शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘जिनिव्हा’करारामुळे अभिनंदन परतला : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 19:34 IST

आम्ही लष्करी हल्यांचे राजकारण कधीही केले नाही. उलट शहीद जवानांच्या पाठीशी उभे राहण्याची भुमिका मांडली.

कोपरगाव : आम्ही लष्करी हल्यांचे राजकारण कधीही केले नाही. उलट शहीद जवानांच्या पाठीशी उभे राहण्याची भुमिका मांडली. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणूकीत शहीद जवानांच्या नावावर मते मागत आहेत. जखमी युध्दकैदी सापडल्यास त्याला परत करण्याचा विविध देशांचा ‘जिनिव्हा’करार झालेला आहे. म्हणून अभिनंदनची सुटका झाली. मात्र ३ वर्षांपासून कैदेत असलेल्या कुलभुषणची सुटका तुम्ही का करू शकले नाही? असा सवाल करून कॉंग्रेसमध्ये काही वाटा वेगळ्या झाल्या असतील. पण, आम्ही गांधी-नेहरूंचा विचार कधीच सोडला नाही, अशी स्पष्टोक्ती राष्टÑवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.शिर्डी लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार बाळासाहेब थोरात, वैभव पिचड, माजी आमदार भानुदास मुरकुटे, अशोक काळे,पांडूरंग अभंग, अविनाश आदिक, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, बाळासाहेब गायकवाड, अरूण कडू, रावसाहेब म्हस्के, माधव खिलारी, श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, गांधी कुटूंबाने लोकशाही राज्य स्थापन केले. ९० टक्के धरणांचा पाया जवाहरलाल नेहरूंनी रचला. कारखानदारी उभारली. इंदिरा गांधींनी पाकीस्तानला घुसखोरी थांबविण्यास भाग पाडले. बांगला देशाची निर्मिती केली. देशात इतिहास होतो. पण, त्यांनी भुगोल करून दाखविला. राजीव गांधींनी मोबाईल क्रांती केली. सामान्यांसाठी दळण-वळणाची साधने उपलब्ध केली. एकाच कुटूंबातील दोन कर्तृत्ववान माणसांच्या हत्या झालेल्या असताना गांधींनी काय केले? असे मोदी विचारतात. देशाचा पंतप्रधान गांधी-नेहरूंनंतर पवारांवर बोलतो, हे माझे भाग्य आहे. ते झोपेत सुध्दा माझे नाव घेत असतील, अशी टिपण्णी पवार यांनी केली. ते कधी पवारांचे बोट धरून राजकारण शिकलो असे म्हणतात. तर कधी पवार काय करीत आहेत? अशी विचारणा करतात. त्यांनी व्यक्तीगत टिका करण्याऐवजी पाच वर्षात काय केले व करणार? हे सांगावे, असे पवार यांनी ठणकावले. शेतकऱ्यांच्या भरवश्यावर निर्यात करणारा देश आम्ही निर्माण केला. २०१७-१९ या दोन वर्षात देशात ११ हजार ९९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या कुटूंबांची विचारपूस केली. शेतकरी कर्जमाफी केली. या सरकारने काय केले? भाजपच्या काळात बेकारी, बेरोजगारी वाढली, कारखानदारीचे धोरण आले नाही, शेतकरी उध्वस्त झाला. २०१४च्या पहिल्या मंत्रीमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफीची घोषणा मोदींनी केली होती. त्याचे काय झाले? आम्ही राजकारणात नवीन पिढी तयार करीत आहोत. हा देश व राज्य पुढे नेणाºया तरूणांची फळी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. हे राज्यकर्ते प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी उपयोगी पडणारे नाहीत. तर मुडदाड लोकांच्या हिताची जपणूक करणारे आहेत. राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड या ३ राज्यांचा निकाल देशातील लोकांची मन:स्थिती सांगणारा आहे. धाडी घालण्याचे काम या सरकारने करून सत्तेचा गैरवापर केल्याचे पवार म्हणाले. थोरात म्हणाले, १७ दिवसात निवडून आलेले सदाशिव लोखंडे चेंबूरला राहतात की चेंबरमध्ये? हेच कळत नाही. निळवंडे कालव्यांसाठी कुठलाही पैसा त्यांनी आणला नाही. भाऊसाहेब वाक्चौरेंनी एकदा पक्ष बदलला तर लोकांनी त्यांना पराभूत केले. आता चारदा बदलल्यावर काही खरे नाही. देशाचे पंतप्रधान कामांबाबत बोलत नाहीत. भाजप सरकारमुळे अर्थव्यवस्था डबघाईस गेली. देशात मंदीची लाट आली. शेतकरी अडचणीत आल्याने बाजारपेठ उध्वस्त झाल्या, अशी टिका त्यांनी केली. उमेदवार भाऊसाहेब कांबळे, संदीप वर्पे, आशुतोष काळे, अभंग, मुरकुटे, ससाणे, आदिक आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन दीपक साळुंके यांनी केले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdi-pcशिर्डीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019