शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
4
"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
5
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
6
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
7
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
8
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
9
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
10
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
11
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
12
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
13
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
14
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
15
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
16
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
17
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
18
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
19
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
20
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

शरद पवार यांचा विरोध सिस्टीमला, कायद्याला नव्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:21 IST

अहमदनगर : शरद पवार यांचा आत्मा शेती आहे, असे म्हटले जाते. ते राज्यसभेचे सदस्य आहेत. मात्र, शेतीवर म्हणजेच त्यांच्या ...

अहमदनगर : शरद पवार यांचा आत्मा शेती आहे, असे म्हटले जाते. ते राज्यसभेचे सदस्य आहेत. मात्र, शेतीवर म्हणजेच त्यांच्या आत्म्यावरच राज्यसभेत चर्चा सुरू असताना पवार हे गैरहजर का राहिले, असा सवाल केंद्रीय कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष व माजी आमदार पाशा पटेल यांनी केला. अहमदनगरमध्ये बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना पटेल म्हणाले, शरद पवार यांचा कृषी विधेयक मांडण्याच्या सिस्टीमला विरोध आहे, विधेयकाला नाही. असा विरोध म्हणजे ‘कही पे निगाहे, कही पे निशाना’ असेच आहे. दिल्लीत सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाबाबत पटेल म्हणाले, कृषी विधेयकावरून पंजाब, हरियाणा सोडला तर भारतात कुठेच शेतकऱ्यांचा उद्रेक झाला नाही. जेव्हा महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन करतात, तेव्हा आठ दिवस रस्ते बंद असतात; पण कृषी विधेयक आल्यानंतर शेतकरी रस्त्यावर नाहीत. उलट शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. केंद्रात मंजूर झालेल्या कृषी विधेयकांचा मसुदा पवार कृषिमंत्री असतानाच झाला आहे.

दिल्लीतील पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन हे एम.एस.पी. (पिकांचा किमान हमीभाव) चा कायदा लागू करा, या एकाच मागणीसाठी होते. तोपर्यंत या तीनही कृषी विधेयकांचे स्वागत जवळपास देशातील सर्व संघटनांनी केले होते. हमीभावाबाबत सरकार चर्चा करण्यास तयार झाल्यावर, याच दिल्लीतील आंदोलकांनी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली. यामुळे आंदोलनात राजकारण सुरू झाले आहे. आंदोलनात शेती प्रश्नापासून भरकटलेली मंडळी आहेत, असेही पटेल यांनी सांगितले.