शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

शांताबाई चव्हाण यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:20 IST

.............. ताराबाई शेंडकर यांचे निधन आश्वी : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील सामाजिक, धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ताराबाई पुंजा ...

..............

ताराबाई शेंडकर यांचे निधन

आश्वी : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील सामाजिक, धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ताराबाई पुंजा शेंडकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ५९ वर्ष होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते आण्णा शेंडकर यांच्या त्या आई होत.

..............

नरेंद्र जामगावकर यांचे निधन

अहमदनगर : महापालिकेचे सेवानिवृत्त झोनप्रमुख नरेंद्र वल्लभदास जामगावकर (वय ७१) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, बंधू असा परिवार आहे. मनपात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. धार्मिक व मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वत्र सुपरिचित होते.

..................

दत्तात्रय सगळगिळे यांचे निधन.

अहमदनगर : अभियंता कॉलनी तवले नगर येथील निवृत्त सहाय्यक फौजदार दत्तात्रय सयाजी सगळगिळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पोलीस कॉस्न्टेबल उदय सगळगिळे व जिल्हा मराठा विद्याप्रसारक मंडळाच्या रेसिडेन्सिअल हायस्कूलच्या प्राध्यापिका मनिषा सगळगिळे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

..............

किशोर चव्हाण यांचे निधन

कोपरगाव : किशोर लक्ष्मण चव्हाण (वय ३६, रा. साईसिटी, कोपरगाव) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

........................

सुरेश शेट

श्रीरामपूर : येथील मोरगे वस्ती परिसरातील सुरेश भागवत शेटे (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन भाऊ, तीन मुली, सून, नातवंडे, जावई, बहीण असा परिवार आहे. व्यावसायिक शरद शेटे यांचे ते वडील होत.

...................

नंदाताई पवार

श्रीरामपूर : वडाळा महादेव येथील महाराष्ट्र साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार यांच्या आई नंदाताई बबनराव पवार (वय ७६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. साखर कामगारांचे दिवंगत नेते बबनराव पवार यांच्या पत्नी, तर नितीन पवार व पुणे येथील उद्योजक हेमंत पवार यांच्या त्या आई होत. नगराध्यक्ष अनुराधा आदिक, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी पवार कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

---------

मीनाबाई चव्हाण

श्रीरामपूर : नगरपालिका कामगार कॉलनीतील रहिवासी मीनाबाई चरण चव्हाण (वय ५८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्या माजी उपनगराध्यक्ष चरण चव्हाण यांच्या पत्नी तर सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांच्या आई व नगरसेविका प्रणिता चव्हाण यांच्या सासू होत.

...............

कचरू वाबळे

श्रीरामपूर : तालुक्यातील बेलापूर येथील जुन्या पिढीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कचरु रामहरी उर्फ आण्णा वाबळे (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रामेश्वर, राजेंद्र, हरी आणि गोविंद वाबळे यांचे ते वडील होत.

........................

साईनाथ मच्छिंद्र भालेराव

चांंदेकसारे : इंडियन ओव्हरसीज बँकेचे कर्मचारी साईनाथ मच्छिंद्र भालेराव (३४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. मीनानाथ व सोमनाथ भालेराव यांचे ते बंधू होत.

....................

दिनकरराव टेकणे यांचे निधन

भेंडा : मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी दिनकरराव टेकणे (वय ७६ , रा. माळीचिंचोरा, ता. नेवासा) यांचे बुधवारी भेंडा येथे आजारपणामुळे निधन झाले. ते १९८१मध्ये जिजामाता माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक पदावर रुजू झाले. शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ५ सप्टेंबर १९९६ रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार’ने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.

..............

अनंत भांड

श्रीरामपूर : तालुक्यातील बेलापूर येथील जुन्या पिढीतील सामाजिक कार्यकर्ते अनंत भागवतराव भांड (वय ८७) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, चार मुली, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. वास्तू शिल्पकार महेश भांड यांचे ते वडील होत. वसंत, दिलीप आणि अशोक भांड यांचे ते थोरले बंधू होत.

.............

मुस्ताक शेख

श्रीरामपूर : माजी प्राचार्य मुस्ताक अहमदनजीर अहमद शेख (वय ७६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातू व पणतू असा परिवार आहे. प्राचार्य शेख रयत शिक्षण संस्थेत नोकरीला होते. डॉ. रिजवान शेख यांचे ते वडील तर नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती अश्पाक शेख यांचे बंधू होत.

........................

पंढरीनाथ भोस यांचे निधन

श्रीगोंदा : निवृत्त पोलीस कर्मचारी पंढरीनाथ सहादू भोस (वय ६६, रा. घोगरगाव, ता. श्रीगोंदा) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, विवाहित मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांचे ते बंधू तर नगरसेवक गणेश भोस यांचे चुलते होत.

.................................