. तर अनेक नागरिक अजून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. ज्यांना नोक-या मिळाल्या त्यांनाही कनिष्ठ दर्जाचे काम मिळाल्यामुळे विमानतळात घेतलेले कामगारही निराश आहेत. तसेच काकडी गावच्या सरपंच नानुबाई विनायक सोनवणे यांनाच कसेबसे उद्घाटनादरम्यान आत सोडण्यात आले. गावातील काही ठराविक नागरिकांना पास दिले असतानाही आत सोडण्यात आले नाही. काकडी गावातील अनेक नागरिकांना पास दिले नाहीत, पण मुख्य प्रवेशद्वाराशेजारीही फिरकू दिले नाही. आपल्याच शेतात येऊन आपल्यावर विमान प्राधिकरणाने गाजवलेला अधिकार नागरिकांनी अनुभवला. राष्ट्रपतींचा ताफा शिर्डीच्या दिशेने गेल्यानंतर आजूबाजूला जमलेल्या नागरिकांनी मुख्य प्रवेशद्वाराकडे जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना हुसकून लावले. त्यामुळे काकडी गाव अस्वस्थ होते.

विमानतळ उद्घाटनादरम्यान काकडी गावातील कुणालाही आत सोडण्यात आले नाही. फक्त मला सोडण्यात आले. उद्घाटन होऊन गेले आता काय करणार. भूमिपूजनानंतर आठ वर्षे होऊन गेले गाव एकत्र राहिले नाही. आता आपले काय चालणार. राष्ट्रपतींसोबत बोलण्यास परवानगी मिळाली नाही. जमिनी जाऊन काही फायदा गावाला झाला नाही.-नानुबाई विनायक सोनवणे, सरपंच, काकडी.